शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

वन टाईम प्लॅनिंग कोलमडले

By admin | Updated: December 11, 2015 01:36 IST

स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाला विरोध करणाऱ्या राष्ट्रवादी काँगे्रसनेच २०१३ मध्ये वन टाईम प्लॅनिंगच्या नावाने या योजनेची अंमलबजावणी सुरू केली होती.

नामदेव मोरे, नवी मुंबईस्मार्ट सिटीच्या प्रस्तावाला विरोध करणाऱ्या राष्ट्रवादी काँगे्रसनेच २०१३ मध्ये वन टाईम प्लॅनिंगच्या नावाने या योजनेची अंमलबजावणी सुरू केली होती. १२,८२१ कोटींचा प्रस्ताव काँगे्रस व शिवसेनेच्या विरोधानंतरही बहुमताच्या जोरावर मंजूर केला होता. बेलापूरपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली, परंतु पायलट प्रोजेक्टच रखडल्याने योजनाच बारगळली आहे. स्मार्ट सिटी योजनेचा ८ हजार कोटींचा प्रस्ताव सत्ताधारी राष्ट्रवादीने फेटाळला. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर मनमानीचा आरोप केला आहे. शहरात आंदोलनही सुरू केले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने आम्ही स्मार्ट सिटी बनविणार, परंतु त्यासाठी ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’ प्रणालीमुळे लोकशाही धोक्यात येणार असल्यामुळे प्रस्ताव फेटाळल्याचा दावा केला आहे. वास्तविक केंद्राने यावर्षी स्मार्ट सिटी योजना राबविण्यास सुरवात केली असली तरी माजी मंत्री गणेश नाईक यांनी आॅगस्ट २०१३ मध्ये ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये वन टाईम प्लॅनिंगच्या नावाने स्मार्ट सिटी बनविण्याचा संकल्प जाहीर केला होता. जगभरात सर्वोत्कृष्ट शहरांमध्ये ग्लोबल सिटी, इको सिटी, लाईव्हेबल सिटी व स्मार्ट सिटी असे वर्गीकरण आहे. या चार गोष्टींना एकत्रित करून देशातील बेस्ट सिटी बनविण्याचे नियोजन यामध्ये केले होते. यासाठी १२,८२१ कोटी ७० लाख रुपयांचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर केला होता. सर्व नोडच्या विकासासाठी ३७३३ कोटी, शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी एमएमआरडीए, जेएनएनयूआरएम व डीफर्ड पेमेंटच्या माध्यमातून ४०९३ कोटी रुपये व राष्ट्रीयकृत बँकांसह विदेशी आर्थिक संस्थांकडून ४९९५ कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज घेण्यात येणार होते. या प्रस्तावास शिवसेना व भाजपा नगरसेवकांनी तीव्र विरोध केला होता. पालिका लुटण्याचे नियोजन असल्याची टीकाही केली होती. परंतु टीकेकडे दुर्लक्ष करून बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर केला होता. राष्ट्रवादीने बेलापूर सेक्टर १५ मध्ये वन टाईम प्लॅनिंगचा पहिला पायलट प्रोजेक्ट करण्याचा निर्णय घेतला. यासाठी ११९ कोटी रुपयांची तरतूद केली होती. जवळपास ६० कोटी रुपयांची कामेही सुरू केली होती. परंतु ही कामे अत्यंत धीम्या गतीने सुरू आहेत. वन टाईम प्लॅनिंग शहराच्या हिताचे नसल्याचे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाच्याही लक्षात आले आहे. यामुळेच सुरू कामे पूर्ण करायची व त्यानंतरच पुढील कामांविषयी विचारणा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. जवळपास वन टाईम प्लॅनिंगची योजना कोलमडलीच आहे. याच योजनेच्या असलेल्या स्मार्ट सिटी योजनेसाठी प्रशासनाने ८ हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे.