शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

खड्ड्यांच्या तक्रारींसाठी ना टोल फ्री क्रमांक, ना व्हॉट्सॲप सेवा; HC आदेशाला केराची टोपली

By नारायण जाधव | Updated: August 13, 2023 07:25 IST

गेल्या काही दिवसांत महानगर प्रदेशातील ठाणे-घोडबंदर-भिवंडी-नाशिक महामार्गासह कल्याण- शीळ-महापे मार्गावर झालेल्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीने लोकांना वेठीस धरले आहे.

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे; मात्र खड्ड्यांच्या तक्रारींसाठी ना टोल फ्री क्रमांक आहे, ना व्हॉट्सॲप सेवा. त्यामुळे नागरिकांनी तक्रार करायची कोठे?, असा सवाल उपस्थित होत आहे. नागरिकांना खड्ड्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सेवा देण्याच्या न्यायालयीन आदेशांना सर्व महापालिकांनी केराची टोपली दाखवल्याचे पुढे आले आहे. 

न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारने २०१५ मध्ये वेगळा आदेश काढला होता. त्याचेही पालन महापालिकांनी केलेले नाही. खड्ड्यांवरून शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने या महापालिकांचे आयुक्त आणि महानगर आयुक्तांच्या साक्षीने राज्य सरकारची चांगलीच कानउघाडणी केली. २०१३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीए क्षेत्रातील रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांबाबत सुमोटो याचिका दाखल करून राज्य शासनासह महापालिकांचे चांगलेच कान टोचले होते. त्यानंतर ९ जुलै रोजी २०१५ रोजी खास आदेश देऊन खड्ड्यांची जबाबदारी महापालिका आयुक्तांवर सोपवून टोल फ्री क्रमांक, व्हॉट्सॲप क्रमांक सुरू करून दोन आठवड्यांत खड्डे न बुजविल्यास ते न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन समजून कारवाईचा इशारा दिला होता.

अधिकाऱ्यांचे एकमेकांकडे बोट

गेल्या काही दिवसांत महानगर प्रदेशातील ठाणे-घोडबंदर-भिवंडी-नाशिक महामार्गासह कल्याण- शीळ-महापे मार्गावर झालेल्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीने लोकांना वेठीस धरले आहे. परंतु खड्डे बुजविण्याच्या बाबतीत मुंबई महानगर प्राधिकरण, एमएसआरडीसी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत.

नगरविकासने २०१५ मध्ये केलेल्या सूचना

न्यायालयाने जुलै २०१५ मध्ये खास आदेश देऊन २६ महापालिका (पनवेल महापालिका तेव्हा नव्हती) क्षेत्रातील खड्डे बुजविण्याची जबाबदारी आयुक्तांवर सोपविली होती. तक्रारींसाठी टोल फ्री नंबरसह वेबसाइट प्रसिद्ध करून मोबाइलवर टेक्स मेसेजसह व्हॉट्सॲप संदेश स्वीकारण्याचे आदेश दिले होते. तक्रारदारास दोन आठवड्यांच्या आत  त्याबाबत कळवायचे होते.

आयुक्तांकडून आदेशांचे उल्लंघन

व्हॉट्सॲप क्रमांक कुणालाच माहिती नाही. शिवाय खड्ड्यांच्या किती तक्रारी आल्या, त्यांचे निराकरण किती दिवसांत केले, त्यांची अद्ययावत माहिती वेबसाइटसह वृत्तपत्रात कधी आणि किती वेळा प्रसिद्ध केली, याची माहिती दिलेली नाही. रस्ता दुरुस्ती करताना कंपनीचे नाव, अंदाजित कामाचा कालावधी, कामाची व्याप्ती देण्याचे बंधन घातले होते, पण तसेही केलेले दिसत नाही.

 

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्ट