शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

पनवेलमध्ये पावसाचा २९ वर्षांतील विक्रम मोडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 23:44 IST

रायगड कोकणमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. पनवेल तालुक्यातही विक्र मी पावसाची नोंद करण्यात आली आहे

वैभव गायकरपनवेल : रायगड कोकणमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. पनवेल तालुक्यातही विक्र मी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील मुसळधार पावसामुळे मागील २० वर्षांपूर्वीच्या पावसाचा रेकॉर्ड तुटला आहे. यावर्षी पनवेलमध्ये ४७४३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. २६ जुलै २००५ मध्ये पनवेलमध्ये ३६४२ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. विशेष म्हणजे, यापूर्वी १९९० मध्ये ४२२२.८० मि.मी. पावसाची नोंद होती.पनवेल शहरात एक नव्हे तर तब्बल चार वेळा पाणी साचल्याच्या घटना घडलेल्या पाहावयास मिळाल्या. पनवेलच्या ग्रामीण भागालाही या पावसाचा मोठा फटका बसला. या पूरसदृश स्थितीमुळे अनेकांचे नुकसान झाले. त्यामुळे ३५० पेक्षा जास्त कुटुंबांना स्थलांतरित करावे लागले. काही जनावरेही या पावसामुळे दगावली होती. विशेषत: शेतीचे फार मोठे नुकसान या पावसामुळे झाले आहे. शासनाकडून पूरग्रस्तांना आर्थिक मदत देण्यात आली. मात्र, पावसाने झालेल्या नुकसानाच्या तुलनेत ही मदत तुटपुंजीच होती. पनवेलमध्ये झालेल्या विक्र मी पावसाचा फटका पटेल मोहल्ला, टपालनाका, गाढी नदीपात्राजवळील परिसर, बावनबंगला परिसर आदीसह शहरातील गाढी नदीपात्रालगतचे ठिकाण काळुंद्रे, कासाडी नदीलगतच्या ठिकाणांना बसला आहे. या नद्यांच्या लगत तीन ते चार फूट पाणी साचले होते. एकीकडे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी केलेल्या भरावामुळे पाण्याचा नैसर्गिक निचरा होण्यास लागणार उशीर, त्यातच सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने पनवेलकर हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे, २६ जुलै २००५ साली पडलेल्या पावसापेक्षा जास्त पर्जन्यमान २०१० मध्ये झाले होते. अद्याप महाराष्ट्रात परतीचा पाऊस दाखल झाला नसल्याने पावसाचा जोर सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.>२९ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड तुटलापनवेल तालुक्यात यावर्षी ४७३७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी १९९० मध्ये ४२२२.८० मि.मी. पाऊस पनवेल परिसरात पडला होता. मात्र, २०१९ मध्ये पडलेल्या पावसाने १९९० सालच्या पावसाचा विक्रम मोडीत काढला आहे.>२६ जुलै २००५ पेक्षा जास्त पाऊस२६ जुलै २००५ साली ३६४२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली होती. यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे पनवेल, कळंबोली, खारघर, नवीन पनवेल, खांदेश्वर तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. २०१९ साली जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे.>हवामानातील बदलामुळे अशाप्रकारे अतिवृष्टी होत असते. सध्याच्या घडीला जगभरात अशाप्रकारे नवीन समस्या निर्माण झाली आहे, याकरिता पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे.- डॉ. सुरेश दोडके,शास्त्रज्ञ,खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल

टॅग्स :Rainपाऊस