शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

माथाडींनी धडक देताच कांदा-बटाटा मार्केटचे पाणी सुरू; कामगार समाधानी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 06:14 IST

हमीपत्र देण्याच्या अटीवर पुरवठा झाला पूर्ववत; कामगार समाधानी 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : इमारत धोकादायक असल्याने खबरदारीची म्हणून नवी मुंबई पालिकेने येथील एपीएमसी मार्केटच्या  कांदा-बटाटा मार्केटसह सुविधा इमारतीचा पाणीपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे २० जूनपासून माथाडी  कामगारांसह व्यापाऱ्यांचे हाल होत आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी माथाडी नेते नरेंद्र पाटील, चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी थेट महापालिका मुख्यालयावर धडक दिली. त्यावेळी झालेल्या चर्चेअंती व्यापारी हमी पत्र देण्याच्या अटीवर पालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी पाणीपुरवठा सुरू केला. 

मार्केट परिसरात व्यापारी, माथाडी कामगार मिळून पाच हजार लोक काम करतात. या सर्वांचे पाण्यावाचून प्रचंड हाल सुरू होते. त्यात विशेषत: महिला कामगार, ग्राहकांची तर मोठी कुचंबणा होत होती. मात्र, एपीएमसी प्रशासनाने आपली जबाबदारी झटकून महापालिकेकडे बोट दाखविले होते. 

शिंदेसेनेनेही प्रशासनाला धरले धारेवरकांदा-बटाटा मार्केटची इमारत धोकादायक झाल्याचे कारण पुढे करून महापालिकेने पाणीपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे येणाऱ्या अडचणी व्यापाऱ्यांनी शिंदेसेनेचे उपनेते विजय नाहटा यांना सांगितल्या. त्यानुसार नाहटा यांनी महानगरपालिका प्रशासनाला धारेवर धरून पाणीपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली. 

‘दुर्घटना घडल्यास आम्हीच जबाबदार’- कांदा-बटाटा मार्केटची इमारत अतिधोकादायक झाली आहे. यामुळे पावसाळ्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी शासनाच्या नियमानुसार पाणीपुरवठा खंडित केल्याचे आयुक्त कैलास शिंदे यांनी माथाडी नेत्यांना सांगितले.- त्यानंतर मार्केटमधील प्रत्येक व्यापाऱ्याने आपला गाळा क्रमांक लिहून पावसाळ्यात दुर्दैवाने एखादी दुर्घटना झाल्यास त्याला आम्ही जबाबदार राहू, असे हमीपत्र लिहून दिल्यास पाणीपुरवठा त्वरित सुरू, असे सांगितले. आयुक्तांची अट माथाडी कामगारांनी मान्य केली असून, येत्या दोन दिवसांत हमी पत्र द्यायचे आहे. बैठक संपल्यानंतर लगेच पाणीपुरवठा सुरू झाल्याने व्यापारी आणि माथाडींनी आनंद व्यक्त केला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई