शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

अधिकारी निवडणुकीच्या कामात तर फेरीवाले जोमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 23:25 IST

कारवाई करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

योगेश पिंगळे।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे शहरातील फेरीवाल्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. रेल्वे स्टेशन व महत्त्वाच्या ठिकाणी रोडसह पदपथावर फेरीवाल्यांनी ठाण मांडले असून, त्यामुळे रहदारीसही अडथळे निर्माण झाले आहेत.नवी मुंबई शहरातील नेरु ळ, सानपाडा, वाशी आदी ठिकाणच्या वर्दळ असलेल्या ठिकाणचे पदपथ फेरीवाल्यांनी काबीज केले आहेत. त्यामुळे नागरिकांना पदपथावरून चालणे जिकिरीचे झाले आहे. रेल्वे स्थानकांजवळील पदपथावर खाद्यपदार्थ, फळे, भाजी, कापडविक्रे त्यांनी जागा अडविण्यास सुरुवात केली आहे. फेरीवाल्यांनी पदपथावर थाटलेल्या व्यवसायामुळे रेल्वे स्थानकांबाहेरील परिसरात वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहे. नेरु ळ रेल्वेस्थानकाच्या बाहेरील पदपथावर फेरीवाले बेकायदेशीरपणे व्यवसाय करतात. तसेच याच पदपथासमोर रस्त्याच्या कडेला हातगाड्यांवरही फेरीवाले व्यवसाय करीत आहेत. यामुळे रस्त्याचा बराचसा भाग व्यापला जात असून, वाहने ये-जा करताना अडथळा निर्माण होऊन संध्याकाळी वाहतूककोंडी होत आहे. महापालिकेच्या माध्यमातून कारवाई केल्या जातात; परंतु गेल्या काही दिवसांपासून कारवाईकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले असून, यामुळे नागरिकांना व वाहनचालकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.कोपरखैरणे सेक्टर १५ व १८ च्या मधील रोडवर दोन्ही बाजूला फेरीवाले बसत आहेत. सायंकाळी हा रोड वाहतुकीला जवळपास बंद केला जात आहे. रोडवरून पायी जाणेही अशक्य होऊ लागले आहे.नागरिकांमध्ये नाराजीनेरुळ, सानपाडा रेल्वेस्टेशन व शहरातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी रोडसह पदपथ फेरीवाल्यांनी अडविले आहेत. पदपथावरून चालणेही अशक्य होऊ लागले आहे. वाहतूककोंडीही होत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. कारवाई होत नसल्यामुळे पालिकेविषयी असंतोष निर्माण होऊ लागला आहे.फेरीवाल्यांना अभयमहापालिका प्रशासन कधीच गांभीर्याने अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत नाही. आयुक्तपदावर तुकाराम मुंडे असताना शहरातील फेरीवाले गायब झाले होते. रोड व पदपथ मोकळे झाले होते; परंतु त्यांच्या बदलीनंतर पुन्हा जैसे थे स्थिती झाली आहे. विभाग कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांकडून अभय मिळू लागले आहे.शहराबाहेरून येत आहेत विक्रेतेनवी मुंबईच्या बाहेरून मानखुर्द, गोवंडी व इतर ठिकाणावरून फेरीवाले नवी मुंबईमध्ये येऊ लागले आहेत. मोक्याच्या ठिकाणी जागा अडविल्या जात आहेत. निवडणुकीमध्ये अधिकारी व कर्मचारी व्यस्त असल्याने कारवाई होत नाही. याचा गैरफायदा घेऊन शहरात कायमस्वरूपी बस्तान मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे.