शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनबद्ध बंदोबस्तामुळे नवी मुंबईत शांतता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 01:59 IST

पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे गुरुवारी सकल मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या बंदचा नवी मुंबईवर फारसा परिणाम झाला नाही.

नवी मुंबई : पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे गुरुवारी सकल मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या बंदचा नवी मुंबईवर फारसा परिणाम झाला नाही. दोन दिवस अगोदरच सकल मराठा आरक्षण समन्वय समितीने नवी मुंबईचा बंदमध्ये सहभाग नसल्याची घोषणा केली होती. यानंतरही आंदोलनाच्या आडून समाजकंटकांकडून दगडफेक होण्याच्या भीतीमुळे काही व्यावसायिकांनी दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवली होती.सरकारने दिलेल्या आश्वासनावर अविश्वास ठेवत सकल मराठा समाजाने गुरुवारी राज्यात बंदची हाक दिली होती. परंतु २५ जुलैच्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नवी मुंबईत आंदोलन होऊ नये अशी पोलिसांची धारणा होती. त्याकरिता पोलिसांनी माथाडी नेते, सकल मराठा समन्वय समिती तसेच स्थानिक यांच्यात बैठका घेतल्या होत्या. यावेळी पोलिसांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत नवी मुंबईत बंद होणार नसल्याची घोषणा सकल मराठा आरक्षण समन्वय समिती व माथाडी नेते यांनी संयुक्तपणे केली होती. त्यानंतरही काही व्यक्ती अथवा संघटना यांच्याकडून नवी मुंबई बंदच्या घोषणा केल्या जात होत्या. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पुरेपूर खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आली होती. शहरात प्रत्येक महत्त्वाच्या चौकांमध्ये, रेल्वेस्थानके, चित्रपटगृहे तसेच इतर आवश्यक ठिकाणी चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. एखाद्या ठिकाणी हिंसा घडल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शीघ्र कृती दल, दंगल निवारण पथक, राज्य राखीव पोलीस बल यांच्याही तुकड्या सक्रिय ठेवण्यात आल्या होत्या. त्यानुसार संपूर्ण शहरात दीड हजाराहून अधिक पोलीस बंदोबस्तावर कार्यरत होते. त्याशिवाय पोलिसांच्या गस्ती पथकांकडून देखील दिवसभर प्रत्येक विभागाचा आढावा घेतला जात होता. यादरम्यान पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्यासह सर्व उपआयुक्त, सहायक आयुक्त हे देखील प्रत्येक ठिकाणी भेटी देत होते.२५ जुलैच्या आंदोलनावेळी कळंबोली व कोपरखैरणेत दगडफेक होऊन तणाव निर्माण झालेला. यामुळे पुन्हा त्याठिकाणी असा प्रकार घडू नये याची खबरदारी पोलिसांनी घेतली होती. त्याकरिता कळंबोली येथे मुंबई-पुणे महामार्गाभोवती सुरक्षा कवच तयार केले होते, तर कोपरखैरणेत ठिकठिकाणी लावलेल्या पोलीस बंदोबस्तामुळे परिसराला छावणीचे रूप आले होते. सकाळपासून सेक्टर १५ येथील नाक्यावर वेगवेगळ्या कारणांनी मोठ्या संख्येत जमाव जमा होत होता. या जमावाकडून अनपेक्षितपणे वाशी-कोपरखैरणे मार्ग अडवला जाण्याची शक्यता होती. यामुळे पोलिसांकडून जमावाला सतत पांगवले जात होते. मागच्या आंदोलनाला शहरात गालबोट लागल्याने पुन्हा हिंसेच्या भीतीपोटी अनेकांनी घराबाहेर निघण्याचे टाळले. दुपारनंतर मात्र अनेकांनी परिस्थितीचा आढावा घेऊन घराबाहेर निघण्यास सुरुवात केल्यानंतर व्यावसायिकांनीही दुकाने उघडली.>अफवांचे पीक; पोलिसांची दमछाकपोलिसांवरील ताण वाढवण्यासाठी अज्ञातांकडून अफवा पसरवल्या जात होत्या. हॉटेलवर दगडकेक झाली, बस फोडली, टायर जाळले असे फोन कॉल पोलीस ठाण्यात खणखणत होते. प्रत्यक्षात मात्र पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेतल्यानंतर ती अफवा असल्याचे समोर येत होते. मात्र, प्रत्येक ठिकाणी धाव घेण्याच्या प्रयत्नात पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.>एपीएमसीचेपाचही मार्केट बंदएपीएमसीचे पाचही मार्केट बंदमधून वगळण्यात आले होते, परंतु दोन मार्केटनी बंदमध्ये सहभागी असल्याची दोन दिवसांपूर्वीच घोषणा केली. अशातच उर्वरित तीन मार्केट सुरू राहिल्यास त्याठिकाणी येणाऱ्या शेतमालाच्या वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न होता. शिवाय मार्केटमधून राज्याच्या विविध भागात जाणारी वाहने तिथपर्यंत पोचतील काही नाही याचीही शंका होती. यामुळे गुरुवारी पाचही मार्केट बंद ठेवण्यात आल्याने त्याठिकाणी शुकशुकाट पसरला होता. दरम्यान, काही तरुणांनी तिथे सुरू असलेली काही दुकाने जबरदस्तीने बंद करण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई