शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
2
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
3
“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार
4
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी
5
अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...
6
IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?
7
एका कोंबड्यानं घेतला तिघांचा जीव; दोन भावांसह एका युवकाचा मृतदेह विहिरीत सापडला
8
बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड
9
पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
10
Lok Sabha Elections: "समस्या केवळ दोन कारणांमुळे उद्भवतात...", सचिनने सांगितले मतदानाचे महत्त्व
11
Multibagger Share : ₹१६५० पार जाणार 'हा' शेअर, लिस्टिंगनंतर सातत्यानं देतोय नफा; १३०० टक्क्यांची वाढ
12
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
13
पवईमध्ये मतदार भडकले, EVM मशीन बंद; आदेश बांदेकरांनी शेअर केला Video
14
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
15
गरोदर दीपिकाला मतदान केंद्राबाहेर सांभाळताना दिसला रणवीर सिंह, बेबीबंप पाहून चाहते म्हणाले...
16
Fact Check: राहुल गांधींच्या हातातील 'ते' लाल रंगाचं संविधान चीनचं नाही; व्हायरल दावा चुकीचा
17
Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?
18
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
19
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
20
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण

विद्यार्थ्यांनी जमा केला प्लास्टिक कचरा; पानथळ दिनानिमित्त उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 4:47 AM

कोलाज चित्राचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते अनावरण

नवी मुंबई : महापालिकेचे मुख्यालय सिंगल युज प्लास्टिकमुक्त करण्यात आले आहे. प्लास्टिक प्रतिबंधाच्या दृष्टीने टेरी आणि युएनईपी (संयुक्त राष्ट्र पर्यावरण संस्था) यांच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या उपक्रमात नागरिकांनी सहभाग घेऊन प्लास्टिकमुक्त नवी मुंबईसाठी पुढाकार घेतल्याचे मत महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी व्यक्त केले.

टेरी व युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेन्ट आणि नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वाशीतील सागर विहार येथे जागतिक पाणथळ दिवसाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी टाकाऊ प्लास्टिक बाटल्यांमध्ये टेरी संस्थेच्या संकल्पनेतून विद्यार्थी, स्वयंसेवक यांनी तयार केलेल्या वृक्षरोपांचे वितरण करण्यात आले.

‘प्लास्टिकविषयी पुनर्विचार’ या संकल्पनेअंतर्गत प्लास्टिक कचºयापासून तयार करण्यात आलेल्या कोलाज चित्राचे अनावरण आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे माजी मुख्य सचिव जे.एस. सहारिया, टेरी संस्थेचे मुख्य सल्लागार माजी सनदी अधिकारी जी. एस. गील, भारत सरकारचे उच्च अधिकारी लोविश अहुजा, नवी मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण तदर्थ समिती सभापती दिव्या गायकवाड, उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, डॉ. अंजली पारसनीस, यूएनईपीच्या प्लास्टिक प्रदूषण सल्लागार सलोनी गोयल व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी सहारिया यांनी रिथींक प्लास्टिक उपक्रमाचे कौतुक करून युवकांचा सहभाग लक्षणीय असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. प्लास्टिक प्रदुषणाविरुद्ध वैयक्तिक आणि संस्थात्मक पातळीवर भरीव काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी व्यक्त केली.

टेरी संस्थेचे मुख्य सल्लागार निवृत्त सनदी अधिकारी जी.एस. गील यांनी नवी मुंबई शहर इको सिटी बनण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असून त्यादृष्टीने टेरी संस्था सहयोगाने काम करीत असल्याचे सांगितले. तर प्लास्टिक प्रतिबंधाबाबत एक अभिनव प्रकल्प राबविण्याबाबतही काम सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

रिथींक प्लास्टिक संकल्पनेबद्दल बोलताना टेरी संस्थेच्या सहसंचालक डॉ. अंजली पारसनीस यांनी टाकाऊ प्लास्टिक बाटल्यांमध्ये पिंपळ, उंबर, वड अशा देशी वृक्षांची रोपे तयार करून त्यांचे संवर्धन करण्यातून प्लास्टिकचा पुनर्वापर व पुनर्उपयोग तसेच पर्यावरण संरक्षण हे विविध हेतू साध्य होत असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे त्यांनी खारफुटीचे महत्त्वही विषद केले. यावेळी उपस्थित स्वयंसेवक व नागरिकांनी १०० किलोपेक्षा जास्त प्लास्टिक संकलित केले व नवी मुंबई महानगरपालिकेकडे योग्य विल्हेवाट लावण्यासाठी प्रदान केले.

उपक्रमात वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, आय.सी.एल. महाविद्यालय, नेरूळचे रामराव आदिक तंत्र महाविद्यालय, एस.आय.ई.एस. महाविद्यालय तसेच इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ एनव्हायर्मेंट मॅनेजमेंट, एन.एस.एस.चे विद्यार्थी सहभागी झाले होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMaharashtraमहाराष्ट्र