शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
5
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
6
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
7
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
8
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
9
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
10
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
11
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
12
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
13
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
14
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
15
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
16
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
17
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
18
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
19
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
20
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

मराठी भाषेपेक्षा सौंदर्य स्पर्धेला प्राधान्य

By admin | Updated: March 1, 2016 02:50 IST

महानगरपालिकेने खाजगी संस्थेच्या सहकार्याने मिस नवी मुंबई स्पर्धेचे आयोजन केल्यामुळे शहरवासीयांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे

नामदेव मोरे, नवी मुंबईमहानगरपालिकेने खाजगी संस्थेच्या सहकार्याने मिस नवी मुंबई स्पर्धेचे आयोजन केल्यामुळे शहरवासीयांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. विशेष म्हणजे सौंदर्य स्पर्धेला प्राधान्य देणाऱ्या पालिकेला मराठी भाषा दिनाचा विसर पडला आहे. राजभाषा दिनानिमित्त एकाही कार्यक्रमाचे आयोजन न केल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी वि. वा. शिरवाडकर तथा कुसुुमाग्रज यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. जगभर नोकरी, व्यवसायानिमित्त गेलेले मराठी नागरिक यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. मराठी भाषेचे संवर्धन व प्रसार करण्यासाठी व्याख्यान, पुस्तक प्रदर्शनाचेही आयोजन केले जाते. राज्य शासनाने राजभाषा पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु मराठी भाषिक लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी असणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेला मात्र मराठीचा विसर पडला आहे. मराठी भाषा दिनाच्या दोन दिवस अगोदर पालिकेने खाजगी इव्हेंट कंपनीच्या सहकार्याने मिस नवी मुंबई स्पर्धेचे आयोजन केले. नवी मुुंबई हे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या नागरिकांना एकात्म भावनेने सामावून घेणारे शहर आहे. शहराला सांस्कृतिक वलय निर्माण करून देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन महापालिका करत असते. याचाच भाग म्हणून यावर्षी सौंदर्य स्पर्धा आयोजित केली. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सौंदर्य स्पर्धेमुळे सांस्कृतिक वैभव वाढते का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नवी मुंबईमध्ये फक्त युवतींसाठीच नाही तर विवाहिता, दांपत्य, ज्येष्ठ नागरिक व मुलांसाठीही सौंदर्य स्पर्धा आयोजित करावी असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. सौंदर्य स्पर्धेच्या आयोजनामध्ये मग्न असणाऱ्या पालिका प्रशासनाला २७ फेब्रुवारीला जागतिक मराठी भाषा दिन असल्याचे लक्षातच राहिले नाही. शहरात यानिमित्ताने एकही कार्यक्रम आयोजित केला नाही. विशेष म्हणजे महापालिकेच्या स्थापनेपासून मनपाने अशाप्रकारे एकही कार्यक्रम राबविलेला नाही. नवी मुंबईच्या शेजारी असणाऱ्या कल्याणमध्ये महापालिका व सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याला एक व्याख्यान होत आहे. परंतु स्मार्ट सिटीमध्ये सहभागी होण्याची घाई झालेल्या पालिकेने एकही कार्यक्रम न घेतल्यामुळे भाषाप्रेमी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेने कला, क्रीडा व संस्कृतीचे जतन करणाऱ्या कार्यक्रमांचेच आयोजन करावे. सौंदर्य स्पर्धेपेक्षा भाषा संवर्धनास प्रथम प्राधान्य द्यावे असे मतही अनेकांनी व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)