शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

प्रकल्पग्रस्तांना विकसित भूखंड, १११ हेक्टर जमिनीचे हस्तांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 09:10 IST

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यामध्ये शासनाने जेएनपीटी बंदर विकसित केले. १९८९ मध्ये या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. प्रत्यक्षात बंदर कार्यान्वित होऊन तीन दशकांचा कालावधी झाल्यानंतरही अद्याप प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यात आले नव्हते.

नवी मुंबई : जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के योजनेअंतर्गत विकसित भूखंड देण्याच्या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी जेएनपीटीकडून १११ हेक्टर जमीन सिडकोकडे हस्तांतर करण्यात येणार असून, याविषयी सामंजस्य करारावर शुक्रवारी स्वाक्षरी करण्यात आली. या योजनेचा ११ हजार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यामध्ये शासनाने जेएनपीटी बंदर विकसित केले. १९८९ मध्ये या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. प्रत्यक्षात बंदर कार्यान्वित होऊन तीन दशकांचा कालावधी झाल्यानंतरही अद्याप प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यात आले नव्हते. सिडकोच्या धर्तीवर जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के योजना लागू करावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली हाेती. प्रकल्पग्रस्तांच्या पाठपुराव्यानंतर शासनाने २०१४ मध्ये मागणी मान्य केली होती. या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. अखेर जेएनपीटीने साडेबारा टक्के योजनेअंतर्गत विकसित भूखंड उपलब्ध करून देण्यासाठी १११ हेक्टर जमीन सिडकोकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिडकोला भूखंड वितरणाचा अनुभव असल्यामुळे त्यांच्यावर प्रकल्पग्रस्तांना प्रत्यक्षात भूखंडांचे वाटप करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयात बैठक झाली होती. या बैठकीत सिडकोचे उपाध्यक्ष तथा संचालक डॉ. संजय मुखर्जी, जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी सामंजस्य करारावर सही केली. कराराप्रमाणे जेएनपीटीकडून साडेबारा टक्के योजनेचे भूखंड विकसित करण्यासाठी १११ हेक्टर जमीन सिडकोकडे हस्तांतर करण्यात येणार आहे. ११ हजार लोकांना होणार लाभया क्षेत्रासाठी सिडको विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून काम पाहणार आहे. या योजनेचा आराखडाही सिडको तयार करणार आहे. भूखंड विकसित करण्याकरिता जेएनपीटीकडून सिडकोला विकासापोटी येणारा खर्च तसेच प्रत्यक्ष खर्चाच्या ५ टक्के पर्यवेक्षण शुल्क देणार आहे. नवी मुंबई भूमी विनियोग अधिनियम २००८ नुसार लाभार्थ्यांना भूखंडाचे वाटप करण्यात येणार आहे. भूखंडांचे वाटप करण्यासाठी सिडकोकडून संगणकीय सोडतीचा अवलंब केला जाणार आहे. ११ हजार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.या सामंजस्य कराराच्या माध्यमातून ११ हजार प्रकल्पबाधितांना लाभ मिळणार आहे. सिडकोच्या वतीने साडेबारा टक्के योजनेअंतर्गत सदर भूखंड विकसित करण्यात येणार असून सिडको हे काम चोखपणे करेल, असा विश्वास आहे.- एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री

शासनाने सिडकोच्या क्षमतांवर विश्वास ठेवून ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. सिडको ही जबाबदारी निश्चितच उत्तमरीत्या पार पाडेल, याची खात्री आहे.- डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना