शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

Maharashtra Election 2019: शेवटच्या दिवशी उमेदवारांचे भरपावसात शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 06:35 IST

 रॅलीपेक्षा मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीला प्राधान्य

नवी मुंबई : नवी मुंबई : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पहाटेपासून पाऊस सुरू झाल्यामुळे उमेदवारांसह कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडल्याचे चित्र शहरात पाहावयास मिळाले. पावसामुळे भव्य रॅली काढून प्रचाराची सांगता करण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटीगाठीवर भर देण्यात आला. पावसामुळे अनेक कार्यकर्ते घराबाहेरही पडले नाहीत. प्रचाराच्या तोफा थंडावल्यामुळे आता सर्वांची भिस्त छुपा प्रचार व भेटीगाठीवर असणार आहे.

प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रमुख उमेदवार रॅलीचे आयोजन करून शक्तिप्रदर्शन करत असतात. जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो; परंतु शनिवारी पहाटेपासूनच शहरात पावसाने हजेरी लावली. दिवसभर सातत्याने पाऊस पडत होता. नेरुळमध्ये राज ठाकरे यांच्या सभेसाठी घातलेल्या सभामंडपामध्येही पाणी ठिपकू लागले होते.

ऐरोली मतदारसंघामध्ये बहुतांश सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी रॅली ऐवजी प्रत्यक्ष पदाधिकारी व नागरिकांच्या भेटीला प्राधान्य दिले होते. भाजपनेही मोठ्या रॅलीचे आयोजन केले नाही. पाऊस पडत असल्यामुळे महापालिका क्षेत्रातील १११ प्रभागांमधील कार्यकर्त्यांनीही रॅलीऐवजी प्रत्यक्ष भेटून व समाजमाध्यमांवरून मेसेज टाकण्यावरच भर दिल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. याशिवाय उमेदवारांकडून सोशल मीडियावरही प्रचार सुरू आहे. केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या माध्यमाचा पुरेपुर वापर केलाजात आहे.

आता उमेदवारांचा भर छुप्या प्रचारावर शनिवारी सांयकाळी प्रचार संपला, त्यामुळे उर्वरित २४ तासांत उमेदवारांकडून छुप्या प्रचारावर भर दिला जाणार आहे. यात प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका, प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची फोडाफोडी, मतदार याद्यांची विभागनिहाय छाननी, प्रमुख कार्यकर्त्यांना जबाबदारीचे वाटप, मतदारयादीत नाव असलेल्या; परंतु निवासाचा पत्ता बदलेल्या स्थलांतरित मतदारांचा शोध घेणे आदी घडामोडींना वेग येणार आहे. असे असले तरी या काळात मतदारांना प्रलोभन दाखविणे, पैसे व इतर भेटवस्तूंचे वाटप आदी शक्यता नाकारता येत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोग सतर्क झाला आहे.

रबाळेमध्ये मद्यसाठा जप्त

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. १८ आॅक्टोबरला रात्री विष्णूनगरकडे जाणाऱ्या रोडवर पोलिसांना नगरसेवक असे लिहिलेली बीएमडब्ल्यू कार सापडली. त्यावर नवी मुंबई महानगरपालिकेचा लोगो लावण्यात आला होता. या कारमध्ये ३,८४० रुपये किमतीच्या बीअरच्या बॉटल व ३,६०० रुपये किमतीच्या मद्याच्या बॉटल सापडल्या आहेत. या प्रकरणी वाहनचालक आर. व्ही. पवार याच्यावर रबाळे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रॅली, पदयात्रा, बैठकांवर भरनवी मुंबई : शनिवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी बहुतांशी उमेदवारांनी आपापल्या परीने शक्तिप्रदर्शन करीत मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न केला. बेलापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी रॅलीच्या माध्यमातून प्रचाराची सांगता केली, तर राष्ट्रवादीचे अशोक गावडे यांनी शुक्रवारी रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. मनसेचे उमेदवार गजानन काळे यांनी शेवटच्या दिवशी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा घेऊन मतदारांना गोंजारण्याचा प्रयत्न केला.

बेलापूर मतदारसंघात १७ उमेदवार रिंगणात आहेत. यातील भाजपच्या मंदा म्हात्रे, राष्ट्रवादीचे अशोक गावडे आणि मनसेचे गजानन काळे यांच्यातच खरी लढत असणार आहे. त्यामुळे या तिन्ही उमेदवारांनी शेवटच्या टप्प्यात आक्रमक प्रचारावर भर दिला. प्रचार रॅली, पदयात्रा, सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठका आदीच्या माध्यमातून मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची एकमेव सभा वगळता बेलापूरमध्ये एकाही बड्या नेत्यांची सभा झाली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. तर राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी छोटेखानी सभा घेऊन भाजप उमेदवारासाठी मतदारांकडे साकडे घातले. शनिवारी प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने सर्वच उमेदवारांनी अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019ElectionनिवडणूकVotingमतदान