शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

खड्ड्यांच्या तक्रारींसाठी ना टोल फ्री क्रमांक, ना व्हॉट्सॲप सेवा; HC आदेशाला केराची टोपली

By नारायण जाधव | Updated: August 13, 2023 07:25 IST

गेल्या काही दिवसांत महानगर प्रदेशातील ठाणे-घोडबंदर-भिवंडी-नाशिक महामार्गासह कल्याण- शीळ-महापे मार्गावर झालेल्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीने लोकांना वेठीस धरले आहे.

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे; मात्र खड्ड्यांच्या तक्रारींसाठी ना टोल फ्री क्रमांक आहे, ना व्हॉट्सॲप सेवा. त्यामुळे नागरिकांनी तक्रार करायची कोठे?, असा सवाल उपस्थित होत आहे. नागरिकांना खड्ड्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सेवा देण्याच्या न्यायालयीन आदेशांना सर्व महापालिकांनी केराची टोपली दाखवल्याचे पुढे आले आहे. 

न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारने २०१५ मध्ये वेगळा आदेश काढला होता. त्याचेही पालन महापालिकांनी केलेले नाही. खड्ड्यांवरून शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने या महापालिकांचे आयुक्त आणि महानगर आयुक्तांच्या साक्षीने राज्य सरकारची चांगलीच कानउघाडणी केली. २०१३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीए क्षेत्रातील रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांबाबत सुमोटो याचिका दाखल करून राज्य शासनासह महापालिकांचे चांगलेच कान टोचले होते. त्यानंतर ९ जुलै रोजी २०१५ रोजी खास आदेश देऊन खड्ड्यांची जबाबदारी महापालिका आयुक्तांवर सोपवून टोल फ्री क्रमांक, व्हॉट्सॲप क्रमांक सुरू करून दोन आठवड्यांत खड्डे न बुजविल्यास ते न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन समजून कारवाईचा इशारा दिला होता.

अधिकाऱ्यांचे एकमेकांकडे बोट

गेल्या काही दिवसांत महानगर प्रदेशातील ठाणे-घोडबंदर-भिवंडी-नाशिक महामार्गासह कल्याण- शीळ-महापे मार्गावर झालेल्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीने लोकांना वेठीस धरले आहे. परंतु खड्डे बुजविण्याच्या बाबतीत मुंबई महानगर प्राधिकरण, एमएसआरडीसी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत.

नगरविकासने २०१५ मध्ये केलेल्या सूचना

न्यायालयाने जुलै २०१५ मध्ये खास आदेश देऊन २६ महापालिका (पनवेल महापालिका तेव्हा नव्हती) क्षेत्रातील खड्डे बुजविण्याची जबाबदारी आयुक्तांवर सोपविली होती. तक्रारींसाठी टोल फ्री नंबरसह वेबसाइट प्रसिद्ध करून मोबाइलवर टेक्स मेसेजसह व्हॉट्सॲप संदेश स्वीकारण्याचे आदेश दिले होते. तक्रारदारास दोन आठवड्यांच्या आत  त्याबाबत कळवायचे होते.

आयुक्तांकडून आदेशांचे उल्लंघन

व्हॉट्सॲप क्रमांक कुणालाच माहिती नाही. शिवाय खड्ड्यांच्या किती तक्रारी आल्या, त्यांचे निराकरण किती दिवसांत केले, त्यांची अद्ययावत माहिती वेबसाइटसह वृत्तपत्रात कधी आणि किती वेळा प्रसिद्ध केली, याची माहिती दिलेली नाही. रस्ता दुरुस्ती करताना कंपनीचे नाव, अंदाजित कामाचा कालावधी, कामाची व्याप्ती देण्याचे बंधन घातले होते, पण तसेही केलेले दिसत नाही.

 

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्ट