शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
3
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
4
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
5
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
6
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
7
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
8
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
9
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
10
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
11
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
12
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
13
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
14
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
15
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
16
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
17
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
18
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
19
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
20
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर

पनवेलमध्ये पावसाचा २९ वर्षांतील विक्रम मोडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 23:44 IST

रायगड कोकणमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. पनवेल तालुक्यातही विक्र मी पावसाची नोंद करण्यात आली आहे

वैभव गायकरपनवेल : रायगड कोकणमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. पनवेल तालुक्यातही विक्र मी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील मुसळधार पावसामुळे मागील २० वर्षांपूर्वीच्या पावसाचा रेकॉर्ड तुटला आहे. यावर्षी पनवेलमध्ये ४७४३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. २६ जुलै २००५ मध्ये पनवेलमध्ये ३६४२ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. विशेष म्हणजे, यापूर्वी १९९० मध्ये ४२२२.८० मि.मी. पावसाची नोंद होती.पनवेल शहरात एक नव्हे तर तब्बल चार वेळा पाणी साचल्याच्या घटना घडलेल्या पाहावयास मिळाल्या. पनवेलच्या ग्रामीण भागालाही या पावसाचा मोठा फटका बसला. या पूरसदृश स्थितीमुळे अनेकांचे नुकसान झाले. त्यामुळे ३५० पेक्षा जास्त कुटुंबांना स्थलांतरित करावे लागले. काही जनावरेही या पावसामुळे दगावली होती. विशेषत: शेतीचे फार मोठे नुकसान या पावसामुळे झाले आहे. शासनाकडून पूरग्रस्तांना आर्थिक मदत देण्यात आली. मात्र, पावसाने झालेल्या नुकसानाच्या तुलनेत ही मदत तुटपुंजीच होती. पनवेलमध्ये झालेल्या विक्र मी पावसाचा फटका पटेल मोहल्ला, टपालनाका, गाढी नदीपात्राजवळील परिसर, बावनबंगला परिसर आदीसह शहरातील गाढी नदीपात्रालगतचे ठिकाण काळुंद्रे, कासाडी नदीलगतच्या ठिकाणांना बसला आहे. या नद्यांच्या लगत तीन ते चार फूट पाणी साचले होते. एकीकडे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी केलेल्या भरावामुळे पाण्याचा नैसर्गिक निचरा होण्यास लागणार उशीर, त्यातच सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने पनवेलकर हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे, २६ जुलै २००५ साली पडलेल्या पावसापेक्षा जास्त पर्जन्यमान २०१० मध्ये झाले होते. अद्याप महाराष्ट्रात परतीचा पाऊस दाखल झाला नसल्याने पावसाचा जोर सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.>२९ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड तुटलापनवेल तालुक्यात यावर्षी ४७३७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी १९९० मध्ये ४२२२.८० मि.मी. पाऊस पनवेल परिसरात पडला होता. मात्र, २०१९ मध्ये पडलेल्या पावसाने १९९० सालच्या पावसाचा विक्रम मोडीत काढला आहे.>२६ जुलै २००५ पेक्षा जास्त पाऊस२६ जुलै २००५ साली ३६४२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली होती. यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे पनवेल, कळंबोली, खारघर, नवीन पनवेल, खांदेश्वर तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. २०१९ साली जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे.>हवामानातील बदलामुळे अशाप्रकारे अतिवृष्टी होत असते. सध्याच्या घडीला जगभरात अशाप्रकारे नवीन समस्या निर्माण झाली आहे, याकरिता पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे.- डॉ. सुरेश दोडके,शास्त्रज्ञ,खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल

टॅग्स :Rainपाऊस