शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांच्या जीवाशी होतोय खेळ, राखीव जंगलात पशुपक्ष्यांची सुरक्षा ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 01:24 IST

मात्र, याला जेएनपीटीतील सुमारे २०० हेक्टर क्षेत्रात पसरलेले राखीव जंगल अपवाद ठरू लागले आहे.

मधुकर ठाकूरउरण : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वनसंपदा, वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने कायदे केले आहेत. मात्र, याला जेएनपीटीतील सुमारे २०० हेक्टर क्षेत्रात पसरलेले राखीव जंगल अपवाद ठरू लागले आहे. येथील दुर्मीळ वन्यप्राणी भटकंती व भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनाखाली येऊन हकनाक बळी जात आहेत. वारंवार अशा घटना घडू लागल्या आहेत. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याऐवजी जेएनपीटी प्रशासन आणि वनविभागाचे अधिकारी परस्परांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत.जेएनपीटी बंदर सुमारे ३५०० हेक्टर क्षेत्रावर पसरलेले आहे. यापैकी १२०० हेक्टर क्षेत्र कांदळवन आणि हरितपट्ट्यासाठी आरक्षित आहे. तर इको पार्कसाठी १६० क्षेत्र आरक्षित ठेवण्यात आले आहे. जेएनपीटी प्रशासन भवनाला लागूनच असलेल्या सुमारे १५० ते २०० हेक्टर क्षेत्रावर राखीव जंगल आहे. जेएनपीटी बंदर उभारण्यात येण्यापूर्वीपासूनच हे जंगल अस्तित्वात असून, या जंगलाच्या सीमेला लागूनच शेवा आणि हनुमान कोळीवाडा ही दोन गावे अस्तित्वात होती.जेएनपीटी बंदर उभारणीसाठी ही दोन्ही गावे विस्थापित करण्यात आली. त्यानंतर बंदरासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींचा ताबा आपसूकच जेएनपीटीकडे आला आहे. त्यामुळे वनखात्याच्या अखत्यारीतील राखीव जंगलही जेएनपीटीच्या मालकीचे झाले आहे. या जंगलातच नौदलाच्या एअरफोर्सचा तळही पूर्वीपासून कार्यरत आहे. १९८० च्या दशकात उभारण्यात आलेले जेएनपीटी बंदर आता मे महिन्यात ३२ व्या वर्षात पदार्पण करणार आहे.राखीव जंगल मोर, लांडोर व इतर स्थलांतरित विविध आकर्षक जातीच्या पक्ष्यांच्या वास्तव्यांमुळे आणि किलबिलाटाने गजबजले आहे. याशिवाय दुर्मीळ जातीचे कोल्हे, भेकरे, ससे, माकडे, रानडुक्कर, रानमांजर आदी वन्यप्राणीही मोठ्या संख्येने वास्तव्य करून आहेत. जंगलातील दुर्मीळ कोल्हे, भेकरे भक्ष्याच्या शोधात अनेकदा रात्रीच्या वेळी जंगलाबाहेर पडतात. मात्र, जेएनपीटीच्या बंदरातील कंटेनर वाहतुकीमुळे अपघात होऊन त्यांचा बळी जात आहे.>‘वनविभागाला सहकार्य करणार’जेएनपीटी परिसरातील विविध रस्त्यांवर अशा घटना वारंवार घडत असून त्यामुळे वन्यजीवांना प्राणास मुकावे लागत आहे. याबाबत उपाययोजना करण्याबाबत जेएनपीटी गांभीर्याने विचार करीत असल्याचे प्रोजेक्ट, प्लॉनिंग अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट विभागाचे व्यवस्थापक व्ही. जी. घरत यांनी सांगितले.वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चर्चा करण्याची तयारीही जेएनपीटीने दाखविली आहे. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी वनविभागाने प्रस्ताव दिल्यास जेएनपीटी सहकार्य करेल, अशी माहितीही घरत यांनी दिली.