शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी निवडणुकीच्या कामात तर फेरीवाले जोमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 23:25 IST

कारवाई करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

योगेश पिंगळे।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे शहरातील फेरीवाल्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. रेल्वे स्टेशन व महत्त्वाच्या ठिकाणी रोडसह पदपथावर फेरीवाल्यांनी ठाण मांडले असून, त्यामुळे रहदारीसही अडथळे निर्माण झाले आहेत.नवी मुंबई शहरातील नेरु ळ, सानपाडा, वाशी आदी ठिकाणच्या वर्दळ असलेल्या ठिकाणचे पदपथ फेरीवाल्यांनी काबीज केले आहेत. त्यामुळे नागरिकांना पदपथावरून चालणे जिकिरीचे झाले आहे. रेल्वे स्थानकांजवळील पदपथावर खाद्यपदार्थ, फळे, भाजी, कापडविक्रे त्यांनी जागा अडविण्यास सुरुवात केली आहे. फेरीवाल्यांनी पदपथावर थाटलेल्या व्यवसायामुळे रेल्वे स्थानकांबाहेरील परिसरात वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहे. नेरु ळ रेल्वेस्थानकाच्या बाहेरील पदपथावर फेरीवाले बेकायदेशीरपणे व्यवसाय करतात. तसेच याच पदपथासमोर रस्त्याच्या कडेला हातगाड्यांवरही फेरीवाले व्यवसाय करीत आहेत. यामुळे रस्त्याचा बराचसा भाग व्यापला जात असून, वाहने ये-जा करताना अडथळा निर्माण होऊन संध्याकाळी वाहतूककोंडी होत आहे. महापालिकेच्या माध्यमातून कारवाई केल्या जातात; परंतु गेल्या काही दिवसांपासून कारवाईकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले असून, यामुळे नागरिकांना व वाहनचालकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.कोपरखैरणे सेक्टर १५ व १८ च्या मधील रोडवर दोन्ही बाजूला फेरीवाले बसत आहेत. सायंकाळी हा रोड वाहतुकीला जवळपास बंद केला जात आहे. रोडवरून पायी जाणेही अशक्य होऊ लागले आहे.नागरिकांमध्ये नाराजीनेरुळ, सानपाडा रेल्वेस्टेशन व शहरातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी रोडसह पदपथ फेरीवाल्यांनी अडविले आहेत. पदपथावरून चालणेही अशक्य होऊ लागले आहे. वाहतूककोंडीही होत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. कारवाई होत नसल्यामुळे पालिकेविषयी असंतोष निर्माण होऊ लागला आहे.फेरीवाल्यांना अभयमहापालिका प्रशासन कधीच गांभीर्याने अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत नाही. आयुक्तपदावर तुकाराम मुंडे असताना शहरातील फेरीवाले गायब झाले होते. रोड व पदपथ मोकळे झाले होते; परंतु त्यांच्या बदलीनंतर पुन्हा जैसे थे स्थिती झाली आहे. विभाग कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांकडून अभय मिळू लागले आहे.शहराबाहेरून येत आहेत विक्रेतेनवी मुंबईच्या बाहेरून मानखुर्द, गोवंडी व इतर ठिकाणावरून फेरीवाले नवी मुंबईमध्ये येऊ लागले आहेत. मोक्याच्या ठिकाणी जागा अडविल्या जात आहेत. निवडणुकीमध्ये अधिकारी व कर्मचारी व्यस्त असल्याने कारवाई होत नाही. याचा गैरफायदा घेऊन शहरात कायमस्वरूपी बस्तान मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे.