शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

अनधिकृतपणे रोडवर कांदा-बटाटा मार्केट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 06:23 IST

शासनाच्या या निर्णयाचा गैरअर्थ घेऊन ४० ते ५० व्यापाऱ्यांनी चक्क भाजी मार्केट व विस्तारित मार्केटबाहेर तळ ठोकला आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या भाजी मार्केटबाहेर रोडवरच कांदा-बटाट्याचे अनधिकृत मार्केट सुरू झाले आहे. रस्ता आडवून सुरू केलेल्या बाजारामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असून तक्रार करूनही महानगरपालिका, पोलीस व एपीएमसी प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.राज्य शासनाने भाजीपाला व फळे नियमणमुक्त केली आहेत. बाजारसमितीच्या बाहेर कोठेही व्यापार करता येईल, असे स्पष्ट केले आहे. शासनाच्या या निर्णयाचा गैरअर्थ घेऊन ४० ते ५० व्यापाऱ्यांनी चक्क भाजी मार्केट व विस्तारित मार्केटबाहेर तळ ठोकला आहे. रोड व पदपथ अडवून कांदा, बटाट्याची अवैधपणे विक्री सुरू केली आहे. रोज किमान ३० ते ४० टन मालाची या ठिकाणी विक्री होत आहे. विस्तारित मार्केट व मूळ मार्केटला जोडणाºया रोडवर या विक्रेत्यांसह खाद्यपदार्थ बनविणाºयांनी अतिक्रमण केले आहे. येथून ये-जा करणेही अशक्य होत आहे. याविषयी ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर प्रशासनाने काही दिवस कारवाई केली होती; पण व्यापाºयांशी अर्थपूर्ण तडजोडी केल्यानंतर पुन्हा विक्री सुरू करण्यात आली आहे. अनधिकृत मार्केटमुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होऊ लागली आहे. विक्रेते बाजारसमितीच्या सुरक्षारक्षकांनाही दमदाटी करत आहेत. यापूर्वी सुरक्षारक्षकांनी अनेक वेळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दिल्या आहेत.अनधिकृतपणे सुरू असलेल्या व्यापाराविरोधात तक्रारी केल्यानंतरही कोणीच ठोस कारवाई करत नाही. आमच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर हा व्यापार होत असल्याचे कारण बाजारसमितीचे अधिकारी देत आहेत. पोलीस प्रशासन कारवाई करण्याचे अधिकार एपीएमसी व महापालिकेचे असल्याचे कारण देऊन जबाबदारी झटकत आहेत.महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी या मार्केटकडे फिरकतच नाहीत. हा व्यापार सकाळच्या सत्रात होत असल्याचे कारण दिले जात आहे; परंतु प्रत्यक्षात ११ वाजल्यानंतरही येथे विक्री सुरू असते. शिवाय, विक्री करून राहिलेल्या शेकडो गोणी माल येथेच दिवसभर ठेवला जातो. त्यावरही काहीच कारवाई केली जात नसल्यामुळे बाजारसमितीमधील व्यापाºयांनी नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :onionकांदा