शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

डाळींचे कडाडलेले भाव पुढील दीड महिना कायम राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 06:25 IST

देशात सुरू असलेल्या दुष्काळाचा परिणाम कृषी व्यापारावर झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये डाळींसह कडधान्याची आवक कमी झाली असून, बाजारभाव वाढले आहेत. मुगडाळ व तुरडाळीच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे.

नवी मुंबई - देशात सुरू असलेल्या दुष्काळाचा परिणाम कृषी व्यापारावर झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये डाळींसह कडधान्याची आवक कमी झाली असून, बाजारभाव वाढले आहेत. मुगडाळ व तुरडाळीच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे. मान्सून कसा असेल यावर बाजारभाव ठरणार असून, किमान दीड महिनातरी मार्केटमध्ये तेजी कायम राहील, असे धान्य व्यापारी पोपटलाल भंडारी यांनी सांगितले.मुंबई बाजार समितीमध्ये तीन महिन्यांपासून डाळी व कडधान्याची आवक कमी होत आहे. फेब्रुवारीमध्ये रोज सरासरी ८०० ते एक हजार टन आवक झाली. सद्यस्थितीत ७०० ते ८०० टन आवक होत असून, काही वेळा यापेक्षाही कमी माल विक्रीसाठी येत आहे. देशभर सुरू असलेल्या दुष्काळी स्थितीचा फटका डाळींच्या व्यापाराला बसला आहे.यावर्षी नवीन पीक बाजारात आल्यानंतर तूर व इतर कडधान्याचे दर घसरले होते. यामुळे शासनाने आयातीवर निर्बंध टाकले होते, यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात चांगले दर मिळणे शक्य झाले. सद्यस्थितीमध्ये मार्केटमध्ये येणारा माल कमी झाल्याने भाव वाढू लागले आहेत. होलसेल मार्केटमध्ये ४८ ते ५० रुपये किलो दराने विकल्या जाणाºया मसूरचे दर ५० ते ५२ रुपये किलो झाले आहेत. तुरडाळीचे दर ६० ते ७५ रुपयांवरून ६२ ते ८२ रुपये, मुगडाळीचे दर ६८ ते ८३ रुपये किलोवरून ६८ ते ९० रुपये किलो एवढे झाले आहेत.डाळी व कडधान्याचे दर जूनच्या दुसºया आठवड्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता असल्याची माहिती भंडारी यांनी दिली आहे. सद्यस्थितीमध्ये मार्केटमध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामधून व मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक, राजस्थानमधून माल विक्रीसाठी येत आहे. मालाची मोठ्या प्रमाणात आयात सद्यस्थितीमध्ये लगेच सुरू होण्याची काही शक्यता नाही.

टॅग्स :foodअन्नNavi Mumbaiनवी मुंबईAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती