शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

रखडलेल्या उड्डाणपुलांमुळे प्रवासी वेठीस; वाशी खाडीपुलावर रोज चक्का जाम

By नामदेव मोरे | Updated: December 14, 2022 08:57 IST

मुंबई-नवी मुंबईला जोडणारा प्रमुख मार्ग म्हणून सायन-पनवेल महामार्गाचा समावेश होतो.

- नामदेव मोरेलाेकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील वाशी खाडीपूल व तुर्भे पुलाच्या रुंदीकरणाचे काम धिम्या गतीने सुरू असून, प्रतिदिन एक लाख वाहतूकदारांना याचा फटका बसत आहे. वाशी टोलनाका परिसरात नियमित चक्का जाम होत आहे. तुर्भेमध्ये वाहतूक बदलाचे सूचना फलकच नसल्यामुळे वाहतूकदारांना ठाणे-बेलापूर रोडवर पोहोचण्यासाठी दोन किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे. रिक्षा, टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांच्या खिशालाही कात्री लागत असून, उड्डाणपुलांचे काम कधी पूर्ण होणार?, असा संतप्त प्रश्न प्रवासी विचारू लागले आहेत.

मुंबई-नवी मुंबईला जोडणारा प्रमुख मार्ग म्हणून सायन-पनवेल महामार्गाचा समावेश होतो. या मार्गावरून प्रतिदिन ८० हजार ते १ लाख वाहनांची ये-जा सुरू असते. या रोडवरील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी शासनाने वाशी खाडीपुलावर ऑक्टोबर २०२० पासून तिसरा पूल बांधण्याचे काम सुरू केले आहे. जवळपास ७७५ कोटी रुपये खर्च करून १२.७० मीटर रुंद व १८३७ मीटर लांबीच्या या पुलाचे काम नाेव्हेंबर २०२३ मध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु विविध कारणांमुळे हे काम रखडले असून, ते पूर्ण होण्यास २०२४ ची वाट पाहावी लागणार आहे. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाशी गाव ते टोल नाका व नवी मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवर टोल नाका ते खाडीपुलाच्या मध्यापर्यंत रोज वाहतूककोंडी होत आहे. जवळपास ८५० मीटर अंतर पूर्ण करण्यासाठी तीन मिनिटांऐवजी १५ ते ३० मिनिटे वेळ घालवावा लागत आहे.

वाशी खाडीपुलाप्रमाणे सायन-पनवेल महामार्गावर तुर्भे पुलाच्या विस्तारीकरणाचे कामही रखडले आहे. २०१९ मध्ये या पुलाचे काम सुरू केले आहे. जुलै २०२२ मध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु अद्याप रेल्वे मार्गिकेवरील गर्डर टाकायचे काम सुरू आहे. या पुलावरून ठाणे बेलापूर रोडवर तुर्भे नाक्याकडे जाणारी मार्गिका तोडण्यात आली आहे. याविषयी योग्य सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत. यामुळे अनेक वाहतूकदारांना शिरवणे व नेरूळवरून वळसा घालून यावे लागत आहे. सानपाडावरून रिक्षाने व टॅक्सीने एमआयडीसीकडे जाणाऱ्या नागरिकांना जादा पैसे मोजावे लागत आहेत.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी