शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

नेरुळमधील नियोजित पक्षी अभयारण्य कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 00:11 IST

सध्याच्या सरकारची उदासीनता : पर्यावरणप्रेमींनी केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई :   नेरूळ एनआरआय येथील पाणथळची जागा पक्षी अभयारण्य म्हणून विकसित करण्याची योजना  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. त्यानुसार संबंधित विभागाला आदेश दिले होते; परंतु सध्याच्या सरकारच्या उदासीनतेमुळे  ही योजना कागदावरच राहिल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. राज्य सरकारने तातडीने कार्यवाही करून एनआरआयसह पांजे-फुंडे येथील पानथळच्या जागेवर पक्षी अभयारण्य विकसित करावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

पांजे आणि एनआरआयच्या टी.एस. चाणक्यजवळील पाणथळवर दरवर्षी मोठ्या प्रमाणात परदेशी पक्षी स्थलांतर करतात; परंतु या जागा नष्ट करून या ठिकाणी सिमेंटची जंगले विकसित करण्याचा घाट सिडकोने घातला आहे. सिडकोच्या या प्रयत्नाला पर्यावरणप्रेमी संस्था मागील अनेक वर्षांपासून विरोध करीत आहेत. या दोन्ही जागांवर पक्षी अभयारण्य विकसित करावे, यासाठी या संस्थांचा राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. डिसेंबर २0१५ मध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली  राज्य वन्यजीव मंडळाची दहावी बैठक झाली होती. या बैठकीत फडणवीस यांनी मुंबई प्रदेशात तीन ठिकाणी पक्षी अभयारण्य उभारण्यास मंजुरी दिली होती. यात माहुल शिवडी, नवी मुंबईतील पामबीचलगत टीएस चाणक्यचा परिसर आणि उरण येथील  पांजे-फुंडे या जागांचा समावेश होता. त्यामुळे फ्लेमिंगोंचे संवर्धन करणे शक्य होईल, असा विश्वास फडणवीस यांनी त्यावेळी व्यक्त केला होता; परंतु सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने या निर्णयाला केराची टोपली दाखविल्याचा आरोप नेटकनेक्ट फाउंडेशचे संचालक बी.एन. कुमार यांनी केला आहे.  सध्या पांजे येथील नियोजित पक्षी अभयारण्याच्या स्थळाची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी राजरोसपणे मातीचा भराव टाकला जात आहे. खाडीच्या पाण्याचा प्रवाह रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याविरोधात पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी राज्य सरकारकडे तक्रारी केल्या आहेत, तर काही संस्थांनी थेट न्यायालयात धाव घेतली.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने दिला होता पाठिंबा 

पाणजे आणि टीएससी-एनआरआय या ठिकाणी पक्षी अभयारण्य उभारण्याबाबत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बीएनएचएस) सुद्धा पाठिंबा दर्शविला आहे.  संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशासाठी एका विस्तृत जागेत जैवविविधता प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव बीएनएसएसचे संचालक डॉ. बिशाव पांडाव यांनी सादर केल्याची माहिती बी.एन. कुमार यांनी दिली आहे. 

दरम्यान,  पांजे पाणथळचे काँक्रीटच्या जंगलात, तर टीएससी-एनआरआय पाणथळचे गोल्फ कोर्समध्ये रूपांतर करण्याची संबधितांची योजना आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही योजना मोडीत काढून दोन्ही ठिकाणी पक्षी अभयारण्य विकसित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या एकवीरा आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार पवार यांनी केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई