शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

आंदोलन हाताळण्यात पोलिसांचेही अपयश; गोपनीय शाखेचाही जनतेशी संवाद तुटतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 04:00 IST

मराठा आंदोलनादरम्यान सर्वात मोठा उद्रेक नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात झाला. आंदोलकांनी चौकी व वाहनांची जाळपोळ करून पोलिसांनाही जखमी केले.

- नामदेव मोरेनवी मुंबई : मराठा आंदोलनादरम्यान सर्वात मोठा उद्रेक नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात झाला. आंदोलकांनी चौकी व वाहनांची जाळपोळ करून पोलिसांनाही जखमी केले. शांततेमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचा अचानक भडका उडेल, याचा अंदाज पोलीस यंत्रणेला आला नाही. वरिष्ठांकडून वेळेत ठोस उपाययोजना झाल्या नसल्याने मोठा उद्रेक झाला. पहिल्या दिवशीची स्थिती हाताळण्यात यंत्रणेला अपयश आले असून, वरिष्ठांच्या फसलेल्या रणनीतीबरोबर गोपनीय शाखेच्या जनतेशी तुटत चाललेल्या संवादामुळे ही स्थिती ओढवल्याचेही मानले जात आहे.मराठा क्रांती मोर्चाची आतापर्यंतची सर्व आंदोलने राज्यातील इतर शहरांप्रमाणे नवी मुंबईमध्येही शांततेमध्ये पार पडली. २५ जुलैच्या बंदची रणनीती ठरविण्यासाठी एक दिवस अगोदर माथाडी भवनमध्ये समाजाच्या सर्व संघटना व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. बंद शांततेमध्ये पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले. समन्वय समितीने त्यांची नावे व मोबाइलनंबरसह पत्रक सोशल मीडियावरून सर्व समाजबांधवांपर्यंत पोहोचविण्यास सुरुवात केली होती. वाशीतील शिवाजी चौकात काही वेळ रास्ता रोको किंवा जास्तीत जास्त पोलिसांच्या सहमतीने काही वेळ महामार्ग रोखण्याचे निश्चित करण्यात आले होते. पनवेलमध्येही अशाच पद्धतीने शांततेमध्ये आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले होते. सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून शांततेमध्येच आंदोलन सुरू झाले होते. दोन्ही महानगरांमध्ये दुपारपर्यंत आंदोलन शांततेमध्येच सुरू होते; परंतु दुपारनंतर आंदोलन उग्र होऊ लागले. महामार्गासह अंतर्गत रोडवरही आंदोलकांनी ठिय्या मांडला. सर्वच रस्ते, ट्रान्सहार्बर मार्ग रोखल्यामुळे शहरवासीयांची कोंडी होऊ लागली. आंदोलकांकडून व कोंडी झालेल्या शहरवासीयांकडून सोशल मीडियावर भडक प्रतिक्रिया उमटू लागल्या. आंदोलनामध्ये नेहमीच्या कार्यकर्त्यांची जागा नव्याने आलेल्या जमावाने घेण्यास सुरुवात केली, यामध्ये काही समाजकंटक घुसल्याची चर्चाही सुरू झाली. या सर्व गोष्टींचे गांभीर्य यंत्रणेला वेळेत आले नाही.दुपारनंतर आंदोलक आक्रमक होत गेले व त्यांना वेळेत शांत करण्यात पोलीस यंत्रणेला अपयश आले. दुपारनंतर परिस्थिती हाताबाहेर गेली. आंदोलक व पोलिसांमध्ये चकमक होऊ लागली. कळंबोलीमध्ये पोलीस उपआयुक्तांसह अनेक कर्मचारी जखमी झाले. पोलीस व्हॅन जाळण्यात आली. कोपरखैरणे परिसरामध्येही वरिष्ठ पोलीस अधिकाºयांसह कर्मचारी जखमी झाले. पोलीस चौकी जाळण्याचा प्रयत्न झाला. राज्यात सर्वात मोठा भडका नवी मुंबईमध्ये उडाला. आंदोलनाला वेगळी दिशा मिळत असल्याचे उशिरा पोलिसांच्या लक्षात आले किंवा वेळेत लक्षात आले; पण उपाययोजना उशिरा करण्यात आल्या. उशिरा लाठीचार्ज, अश्रुधुरांचा मारा व इतर कडक उपाययोजना करण्यात आल्या व त्यानंतर परिस्थिती नियंत्रणामध्ये येऊ लागली. इंटरनेट सेवा बंद करण्यापासून सर्व उपाययोजना केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणामध्ये येऊ शकली. पोलिसांना आंदोलनाच्या व्याप्तीचा व दुपारनंतर सोशल मीडियातून सुरू झालेल्या भडकावू संदेशांचा वेळेत अंदाज आला असता, तर कदाचित भडका उडालाच नसता.