शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

डाळींचे कडाडलेले भाव पुढील दीड महिना कायम राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 06:25 IST

देशात सुरू असलेल्या दुष्काळाचा परिणाम कृषी व्यापारावर झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये डाळींसह कडधान्याची आवक कमी झाली असून, बाजारभाव वाढले आहेत. मुगडाळ व तुरडाळीच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे.

नवी मुंबई - देशात सुरू असलेल्या दुष्काळाचा परिणाम कृषी व्यापारावर झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये डाळींसह कडधान्याची आवक कमी झाली असून, बाजारभाव वाढले आहेत. मुगडाळ व तुरडाळीच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे. मान्सून कसा असेल यावर बाजारभाव ठरणार असून, किमान दीड महिनातरी मार्केटमध्ये तेजी कायम राहील, असे धान्य व्यापारी पोपटलाल भंडारी यांनी सांगितले.मुंबई बाजार समितीमध्ये तीन महिन्यांपासून डाळी व कडधान्याची आवक कमी होत आहे. फेब्रुवारीमध्ये रोज सरासरी ८०० ते एक हजार टन आवक झाली. सद्यस्थितीत ७०० ते ८०० टन आवक होत असून, काही वेळा यापेक्षाही कमी माल विक्रीसाठी येत आहे. देशभर सुरू असलेल्या दुष्काळी स्थितीचा फटका डाळींच्या व्यापाराला बसला आहे.यावर्षी नवीन पीक बाजारात आल्यानंतर तूर व इतर कडधान्याचे दर घसरले होते. यामुळे शासनाने आयातीवर निर्बंध टाकले होते, यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात चांगले दर मिळणे शक्य झाले. सद्यस्थितीमध्ये मार्केटमध्ये येणारा माल कमी झाल्याने भाव वाढू लागले आहेत. होलसेल मार्केटमध्ये ४८ ते ५० रुपये किलो दराने विकल्या जाणाºया मसूरचे दर ५० ते ५२ रुपये किलो झाले आहेत. तुरडाळीचे दर ६० ते ७५ रुपयांवरून ६२ ते ८२ रुपये, मुगडाळीचे दर ६८ ते ८३ रुपये किलोवरून ६८ ते ९० रुपये किलो एवढे झाले आहेत.डाळी व कडधान्याचे दर जूनच्या दुसºया आठवड्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता असल्याची माहिती भंडारी यांनी दिली आहे. सद्यस्थितीमध्ये मार्केटमध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामधून व मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक, राजस्थानमधून माल विक्रीसाठी येत आहे. मालाची मोठ्या प्रमाणात आयात सद्यस्थितीमध्ये लगेच सुरू होण्याची काही शक्यता नाही.

टॅग्स :foodअन्नNavi Mumbaiनवी मुंबईAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती