शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 09:26 IST

Navi Mumbai News: अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर विमाने आणि विमानतळांच्या सुरक्षेबाबत विविध स्तरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क: अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर विमाने आणि विमानतळांच्या सुरक्षेबाबत विविध स्तरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यात लवकरच शुभारंभ होऊ घातलेल्या नवी मुंबई विमानतळावरील टेक ऑफ आणि लॅन्डिंगच्या मार्गात उघड्यावर होणाऱ्या प्राण्यांच्या कत्तलीसह विविध स्वरूपाच्या २२५ अडथळ्यांची नोटोम अर्थात ‘नोटीस टू एअर मन’ यादी डीजीसीएच्या सूचनेनुसार जाहीर झाली होती. ही अडथळ्यांची शर्यत पार करण्याचे आव्हान सिडको, नवी मुंबई विमानतळ कंपनीसमोर आहे. प्राणी कत्तलीची तक्रार नॅट कनेक्ट फांउडेशनचे संचालक बी.एन. कुमार यांनी थेट मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

मे महिन्यात ‘नोटोम’लिस्टनुसार नवी मुंबई विमानतळाच्या मार्गातील २२५ अडथळे डीजीसीएने दूर करण्यास सांगितले होते. या अडथळ्यांचा मार्च २०२५ मध्ये विमानतळाचा समावेश भारताच्या एरोनॉटिकल इन्फॉर्मेशन पब्लिकेशन (एआयपी) मध्ये केला होता. सुरक्षित विमान वाहतूक,  संचलनासाठी आवश्यक तांत्रिक वैशिष्ट्यांचा तपशील एआयपी नोंदीमध्ये दिला होता. यात धावपट्टीची लांबी, विमान पार्किंग, इंधन उपलब्धतासारख्या पायाभूत सुविधांचा उल्लेख असला, तरी विमानतळाजवळील २२५ संभाव्य अडथळ्यांचा मुद्दा होता.

यातील किती  अडथळे दूर झालेत, हे गुलदस्त्यात असले तरी विमानतळ कंपनी आणि सिडकोने याबाबत कार्यवाही सुरू केली. यानुसारच अदानी एअरपोर्ट होल्डिंग कंपनीने उलवे, द्रोणागिरी, बेलापूर ते नेरूळ-सीवूड परिसरातील सोसायट्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. टेरेसवरील मोबाइल टॉवर्स, पाण्याच्या टाक्यांसह इतर उंच अडथळू दूर करण्यास सांगितले आहे. एआयपीने २२५ अडथळे सांगितले तरी यात मोठे अडथळे जास्त नाहीत, असे अधिकाऱ्याने नाव न सांगता सांगितले.

असे आहेत २२५ अडथळेयामध्ये ८६ इमारती, ७९ टेकड्या, २३ पॉवर ट्रान्समिशन टॉवर्स, १२ मोबाइल टॉवर्स, ८ फ्लडलाइट पोल यांचा समावेश होता. विमानांच्या सुरक्षित हालचालींसाठी हे अडथळे दूर करण्यास सांगितले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रNavi Mumbaiनवी मुंबई