शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

द्रोणागिरी नोडच्या विकासाला मिळणार आता चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 04:27 IST

सिडकोचा पायाभूत सुविधांवर भर; अडीच हजार घरांच्या दोन प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर

नवी मुंबई : विविध कारणांमुळे दुर्लक्षित राहिलेल्या द्रोणागिरी नोडच्या विकासाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी या नोडच्या विकासावर आपले विशेष लक्ष केंद्रित केले आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात सिडकोने जाहीर केलेल्या मेगा गृहप्रकल्पात द्रोणागिरी नोडमध्ये जवळपास अडीच हजार घरे आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या काळात द्रोणागिरी नोडला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.साडेबारा टक्के योजनेअंतर्गत चुकीच्या पद्धतीने वाटप केलेले भूखंड, त्यामुळे विकासाला बसलेली खीळ, पायाभूत सुविधांचा अभाव आदी कारणांमुळे द्रोणागिरी नोडच्या विकासाला ब्रेक बसला आहे. रस्ते, गटारे व अन्य पायाभूत सुविधांअभावी विकासकामे ठप्प पडली आहे. अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहेत. विकासकांनी महागड्या दराने घेतलेले भूखंड जैसे थे पडून आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार आणि विकासकांवर दिवाळखोरीचे संकट ओढावले आहे. परंतु व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर लोकेश चंद्र यांनी सर्वप्रथम द्रोणागिरी नोडचा दौरा करून विकासकामाची पाहणी केली होती. त्यानंतर येथील पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या सुचना संबंधित विभागाला दिल्या होत्या. त्यामुळे विकासक आणि गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.द्रोणागिरी सेक्टर ११ आणि सेक्टर १२ येथे अनुक्रमे मल्हार गृहसंकुल आणि भूपाळी गृहसंकुल हे दोन गृहप्रकल्प उभारले जात आहेत. पात्रताधारकांना २0२0 मध्ये घरांचे वाटप करण्याची सिडकोची योजना आहे. त्यामुळे या विभागात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर सिडकोने भर दिला आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सान्निध्यात असलेल्या द्रोणागिरी नोडच्या विकासाबाबत सिडकोची भूमिका सुरुवातीपासूनच उदासीन राहिली आहे. मागील दहा वर्षांत सिडकोने आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना प्रकल्प, मेट्रो व नेरूळ-उरण रेल्वे आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर अधिक लक्ष केंद्रित केले. त्यामुळे द्रोणागिरीच्या विकासाचा मुद्दा मागे पडला. विशेष म्हणजे या प्रस्तावित नोडमध्ये साडेबारा टक्के योजनेअंतर्गत मोठ्याप्रमाणात भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे. निविदा काढून अनेक भूखंडांची विक्री करण्यात आली आहेत. यात शैक्षणिक, सामाजिक, निवासी आणि वाणिज्य भूखंडांचा समावेश आहे. पायाभूत सुविधा नसल्याने या भूखंडांचा विकास होवू शकला नाही. अनेक प्रकल्प अर्धवट अवस्थेत पडून आहेत. परंतु सिडकोने आता द्रोणागिरीच्या विकासावर भर दिला आहे. पुढील वर्षभरात या विभागात पायाभूत सुविधांचे जाळे विणले जाणार आहे. तशा आशयाच्या सूचना लोकेश चंद्र यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई