शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

प्रीपेड वीज मीटर योजना संथ गतीने,पाच ते सहा वर्षांत केवळ ३ हजार २१० मीटर बसविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 02:25 IST

पनवेल : गेल्या काही वर्षांमध्ये महावितरण कंपनीने प्रीपेड वीज मीटर ही संकल्पना पुणे, नाशिक, सांगली, कोल्हापूर, ठाणे, महाबळेश्वर, माथेरान अशा मोठ्या शहरांमध्ये सुरू केली होती.

मयूर तांबडे पनवेल : गेल्या काही वर्षांमध्ये महावितरण कंपनीने प्रीपेड वीज मीटर ही संकल्पना पुणे, नाशिक, सांगली, कोल्हापूर, ठाणे, महाबळेश्वर, माथेरान अशा मोठ्या शहरांमध्ये सुरू केली होती. तेथे लोकप्रिय झालेली ही योजना रायगड जिल्ह्यातील पनवेल परिसरात देखील राबविली. मात्र पनवेलमध्ये या प्रीपेड वीज मीटर योजनेला प्रतिसाद मिळालेला नाही. पाच ते सहा वर्षांत पनवेल शहर व ग्रामीण भागात केवळ ३ हजार २१० मीटर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे पनवेलमध्ये प्रीपेड वीज मीटर योजना संथ गतीने सुरू असल्याचे दिसत आहे.अंथरु ण पाहून पाय पसरावेत असा काटकसरीचा मूलमंत्र मोबाइल विश्वात जपताना प्रीपेड मोबाइल लोकप्रिय ठरला. याच ट्रॅकवरून जाताना महावितरणनेही प्रीपेड वीज मीटर ही संकल्पना काही ठिकाणी लोकप्रिय केली. ज्या ग्राहकांना आपल्या गरजेनुसार वीज वापर करायचा आहे, त्यांच्यासाठी ही योजना उपयुक्त आहे. नेमका वीज वापर करताना काटकसर आणि बचत असा दुहेरी हेतू यात आहे. बिल भरण्यासाठी रांगेत थांबण्याची गरज राहणार नाही. शिवाय रिचार्ज करण्यापूर्वी सरकारी सुटीचा काळ ‘हॅपी अवर्स’ समजून रक्कम शिल्लक नसूनही वीज सुरूच राहील. ज्यांच्या घरी पूर्वीचे मीटर आहेत, त्यांना देखील प्रीपेड मीटर योजनेत सहभागी होता येते. त्यासाठी आधीच्या बिलाची प्रत, प्रीपेड मीटर मागणी अर्ज, शेवटच्या बिलाची बाकी, बिल भरल्याची पावती आदी कागदपत्रे सादर केली की घरी प्रीपेड मीटर बसविले जातात. त्यासाठी वेगळा काहीही खर्च करावा लागत नाही. काही ग्राहकांची घरे बरेच दिवस बंद असतात. त्यांच्या मीटरच्या रीडिंगचा प्रश्न निर्माण होतो. अशा वेळी चालू रीडिंगऐवजी ‘लॉक’ असे नमूद करून अंदाजे बिल ग्राहकांच्या माथी मारले जाते. त्यासाठी प्रीपेड मीटर हा उत्तम पर्याय आहे. पनवेल परिसरात आतापर्यंत केवळ ३ हजार २१० प्रीपेड वीज मीटर लावण्यात आलेले आहेत.नियमित वीज ग्राहक देखील ‘प्रीपेड वीज मीटर’ बसवू शकतात. १०० रु पये शिल्लक राहिल्यानंतर हे उपकरण मीटर रिचार्ज करण्याची सूचना देते. या उपकरणाच्या वापरामुळे ग्राहक त्यांना हवी तेवढीच वीज वापरू शकतो. प्रीपेडसाठी भरलेल्या रकमेची वीज वापरण्यासाठी कालमर्यादेची अट नाही. रिचार्ज संपले तर राष्ट्रीय सण, सार्वजनिक सुटी, रात्रीच्यावेळी वीज पुरवठा खंडित केला जात नाही, हे या योजनेचे वेगळे वैशिष्ट्य आहे. मात्र, कामकाजाच्या दिवशी रिचार्जची रक्कम ग्राहकाला त्वरित भरावी लागते. प्रीपेड मीटरमुळे वीज तसेच वेळेचीही बचत होते. महिन्याच्या प्रत्येक रविवारी, सार्वजनिक सुटी, प्रत्येक दुसºया-चौथ्या शनिवारी रिचार्ज संपले तरी वीज खंडित होणार नाही. पनवेल परिसरात मात्र या प्रीपेड वीज मीटरला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे पनवेलमध्ये ही योजना संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे.विजेची होते बचतज्या ग्राहकांना आपल्या गरजेनुसार वीज वापर करायचा आहे, त्यांच्यासाठी ही योजना उपयुक्त आहे. नेमका वीज वापर करताना काटकसर आणि बचत असा दुहेरी हेतू यात आहे.रिचार्ज संपले तर राष्ट्रीय सण, सार्वजनिक सुटी, रात्रीच्यावेळी वीज पुरवठा खंडित केला जात नाही, हे या योजनेचे वेगळे वैशिष्ट्य आहे. मात्र, कामकाजाच्या दिवशी रिचार्जची रक्कम ग्राहकाला त्वरित भरावी लागते.>प्रीपेड वीज मीटरमध्ये ग्राहक पहिलेच पैसे भरतो. त्यामुळे आम्हाला रीडिंग घेण्यासाठी अथवा वीज बिल देण्यासाठी ग्राहकांच्या घरी जावे लागत नाही. हे मीटर महागडे आहेत. त्यामुळे प्रीपेड वीज मीटर सध्या तरी सुरू होणार नाहीत.- माणिक राठोड,कार्यकारी अभियंता,महावितरण

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई