शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

माथाडींनी धडक देताच कांदा-बटाटा मार्केटचे पाणी सुरू; कामगार समाधानी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 06:14 IST

हमीपत्र देण्याच्या अटीवर पुरवठा झाला पूर्ववत; कामगार समाधानी 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : इमारत धोकादायक असल्याने खबरदारीची म्हणून नवी मुंबई पालिकेने येथील एपीएमसी मार्केटच्या  कांदा-बटाटा मार्केटसह सुविधा इमारतीचा पाणीपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे २० जूनपासून माथाडी  कामगारांसह व्यापाऱ्यांचे हाल होत आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी माथाडी नेते नरेंद्र पाटील, चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी थेट महापालिका मुख्यालयावर धडक दिली. त्यावेळी झालेल्या चर्चेअंती व्यापारी हमी पत्र देण्याच्या अटीवर पालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी पाणीपुरवठा सुरू केला. 

मार्केट परिसरात व्यापारी, माथाडी कामगार मिळून पाच हजार लोक काम करतात. या सर्वांचे पाण्यावाचून प्रचंड हाल सुरू होते. त्यात विशेषत: महिला कामगार, ग्राहकांची तर मोठी कुचंबणा होत होती. मात्र, एपीएमसी प्रशासनाने आपली जबाबदारी झटकून महापालिकेकडे बोट दाखविले होते. 

शिंदेसेनेनेही प्रशासनाला धरले धारेवरकांदा-बटाटा मार्केटची इमारत धोकादायक झाल्याचे कारण पुढे करून महापालिकेने पाणीपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे येणाऱ्या अडचणी व्यापाऱ्यांनी शिंदेसेनेचे उपनेते विजय नाहटा यांना सांगितल्या. त्यानुसार नाहटा यांनी महानगरपालिका प्रशासनाला धारेवर धरून पाणीपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली. 

‘दुर्घटना घडल्यास आम्हीच जबाबदार’- कांदा-बटाटा मार्केटची इमारत अतिधोकादायक झाली आहे. यामुळे पावसाळ्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी शासनाच्या नियमानुसार पाणीपुरवठा खंडित केल्याचे आयुक्त कैलास शिंदे यांनी माथाडी नेत्यांना सांगितले.- त्यानंतर मार्केटमधील प्रत्येक व्यापाऱ्याने आपला गाळा क्रमांक लिहून पावसाळ्यात दुर्दैवाने एखादी दुर्घटना झाल्यास त्याला आम्ही जबाबदार राहू, असे हमीपत्र लिहून दिल्यास पाणीपुरवठा त्वरित सुरू, असे सांगितले. आयुक्तांची अट माथाडी कामगारांनी मान्य केली असून, येत्या दोन दिवसांत हमी पत्र द्यायचे आहे. बैठक संपल्यानंतर लगेच पाणीपुरवठा सुरू झाल्याने व्यापारी आणि माथाडींनी आनंद व्यक्त केला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई