शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

वसाहतीअंतर्गत रस्त्यावरील कोंडीचा प्रश्न कायम, महापालिका हतबल, शहरवासीयांची डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 00:32 IST

Navi Mumbai News : नवी मुंबईची लोकसंख्या वाढत आहे. रोजगाराच्या विपुल संधी उपलब्ध झाल्याने विविध प्रांतातील नोकरदारांचा या शहराकडे ओढा वाढत आहे. त्यामुळे येथील पायाभूत सुविधांवर ताण पडत आहे. 

नवी मुंबई : माहिती व तंत्रज्ञानाचे शहर म्हणून नावारूपाला येणाऱ्या नवी मुंबईची लोकसंख्या वाढत आहे. रोजगाराच्या विपुल संधी उपलब्ध झाल्याने विविध प्रांतातील नोकरदारांचा या शहराकडे ओढा वाढत आहे. त्यामुळे येथील पायाभूत सुविधांवर ताण पडत आहे. सुनियोजित शहरातील रस्ते, उद्याने व इतर अत्यावश्यक सेवा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. शहराची उभारणी करताना वाहनतळाचे नियोजन करण्याचे राहून गेले. त्याचा त्रास आता शहरवासीयांना सहन करावा लागत आहे. कारण उपलब्ध रस्ते आणि वाहनतळाच्या जागा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीची कायमस्वरूपी समस्या शहरवासीयांना भेटसावत आहे. या समस्येवर मात करणे महापालिका प्रशासनाला अद्याप तरी फारसे यश आलेले नाही.सिडकोने सुनियोजित असे नवी मुंबई शहर उभारले. वेगवेगळ्या नोडसमध्ये शहराची आखणी करण्यात आली. शहराचे नियोजन करताना संबंधित नोडसमधील वीस वर्षांनंतरची लोकसंख्या गृहित धरून पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या, परंतु कालांतराने सिडकोचे हे नियोजत पुरते फसल्याचे स्पष्ट झाले आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर येथील वाहनांची संख्याही वाढली. त्यामुळे रस्ते आणि पार्किंगच्या सुविधांचा पुरता बोजवरा उडाला आहे. विशेषत: वसाहतीअंतर्गच्या अरुंद रस्त्यावर वाहतूककोंडीची कायमस्वरूपी समस्या भेडसावत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी महापालिकेकडून विविध योजना तयार करण्यात आल्या. गृहनिर्माण सोसायटीतील वाहनधारकांनी आपली वाहने सोसायटीच्या आवारातच उभी करण्याचे फर्मान सोडण्यात आले. वसाहतीअंतर्गत रस्त्यावर वाहने पार्क करण्यास मज्जाव करण्यात आला. सम-विषम पार्किंगचा पर्यायही देण्यात आला. हे आदेश न जुमानणाऱ्या वाहनधारकांवर वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून कारवाईचा बडगाही उगारण्यात आला, परंतु वाहतूककोंडीची समस्या मात्र जैसे थे राहिली. आजतागायत ही समस्या कायम असून, भविष्यात ती अधिक गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.एपीएमसीची वाहने वसाहतीततुर्भे येथील एपीएमसी मार्केटमध्ये दिवसाला कृषिमालाची शेकडो ट्रक व इतर वाहने येतात. मार्केटमध्ये रिकामी केल्यानंतर ही वाहने जागा मिळेल, तेथे पार्क केली जातात. मार्केट परिसरातच भव्य ट्रक टर्मिनल असतानाही अनेक वाहनधारक वसाहतीअंतर्गच्या छोट्या रस्त्यांवर आपले ट्रक आणि टेम्पो उभे करतात. 

खासगी वाहनांना पदपथ आंदणखासगी बसेस, रिक्षा, टेम्पो, तसेच टुरिस्टच्या वाहनांना शहरातील रस्ते व पदपथ आंदण दिल्यासारखी परिस्थती आहे. शहरात ठिकठिकाणी खासगी बसेस व मालवाहू टेम्पोच्या रांगा लागलेल्या दिसून येतात. वाहतूक विभागाचे या प्रकाराकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. 

दुतर्फा पार्किंगचा फटकाप्रमुख रस्त्यांसह दळणवळणाचे मुख्य साधन असलेल्या वसाहतीअंतर्गत रस्त्यांवर दुतर्फा वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे अगोदरच अरुंद असलेले रस्ते आणखी निमुळते होत असल्याने वाहतूककोंडीचा नेहमीच सामना करावा लागतो. विशेषत: संबंधित विभागातील विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठी अडचण होत आहे. 

वाहतूक पोलिसांची तारांबळनोकरी-व्यवसायानिमित्त शेजारच्या शहरातून नवी मुंबईत येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या वाहनांचा ताणही नवी मुंबईतील उपलब्ध रस्ते आणि वाहनताळाच्या अपुऱ्या सुविधांवर पडत आहे. अशा परिस्थितीत वाहतुकीचे नियमन करताना वाहतूक पोलिसांची तारांबळ उडताना दिसत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईParkingपार्किंगNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका