शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

उरणातील युईएस शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात पालकांचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 21:04 IST

पालक-शिक्षक संघटनेच्या ५०० कार्यकर्त्यांची शाळेवर धडक

मधुकर ठाकूर

उरण : उरणातील नामांकित युईएस इंग्रजी माध्यमाच्या शाळेत व्यवस्थापनाने चालविलेल्या मनमानी कारभाराविरोधात सोमवारी (१४) संतप्त झालेल्या पालक-शिक्षक संघटनेने जोरदार निदर्शने करून निषेध व्यक्त केला. उरण तालुक्यातील नामांकित उरण एज्युकेशन सोसायटीची युईएस इंग्रजी माध्यमाची १२ पर्यंत शाळा आहे.या शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात मागील अनेक वर्षांपासून पालक-शिक्षक संघटनेचा संघर्ष सुरू आहे.

नुकतेच पालक-शिक्षक संघटनेला अंधारात ठेवून विद्यार्थ्यांच्या ओळखपत्राच्या नावाखाली ५५० रुपये वसूल करण्यात येत आहेत. दोन दिवसांपूर्वी शाळेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत या वादग्रस्त निर्णयावर संघटना आणि व्यवस्थापन यांच्यात जोरदार वादळी चर्चा झाली. चर्चेत ओळखपत्रासाठी करण्यात येत असलेल्या भरमसाठ फी आकारणी विरोधात संतप्त झालेल्या संघटना आणि पालकांनी धारेवर धरत व्यवस्थापनाची लक्तरे वेशीवर टांगली. त्यामुळे व्यवस्थापनाने बैठकीतुनच काढता पाय घेतला.

व्यवस्थापनाचा पळपुटेपणा पालक संघटनेला भावला नसल्याने सोमवारी (१४) शाळेच्या आवारातच उत्स्फूर्तपणे जमलेल्या पालक-शिक्षक संघटनेच्या कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पालकांनी व्यवस्थापना विरोधात जोरदार निदर्शने करून निषेध व्यक्त केला. इतक्यावरच न थांबता पालक-शिक्षक संघटनेचे पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी युईएस व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराचा पाढा वाचून उरण गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली. गटशिक्षण अधिकारी  प्रियांका पाटील यांनीही तक्रारीची दखल घेत चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.दरम्यान गटशिक्षणाधिकारी प्रियांका पाटील यांच्याशीही शाळेच्या मनमानी कारभाराबाबत चर्चा केली असल्याची माहिती उरण गटविकास अधिकारी समीर वाठावकर यांनी दिली.

युईएस शाळा व्यवस्थापनाचा मनमानी कारभाराचा प्रकार मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे.सातत्याने केली जाणारी भरमसाठ फी वाढ विद्यार्थी- पालक वर्गासाठी चिंतेची बाब ठरते आहेच.त्याशिवाय वाढविण्यात आलेली फी पालकांकडून सक्तीने वसूल केली जात आहे.त्यातच आता कहर की काय वसुल करण्यात येत असलेल्या विविध प्रकारच्या फी मधुन ओळखपत्रासाठी आवश्यक फी याआधीच वसुल करण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही ओळखपत्राच्या नावाखाली ५५० रुपये वसूल करण्यात येत आहेत.

शाळा व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारामुळे मात्र विद्यार्थी,पालकांचे नाहक आर्थिक शोषण केले जात आहे.मानसिक स्वास्थ्य बिघडण्याचे कारण ठरू लागले आहे.त्याचा नकळतपणे विपरीत परिणाम पालक, विद्यार्थ्यांवर होत आहे.शाळा व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात याआधी पासुनच संघर्ष सुरू आहे. यापुढेही संघर्ष कायम सुरू राहणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया पालक-शिक्षक संघटनेच्या उपाध्यक्षा ॲड.प्रतिभा भालेराव यांनी व्यक्त केली आहे.

मुले शाळेत येताना आणि शाळा सुटल्यावर बाहेर जाताना पालकांना माहिती देणारी  तंत्रज्ञानाचा वापर करून अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.या अत्याधुनिक यंत्रणेपोटीच फी आकारणी केली जात आहे.६५ टक्के पालकांनी तर फी अदाही केली आहे.मात्र शाळेची नाहक बदनामी करण्याच्या कटकारस्थानामागे काही राजकीय संघटना कार्यरत आहेत.शाळा व्यवस्थापनाचे कामकाज नियमानुसार सुरू आहे.अशी प्रतिक्रिया युईएस संस्थेचे अध्यक्ष तनसुख जैन यांनी दिली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईSchoolशाळाuran-acउरण