शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

रिक्षाचालकांकडून प्रवासी वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2015 00:17 IST

वाशी रेल्वे स्थानक ते कोपरखैरणे मार्गावर प्रवास करणाऱ्यांवर रिक्षाचालकांनी भाडेवाढ लादली आहे. अचानक झालेल्या भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

नवी मुंबई : वाशी रेल्वे स्थानक ते कोपरखैरणे मार्गावर प्रवास करणाऱ्यांवर रिक्षाचालकांनी भाडेवाढ लादली आहे. अचानक झालेल्या भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. वाहतूक पोलिसांनी बेकायदा चौथी सीट बंद केल्याचे निमित्त साधत रिक्षा संघटनेने प्रवाशांना वेठीस धरले आहे.वाशी रेल्वे स्थानक ते कोपरखैरणे मार्गावर धावणाऱ्या रिक्षांच्या भाडेदरात शुक्रवारपासून वाढ झाली आहे. रिक्षाचालक-मालक एकता युनियनने झालेल्या या दरवाढीचा फलक स्थानकाबाहेरील रिक्षा स्टँडवर लावलेला आहे. परंतु अचानक झालेल्या या भाडेवाढीमुळे प्रवाशांचे रिक्षाचालकांसोबत वाद होऊ लागले आहेत. यापुर्वी वाशी स्थानक ते एमजीएमपर्यंत १०, तर कोपरखैरणेपर्यंत २० रुपये घेतले जायचे. मुळात सन २०१४ च्या आरटीओच्या दरपत्रकानुसार हे दर कमीच होते. मात्र आरटीओने वाशी-कोपरखैरणे मार्गावर शेअर रिक्षासाठी २८ रुपये दराची मान्यता दिलेली असतानाही रिक्षाचालक स्वत:च्या सोयीनुसार २० रुपये भाडे आकारत होते. तर दर कमी केल्याच्या बदल्यात रिक्षात बेकायदा चौथा प्रवासी घेतला जायचा. यामुळे वाशी-कोपरखैरणे मार्गावर सर्रास चौथा प्रवासी घेऊनच रिक्षा चालवल्या जात होत्या. मात्र त्याकडे अनेक दिवस डोळेझाक केल्यानंतर वाहतूक पोलिसांनी चौथा प्रवासी घेणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाईला सुरुवात केली आहे. ही कारवाई टाळत होणारा तोटा भरून काढण्यासाठी रिक्षाचालक संघटनेने प्रवास भाड्यात पाच रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सुधारित दरानुसार वाशी स्थानक ते एमजीएमपर्यंत १५, तर कोपरखैरणे पर्यंत २५ रुपये भाडे आकारायला सुरुवात केली आहे. हे दर आरटीओची मान्यता असलेल्या २८ रुपयांपेक्षा कमीच असल्याने त्यात काही गैर नसल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. मात्र आरटीओने जेव्हा भाडेवाढ करायला मान्यता दिलेली तेव्हाच ती लागू न करता त्यात सोयीनुसार बदलाचे अधिकार रिक्षा संघटनांना दिले कोणी, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित होत आहे. तसेच रिक्षात चौथा प्रवासी घेणे बेकायदेशीर असतानाही आरटीओ व वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकांचे लाड कशासाठी पुरवायचे, असाही संताप त्यांच्याकडून व्यक्त होत आहे. यावरून वाशी रेल्वे स्थानकालगतच्या रिक्षा स्टँडवर रिक्षाचालक व प्रवासी यांच्यात वाद होऊ लागले आहेत. त्यामध्ये रिक्षाचालकांची अरेरावीची भाषा सहन करावी लागत असल्याचा संताप महेश जाधव या प्रवाशाने व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)यापूर्वी आरटीओने २८ रुपयांची मान्यता दिलेली असतानाही १० व २० रुपये दर आकारले जात होते. त्याऐवजी चौथा प्रवासी रिक्षात घेतला जायचा. नुकतीच चौथा प्रवासी घेणाऱ्या रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईला सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रवासभाड्यात पाच रुपयांची भाडेवाढ केली आहे.- सुनील बोर्डे, अध्यक्ष, रिक्षाचालक-मालक एकता युनियन