शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

मुंबईहून समुद्रमार्गेच जा आता थेट पालघर; वर्सोवा-विरार सागरी सेतूचा पालघरपर्यंत विस्तार

By नारायण जाधव | Updated: November 7, 2023 15:46 IST

सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू : विनाअडथळा होणार प्रवास

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : वर्सोवा-विरार सागरी सेतूचा थेट पालघरपर्यंत विस्तार करण्याच्या आता ‘एमएमआरडीए’ने हालचाली सुरू केल्या आहेत. यापूर्वी वरळी ते वांद्रेनंतर वांद्रे ते वर्सोवा आणि वर्सोवा ते विरार असा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्याचा निर्णय ‘एमएमआरडीए’ने घेतला हाेता; तसेच याच मार्गाचा पुढे पालघरपर्यंत विस्तार करण्याची घोषणा केली हाेती. ही घोषणा आता प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी आता विस्तारित विरार ते पालघरपर्यंतचा सी-लिंकचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासह वर्सोवा ते विरार मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे पुनरावलोकन करण्यासाठी सल्लागार नेमण्यासाठी मंगळवारी निविदा मागविल्या. हा प्रत्यक्षात पूर्ण झाल्यास नरिमन वरळीहून थेट पालघरपर्यंत विना अडथळा समुद्रमार्गे प्रवास करता येणार आहे.

यापूर्वी वांद्रे ते वरळीदरम्यान ५.६ किलीमीटर लांबीचा एक सी-लिंक २०१० मध्ये तयार झाला असून, त्यावरून रोज हजारो वाहने ये-जा करतात. तर, वांद्रे ते वर्सोवापर्यंतच्या १७ किमीच्या सी-लिंकचे काम प्रगतिपथावर आहे; तसेच वर्सोवा ते विरार मार्गासाठी थेट जपानच्या जायका संस्थेने कर्ज देण्यास मान्यता दिली आहे. ही मार्गिका एकूण ४२.७५ किमी आहे. तिचा खर्च ३१,४२६ कोटींवरून थेट ६३४२४ कोटींवर गेला आहे. हाच मार्ग आता पुढे पालघरपर्यंत वाढविण्यात येणार आहे. सध्या रस्ता मार्गे विरार ते पालघर ५४.६ किमी अंतर आहे. हा सागरी सेतू पालघरपर्यंत वाढविण्यास मार्च २०२३ झालेल्या १५४ बैठकीत मान्यता देण्यात आली होती.

वर्सोवा-विरार सी-लिंक चार ठिकाणी जोडणार

सध्या प्रगतिपथावर असलेल्या वर्सोवा-विरार मार्गावर मार्गिकेवर चारकोप; मीरा-भाईंदर; वसई व विरार, अशा चार ठिकाणी हा सी-लिंक जोडला आहे. हा सागरी सेतू किनाऱ्यापासून एक किलोमीटरवर असेल. अंधेरी पश्चिम ते विरारला ही मार्गिका संलग्न करेल. गोराई, उत्तन, वसई व विरार येथे चार टोल प्लाझा असतील; तसेच या मार्गिकेपासून वसईपर्यंत १८.४६ किमीचा विशेष रस्ताही प्रस्तावित आहे.

मढ आयर्लंडसह गोराई बीचला लाभ

प्रस्तावित वर्साेवा-विरार सी-लिंक हा मढ आयलंड, गोराई बीच, आगाशी रोड येथे कनेक्ट करण्यात येणार असून, मनोरी येथील खाडी पूल याचाच भाग असणार आहे.

भाईंदर-वसई खाडी पुलासही फायदा

विस्तारित सागरी सेतूचा ‘एमएमआरडीए’च्या प्रस्तावित मुंबई शहर आणि वसई-विरार प्रदेशाच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या खाडी पुलासही मोठा फायदा होणार आहे. या पुलावर ‘एमएमआरडीए’ने १००८१ कोटी ६० लाख रुपये खर्च प्रस्तावित केला आहे. याळे दोन्ही शहरांतील अंतर तब्बल ३० किमीने कमी होऊन आठ लाख रहिवाशांसह मुंबई-गुजरात प्रवास करणाऱ्या लाखो वाहनचालकांना त्याचा फायदा होणार आहे. खाडीवरील हा पूल पाच किमी लांबीचा राहणार असून तो ३०.६ मीटर रुंद असा सहापदरी राहणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईVirarविरार