शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

बाहेरील रुग्णांचा नवी मुंबईवर भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 12:41 AM

स्थानिकांची होतेय परवड : राजकीय शिफारशीमुळे प्रशासन हतबल

कमलाकर कांबळेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नवी मुंबईतील खासगी व महापालिकेच्या रुग्णालयांत शहराबाहेरील रुग्णांचा अतिरिक्त भार वाढल्याने स्थानिक रुग्णांची परवड होताना दिसत आहे. मुंबई, ठाणे आणि पनवेल परिसरातील रुग्ण मोठ्या प्रमाणात नवी मुंबईतील विविध रुग्णालयांत उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे करदात्या नवी मुंबईकरांनाच बेडसह इतर आरोग्य सुविधांसाठी वणवण करावी लागत आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. ऑक्सिजन व व्हेंटिलेटर्स बेड‌्सची संख्या अपुरी पडू लागली आहे, तर ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. बेड मिळविण्यासाठी नवी मुंबईकरांना कसरत करावी लागत आहे. विविध स्तरावर प्रयत्न करूनही वेळेत बेड उपलब्ध न झाल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने दर्जेदार सुविधा उपलब्ध केल्या आहेत. विशेष म्हणजे महापालिकेकडे सध्या २३०० ऑक्सिजन बेड‌्स आहेत, तर ५०५ आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड आहेत. सुमारे चार हजार साध्या खाटा आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन येत्या काळात आवश्यकतेनुसार खाटांची संख्या वाढविण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. तसेच खासगी रुग्णालयांतसुद्धा मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड आहेत. असे असतानाही नवी मुंबईकरांना बेड मिळविण्यासाठी मोठे श्रम करावे लागत आहेत. शेजारच्या शहरातील रुग्णांचे अतिक्रमण हे यामागचे कारण असल्याचा आरोप नवी मुंबईकर करू लागले आहेत.निवडणुका रखडल्याने महापालिकेवर सध्या प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. अभिजित बांगर हे महापालिकेचे आयुक्त व प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. कोरोनाच्या महामारीत त्यांचे काम उल्लेखनीय ठरले आहे. त्यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनासुद्धा तितक्याच प्रभावी ठरताना दिसत आहेत. परंतु सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदारांच्या दबावाखाली महापालिका प्रशासन काम करीत असल्याचा आरोप केला जात आहे. कारण शहराबाहेरील रुग्णांना नवी मुंबईत सर्रास बेड उपलब्ध करून दिले जात आहेत. महापालिकेच्याच नव्हे, तर खासगी रुग्णालयांतसुद्धा शेजारच्या शहरातील रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे पहावयास मिळते. त्यामुळे स्थानिक रुग्णांना बेड आणि इतर वैद्यकीय सुविधांसाठी भटकंती करावी लागत आहे. विशेष म्हणजे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनीसुद्धा यासंदर्भात प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत. नवी मुंबईतील ऑक्सिजनचा साठा परस्पर शेजारच्या शहरात वळविला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

सोशल मीडियावर चर्चानवी मुंबई महापालिकेत सध्या लोकनियुक्त प्रतिनिधी नाहीत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची मनमानी सुरू आहे. महापालिका आयुक्त त्याला बळी पडत आहेत. परंतु हे अधिक काळ चालणार नाही. नवी मुंबईतील जनता हा अन्याय कदापी खपवून घेणार नाही, अशा आशयाचे संदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नवी मुंबईत साधारण १० ते १५ टक्के रुग्ण गोवंडी, मानखुर्द, चेंबूर तसेच ठाण्याच्या मुंब्रा परिसरातील आहेत. राजकीय दबावामुळे बाहेरील रुग्णांना अधिक प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे नवी मुंबईतील नागरिकांना बेडसाठी वणवण करावी लागत आहे. या प्रकाराकडे माजी नगरसेवक आणि शहरातील आमदार हतबल होऊन पाहत आहेत, ही नवी मुंबईकरांची मोठी शोकांतिका आहे.- प्रदीप नामदेव म्हात्रे, अध्यक्ष, दिव्यादीप फाउण्डेशन, नवी मुंबई 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या