शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
2
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
3
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
4
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
5
त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...”
6
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
7
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
8
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
9
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
10
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
11
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
12
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
13
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
14
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
15
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
16
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट
17
Life Lesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
18
जामताडा बनण्याच्या मार्गावर 'हे' शहर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
19
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
20
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा

नेरुळमधील नियोजित पक्षी अभयारण्य कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 00:11 IST

सध्याच्या सरकारची उदासीनता : पर्यावरणप्रेमींनी केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई :   नेरूळ एनआरआय येथील पाणथळची जागा पक्षी अभयारण्य म्हणून विकसित करण्याची योजना  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. त्यानुसार संबंधित विभागाला आदेश दिले होते; परंतु सध्याच्या सरकारच्या उदासीनतेमुळे  ही योजना कागदावरच राहिल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. राज्य सरकारने तातडीने कार्यवाही करून एनआरआयसह पांजे-फुंडे येथील पानथळच्या जागेवर पक्षी अभयारण्य विकसित करावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

पांजे आणि एनआरआयच्या टी.एस. चाणक्यजवळील पाणथळवर दरवर्षी मोठ्या प्रमाणात परदेशी पक्षी स्थलांतर करतात; परंतु या जागा नष्ट करून या ठिकाणी सिमेंटची जंगले विकसित करण्याचा घाट सिडकोने घातला आहे. सिडकोच्या या प्रयत्नाला पर्यावरणप्रेमी संस्था मागील अनेक वर्षांपासून विरोध करीत आहेत. या दोन्ही जागांवर पक्षी अभयारण्य विकसित करावे, यासाठी या संस्थांचा राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. डिसेंबर २0१५ मध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली  राज्य वन्यजीव मंडळाची दहावी बैठक झाली होती. या बैठकीत फडणवीस यांनी मुंबई प्रदेशात तीन ठिकाणी पक्षी अभयारण्य उभारण्यास मंजुरी दिली होती. यात माहुल शिवडी, नवी मुंबईतील पामबीचलगत टीएस चाणक्यचा परिसर आणि उरण येथील  पांजे-फुंडे या जागांचा समावेश होता. त्यामुळे फ्लेमिंगोंचे संवर्धन करणे शक्य होईल, असा विश्वास फडणवीस यांनी त्यावेळी व्यक्त केला होता; परंतु सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने या निर्णयाला केराची टोपली दाखविल्याचा आरोप नेटकनेक्ट फाउंडेशचे संचालक बी.एन. कुमार यांनी केला आहे.  सध्या पांजे येथील नियोजित पक्षी अभयारण्याच्या स्थळाची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी राजरोसपणे मातीचा भराव टाकला जात आहे. खाडीच्या पाण्याचा प्रवाह रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याविरोधात पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी राज्य सरकारकडे तक्रारी केल्या आहेत, तर काही संस्थांनी थेट न्यायालयात धाव घेतली.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने दिला होता पाठिंबा 

पाणजे आणि टीएससी-एनआरआय या ठिकाणी पक्षी अभयारण्य उभारण्याबाबत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बीएनएचएस) सुद्धा पाठिंबा दर्शविला आहे.  संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशासाठी एका विस्तृत जागेत जैवविविधता प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव बीएनएसएसचे संचालक डॉ. बिशाव पांडाव यांनी सादर केल्याची माहिती बी.एन. कुमार यांनी दिली आहे. 

दरम्यान,  पांजे पाणथळचे काँक्रीटच्या जंगलात, तर टीएससी-एनआरआय पाणथळचे गोल्फ कोर्समध्ये रूपांतर करण्याची संबधितांची योजना आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही योजना मोडीत काढून दोन्ही ठिकाणी पक्षी अभयारण्य विकसित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या एकवीरा आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार पवार यांनी केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई