शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

प्लॅस्टिकविरोधात पालिकेची मोहीम तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 02:11 IST

पंधरा दिवसांत २६ टन साठा जप्त : दारावेसह एपीएमसी परिसरातही छापासत्र

नवी मुंबई : प्लॅस्टिकविरोधात नवी मुंबई महानगरपालिकेने तीव्र मोहीम सुरू केली आहे. होळीपासून शहरामध्ये तब्बल २६ टन साठा जप्त केला असून, ही राज्यातील सर्वात विक्रमी कारवाई आहे. बुधवारीही विविध ठिकाणी छापा टाकून आठ टनांपेक्षा जास्त माल जप्त केला आहे.

शासनाने राज्यामध्ये प्लॅस्टिकबंदी केली आहे; परंतु हे नियम धाब्यावर बसवून व्यापारी बिनधास्तपणे प्लॅस्टिकचा वापर करत आहेत. भाजी मंडईपासून सर्वच ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनीही नागरिकांना वारंवार आवाहन करून प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करू नये, असे आवाहन केले आहे. स्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबईने देशपातळीवर नावलौकिक मिळविला आहे. देशातील सातव्या क्रमांकाचे शहर म्हणून नवी मुंबईचा नावलौकिक आहे. गतवर्षी घनकचरा व्यवस्थापनामध्ये देशात प्रथम क्रमांक मिळविला होता. शहराचा हा नावलौकिक कायम ठेवण्यासाठी प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणीही काटेकोरपणे होणे आवश्यक आहे; पण व्यापारी व नागरिकही याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे अखेर महापालिकेने कडक कारवाई सुरू केली आहे.

होळी दिवशी महापालिकेने सीबीडी व एमआयडीसीमध्ये छापा टाकून एकाच दिवशी तब्बल १५ टनांपेक्षा जास्त प्लॅस्टिकचा साठा जप्त केला. त्यानंतर शहरभर छापासत्र सुरूच आहे. बुधवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, दारावे गाव व इतर ठिकाणी छापा टाकण्यात आला. तब्बल आठ टनांपेक्षा जास्त प्लॅस्टिक जप्त केले आहे. आयुक्त रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील, महावीर पेंढारी, उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, तुषार पवार, विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांच्यासह पथकाने बुधवारी ही कारवाई केली. महापालिकेने सुरू केलेल्या कारवाईमुळे प्लॅस्टिकचा अवैधपणे वापर करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. नागरिकांनीही प्लॅस्टिकचा वापर केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महापालिकेने दिला आहे.बेलापूरमध्ये दहा टन साठामहापालिकेने २० मार्चला बेलापूर सेक्टर २० मधील सावन हार्मोनी इमारतीच्या मागील भूखंड क्रमांक ८४ वरील इमारतीमध्ये छापा टाकला. याठिकाणी तब्बल दहा टन प्लॅस्टिक व थर्माकोलचा साठा जप्त केला असून ही राज्यातील सर्वात मोठ्या कारवाईमध्ये याचा समावेश आहे.एमआयडीसीमध्ये कारखानासीबीडीमध्ये होळीदिवशी सापडलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांवर पावणे एमआयडीसीमधील प्लॉट नंबर ३३९ वरील कंपनीचा उल्लेख होता. महापालिकेच्या पथकाने तत्काळ त्या कंपनीवर धाड टाकून पाच टन साठा जप्त केला. यामध्ये पिशव्या बनविण्यासाठीच्या कच्च्या मालाचाही समावेश होता.होळीदिवशी दुकानांवर छापाधूलिवंदनला रंग उधळण्यासाठी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा वापर होण्याची शक्यता असल्यामुळे बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे परिसरामधील ३५ पेक्षा जास्त दुकानांवर छापा टाकून ५३५ किलो प्लॅस्टिक जप्त केले आहे.रबाळेमध्ये तीन टन साठामहापालिकेच्या पथकाने २७ मार्चला रबाळे एमआयडीसीमधील आर ५०४ या कंपनीवर छापा टाकला. यामध्ये तब्बल ३ टनपेक्षा जास्त साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मालामध्ये प्लॅस्टिकसह थर्माकोलचाही समावेश होता. संबंधितावर एक लाख रुपयांचा दंडही आकारला होता.एपीएमसीतून तीन टन साठा जप्तमहापालिकेच्या पथकाने बुधवारी एपीएमसीतील माथाडी भवनजवळील दुकानांवर छापा टाकला. दुकानदारांकडून दीड टन साठा जप्त केला व शोभा ट्रेडिंग या व्यावसायिकाकडून दीड टन असा एकूण तीन टनाचा साठा जप्त केला असून त्यांच्याकडून ५० हजार रुपये दंडही वसूल केला आहे.दारावेमध्येही पाच टन साठा सापडलाबुधवारी महापालिकेच्या पथकाने बेलापूर विभागामधील दारावे सेक्टर २३ मध्ये छापा टाकला. त्याठिकाणी तब्बल पाच टनपेक्षा जास्त साठा आढळून आला आहे. संबंधिताकडून ३० हजार रुपये दंडही वसूल करण्यात आला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPlastic banप्लॅस्टिक बंदी