शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पनवेलमध्ये पावसाचा २९ वर्षांतील विक्रम मोडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 23:44 IST

रायगड कोकणमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. पनवेल तालुक्यातही विक्र मी पावसाची नोंद करण्यात आली आहे

वैभव गायकरपनवेल : रायगड कोकणमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. पनवेल तालुक्यातही विक्र मी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील मुसळधार पावसामुळे मागील २० वर्षांपूर्वीच्या पावसाचा रेकॉर्ड तुटला आहे. यावर्षी पनवेलमध्ये ४७४३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. २६ जुलै २००५ मध्ये पनवेलमध्ये ३६४२ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. विशेष म्हणजे, यापूर्वी १९९० मध्ये ४२२२.८० मि.मी. पावसाची नोंद होती.पनवेल शहरात एक नव्हे तर तब्बल चार वेळा पाणी साचल्याच्या घटना घडलेल्या पाहावयास मिळाल्या. पनवेलच्या ग्रामीण भागालाही या पावसाचा मोठा फटका बसला. या पूरसदृश स्थितीमुळे अनेकांचे नुकसान झाले. त्यामुळे ३५० पेक्षा जास्त कुटुंबांना स्थलांतरित करावे लागले. काही जनावरेही या पावसामुळे दगावली होती. विशेषत: शेतीचे फार मोठे नुकसान या पावसामुळे झाले आहे. शासनाकडून पूरग्रस्तांना आर्थिक मदत देण्यात आली. मात्र, पावसाने झालेल्या नुकसानाच्या तुलनेत ही मदत तुटपुंजीच होती. पनवेलमध्ये झालेल्या विक्र मी पावसाचा फटका पटेल मोहल्ला, टपालनाका, गाढी नदीपात्राजवळील परिसर, बावनबंगला परिसर आदीसह शहरातील गाढी नदीपात्रालगतचे ठिकाण काळुंद्रे, कासाडी नदीलगतच्या ठिकाणांना बसला आहे. या नद्यांच्या लगत तीन ते चार फूट पाणी साचले होते. एकीकडे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी केलेल्या भरावामुळे पाण्याचा नैसर्गिक निचरा होण्यास लागणार उशीर, त्यातच सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने पनवेलकर हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे, २६ जुलै २००५ साली पडलेल्या पावसापेक्षा जास्त पर्जन्यमान २०१० मध्ये झाले होते. अद्याप महाराष्ट्रात परतीचा पाऊस दाखल झाला नसल्याने पावसाचा जोर सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.>२९ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड तुटलापनवेल तालुक्यात यावर्षी ४७३७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी १९९० मध्ये ४२२२.८० मि.मी. पाऊस पनवेल परिसरात पडला होता. मात्र, २०१९ मध्ये पडलेल्या पावसाने १९९० सालच्या पावसाचा विक्रम मोडीत काढला आहे.>२६ जुलै २००५ पेक्षा जास्त पाऊस२६ जुलै २००५ साली ३६४२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली होती. यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे पनवेल, कळंबोली, खारघर, नवीन पनवेल, खांदेश्वर तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. २०१९ साली जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे.>हवामानातील बदलामुळे अशाप्रकारे अतिवृष्टी होत असते. सध्याच्या घडीला जगभरात अशाप्रकारे नवीन समस्या निर्माण झाली आहे, याकरिता पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे.- डॉ. सुरेश दोडके,शास्त्रज्ञ,खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल

टॅग्स :Rainपाऊस