शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

वसाहतीअंतर्गत रस्त्यावरील कोंडीचा प्रश्न कायम, महापालिका हतबल, शहरवासीयांची डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 00:32 IST

Navi Mumbai News : नवी मुंबईची लोकसंख्या वाढत आहे. रोजगाराच्या विपुल संधी उपलब्ध झाल्याने विविध प्रांतातील नोकरदारांचा या शहराकडे ओढा वाढत आहे. त्यामुळे येथील पायाभूत सुविधांवर ताण पडत आहे. 

नवी मुंबई : माहिती व तंत्रज्ञानाचे शहर म्हणून नावारूपाला येणाऱ्या नवी मुंबईची लोकसंख्या वाढत आहे. रोजगाराच्या विपुल संधी उपलब्ध झाल्याने विविध प्रांतातील नोकरदारांचा या शहराकडे ओढा वाढत आहे. त्यामुळे येथील पायाभूत सुविधांवर ताण पडत आहे. सुनियोजित शहरातील रस्ते, उद्याने व इतर अत्यावश्यक सेवा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. शहराची उभारणी करताना वाहनतळाचे नियोजन करण्याचे राहून गेले. त्याचा त्रास आता शहरवासीयांना सहन करावा लागत आहे. कारण उपलब्ध रस्ते आणि वाहनतळाच्या जागा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीची कायमस्वरूपी समस्या शहरवासीयांना भेटसावत आहे. या समस्येवर मात करणे महापालिका प्रशासनाला अद्याप तरी फारसे यश आलेले नाही.सिडकोने सुनियोजित असे नवी मुंबई शहर उभारले. वेगवेगळ्या नोडसमध्ये शहराची आखणी करण्यात आली. शहराचे नियोजन करताना संबंधित नोडसमधील वीस वर्षांनंतरची लोकसंख्या गृहित धरून पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या, परंतु कालांतराने सिडकोचे हे नियोजत पुरते फसल्याचे स्पष्ट झाले आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर येथील वाहनांची संख्याही वाढली. त्यामुळे रस्ते आणि पार्किंगच्या सुविधांचा पुरता बोजवरा उडाला आहे. विशेषत: वसाहतीअंतर्गच्या अरुंद रस्त्यावर वाहतूककोंडीची कायमस्वरूपी समस्या भेडसावत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी महापालिकेकडून विविध योजना तयार करण्यात आल्या. गृहनिर्माण सोसायटीतील वाहनधारकांनी आपली वाहने सोसायटीच्या आवारातच उभी करण्याचे फर्मान सोडण्यात आले. वसाहतीअंतर्गत रस्त्यावर वाहने पार्क करण्यास मज्जाव करण्यात आला. सम-विषम पार्किंगचा पर्यायही देण्यात आला. हे आदेश न जुमानणाऱ्या वाहनधारकांवर वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून कारवाईचा बडगाही उगारण्यात आला, परंतु वाहतूककोंडीची समस्या मात्र जैसे थे राहिली. आजतागायत ही समस्या कायम असून, भविष्यात ती अधिक गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.एपीएमसीची वाहने वसाहतीततुर्भे येथील एपीएमसी मार्केटमध्ये दिवसाला कृषिमालाची शेकडो ट्रक व इतर वाहने येतात. मार्केटमध्ये रिकामी केल्यानंतर ही वाहने जागा मिळेल, तेथे पार्क केली जातात. मार्केट परिसरातच भव्य ट्रक टर्मिनल असतानाही अनेक वाहनधारक वसाहतीअंतर्गच्या छोट्या रस्त्यांवर आपले ट्रक आणि टेम्पो उभे करतात. 

खासगी वाहनांना पदपथ आंदणखासगी बसेस, रिक्षा, टेम्पो, तसेच टुरिस्टच्या वाहनांना शहरातील रस्ते व पदपथ आंदण दिल्यासारखी परिस्थती आहे. शहरात ठिकठिकाणी खासगी बसेस व मालवाहू टेम्पोच्या रांगा लागलेल्या दिसून येतात. वाहतूक विभागाचे या प्रकाराकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. 

दुतर्फा पार्किंगचा फटकाप्रमुख रस्त्यांसह दळणवळणाचे मुख्य साधन असलेल्या वसाहतीअंतर्गत रस्त्यांवर दुतर्फा वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे अगोदरच अरुंद असलेले रस्ते आणखी निमुळते होत असल्याने वाहतूककोंडीचा नेहमीच सामना करावा लागतो. विशेषत: संबंधित विभागातील विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठी अडचण होत आहे. 

वाहतूक पोलिसांची तारांबळनोकरी-व्यवसायानिमित्त शेजारच्या शहरातून नवी मुंबईत येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या वाहनांचा ताणही नवी मुंबईतील उपलब्ध रस्ते आणि वाहनताळाच्या अपुऱ्या सुविधांवर पडत आहे. अशा परिस्थितीत वाहतुकीचे नियमन करताना वाहतूक पोलिसांची तारांबळ उडताना दिसत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईParkingपार्किंगNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका