शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

महाडमध्ये टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:04 IST

प्रस्ताव मंजुरीस विलंब : १३ गावे ७१ वाड्यांना सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा

महाड : तालुक्यातील पाणीटंचाई दिवसेंदिवस वाढत आहे. जर पाऊस लांबला तर टंचाईगस्त गाव व वाड्यांना पाणीपुरवठा करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. टंचाईग्रस्त गावांकडून आलेले प्रस्ताव मंजूर होण्यास विलंब होत असल्याने सर्वसामान्य जनतेकडून संताप व्यक्त केला जात आहे. सध्या तालुक्यात १३ गावे आणि ७१ वाड्या यांना सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, एक गाव व ३० वाड्यांचे प्रस्ताव अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. या सर्व ठिकाणी पाणीपुरवठा करण्यासाठी आणखी दोन टँकर उपलब्ध करून देण्याची मागणी पंचायत समितीमार्फत करण्यात आली आहे.

महाड तालुक्यातील पिंपळकोंड, शेवते, आडी, घुरुपकोंड, साकडी, पुनाडेगाव, सापे तर्फे तुडील, ताम्हाणे अशी १३ गावे आणि ७१ वाड्यांना सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. या गावांना लोकसंख्येच्या आधारावर एक अथवा दोन दिवसांआड टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, काही वाड्यांमध्ये टँकरने आलेले पाणी साठवून ठेवण्यासाठी साठवण टाक्या नसल्याने घरातील हंडे व इतर भांड्यातून पाणी भरून त्यावर ग्रामस्थांना समाधान मानावे लागत आहे.

हंड्यामधून पाण्याचे वाटप करताना पाण्याचा अपव्यय जास्त होऊन वेळही जास्त द्यावा लागत असतो. शासनाने अशा गावांमधून साठवण टाक्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांकडून केली जात आहे. या खेरीज एक गाव आणि ३० वाड्यांनी पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव महाड पंचायत समितीकडे पाठविले असून, हे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत. हे प्रस्ताव तातडीने मंजूर होत नसल्याने या गाव-वाड्यांतील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.