पोलीस आयुक्तांच्याबदलीची पुन्हा चर्चामराठा आंदोलनाचा नवी मुंबई व पनवेलमध्ये भडका उडाला. पोलिसांनी चांगली कामगिरी केली. एखाद्या गुन्ह्याचा उलगडा केला की सर्वांचे कौतुक होते. त्याप्रमाणे एखादा गंभीर गुन्हा किंवा घटना झाल्यानंतर तत्काळ टीकाही सुरू होते. पहिल्या दिवशी आंदोलन हाताळण्यात पोलीस अपयशी ठरल्याची चर्चा होऊ लागली असून, सहाजिकच टीकाही होऊ लागली आहे. या टीकेबरोबरच पोलीसआयुक्त हेमंत नगराळे यांच्या बदलीची व बढतीची चर्चाही सुरू झाली आहे. गृहविभागाने राज्यातील पोलीस अधीक्षक व उपआयुक्त दर्जाच्या ९५ अधिकाºयांच्या बदल्या केल्या असून, नवी मुंबईमधील दोन उपआयुक्तांचीही बदली करण्यात आली आहे. नगराळे यांचीही बदली होण्याची चर्चा सुरू झाली आहे. या वेळी त्यांची बदली होणार की पूर्वीप्रमाणे चर्चा हवेत विरणार, याकडेही शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.दंगल नियंत्रणाची यंत्रणा कुठे होतीशहरामध्ये मोठे सण, उत्सव व निवडणुका असल्या की पोलीस रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स, दंगा नियंत्रण पथके तैनात करते. कोणत्याही बंदच्या दरम्यान ही सर्व यंत्रणा शहरात सर्वत्र दिसत असते. या वेळीही ती यंत्रणा असली तरी तिचा प्रभाव सायंकाळपर्यंत फारसा जाणवला नाही. अनेक शहरवासी ही यंत्रणा कुठे होती, असा प्रश्न उपस्थित करू लागले आहेत.नेरुळ पोलिसांची दक्षताआंदोलनादिवशी नेरुळमध्येही दोन हजारांचा जमाव रेल्वे स्टेशनसमोर जमा झाला होता.रेल्वे रोको करण्यासाठी स्टेशनमध्ये घुसण्याच्या स्थितीमध्ये असताना पोलीस अधिकाºयांनी जमावाला थांबविले.आंदोलनामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. रेल्वे अडविल्यास त्यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल होऊन आयुष्यभर परिणाम सहन करावे लागतील, हे निदर्शनास आणून दिले. यामुळे रेल्वे रोको रोखण्यात यश आले व महामार्गासह पाम बीचवरील आंदोलनही शांततेमध्ये पार पडले.शहरात वाशी व इतर ठिकाणीही पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आंदोलन हाताळले.सायंकाळनंतर यंत्रणा दक्षदुपारनंतर आंदोलक आक्रमक झाले; पण त्यांना शांत करण्यात पोलीस अपयशी ठरले. सायंकाळी कोपरखैरणेमध्ये चौकीसमोरच जाळपोळ झाल्यानंतर व तुफान दगडफेकीनंतर यंत्रणा खडबडून जागी झाली. जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दिवसभराची स्थिती हाताळण्यात अपयश आलेल्या पोलिसांनी रात्रीची गंभीर स्थिती व्यवस्थित हाताळली. इंटरनेट सुविधा बंद करण्याचा अत्यंत चांगला निर्णय घेतला. तणाव असलेल्या परिसरामध्ये पोलीस परेड काढण्यात आली. कडक उपाययोजना करण्यात आल्या. दुसºया दिवशी स्वत: पोलीसआयुक्त हेमंत नगराळे कोपरखैरणे व इतर ठिकाणी परिस्थिती हाताळताना दिसत होते. अतितणावाची स्थितीही यंत्रणेने कुशलतेने हाताळली; पण पहिल्या दिवशी तेवढी दक्षता का दिसली नाही, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :PoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबई