शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

ओडिशावासींना नवी मुंबईतून मदत, सर्वाधिक नुकसान असलेले गाव घेणार दत्तक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 02:11 IST

फानी वादळामुळे बाधित झालेल्या ओडिशाला नवी मुंबईतून मदतीचा हात मिळणार आहे. नवी मुंबईत स्थायिक झालेल्या मूळच्या ओडिशावासीयांनी त्याकरिता पुढाकार घेतला असून, यासंदर्भात रविवारी बैठक घेण्यात आली.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई  - फानी वादळामुळे बाधित झालेल्या ओडिशाला नवी मुंबईतून मदतीचा हात मिळणार आहे. नवी मुंबईत स्थायिक झालेल्या मूळच्या ओडिशावासीयांनी त्याकरिता पुढाकार घेतला असून, यासंदर्भात रविवारी बैठक घेण्यात आली. वाशीतील ओडिशा भवनमध्ये झालेल्या या बैठकीत सर्वाधिक नुकसान झालेले गाव दत्तक घेऊन तिथल्या रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला.फानी वादळामुळे ओडिशाच्या अनेक गावांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. सद्यस्थितीला तिथले जनजीवन विस्कळीत झाले असून अन्नपाण्याचीही गैरसोय झालेली आहे, तर संपूर्ण भागाचा वीजपुरवठा, फोन लाइन खंडित असल्यानेही अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यात सुधार होण्यासाठी अद्याप तीन ते चार दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर ओडिशामध्ये प्रत्यक्षात झालेल्या नुकसानीची माहिती कळू शकणार आहे. तत्पूर्वी फानी पीडितांपर्यंत पिण्याचे स्वच्छ पाणी व औषधे पुरवण्यासाठी नवी मुंबईत स्थायिक असलेल्या ओडिशावासीयांनी पुढाकार घेतला आहे. वाशीतील ओडिशा भवनमध्ये रविवारी प्रमुख व्यक्तींची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच इच्छुक व्यक्तींनी देखील मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फानीमुळे ओडिशामधील अनेक भागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.मात्र ही गावे पूर्णपणे संपर्काबाहेर असल्याने तिथली सत्यपरिस्थिती समोर येऊ शकली नसल्याची चिंता रश्मीकांत महापात्रा यांनी व्यक्त केली आहे. ही माहिती समोर आल्यास ज्या गावाचे सर्वाधिक नुकसान झाले असेल, ते गाव दत्तक घेऊन तिथले विस्कळीत झालेले जनजीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई