शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांना ‘नो एंट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 2:50 AM

भूस्खलनामुळे ९ ऑगस्टपर्यंत बंदी; बंधाऱ्यात मातीचा ढीग; झाडे पडल्याने पायवाटेत अडथळे

पनवेल : अतिवृष्टीमुळे कर्नाळा अभयारण्यात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. अभयारण्यात विविध ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने यामुळे कर्नाळा किल्ल्यावर जाण्यासाठी असलेल्या पायवाटेसाठीही अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे वनविभागाने शुक्रवार, ९ आॅगस्टपर्यंत पर्यटकांना कर्नाळा अभयारण्यात येण्यास मज्जाव केला आहे.पावसाळ्यात वर्षासहलीसाठी कर्नाळा अभयारण्याला पर्यटकांकडून नेहमीच पसंती दिली जाते. सुट्टीच्या दिवशी तर या ठिकाणी हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल होत असतात. रायगड जिल्ह्यातील अनेक प्रमुख धबधब्यावर प्रवेश बंदी करण्यात आल्याने गेल्या काही दिवसांत पर्यटकांच्या संख्येत आणखीनच भर पडली आहे. मात्र, रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे कर्नाळा अभयारण्यात भूस्खलन झाले असून मोठे नुकसान झाले आहे.येथील प्रसिद्ध मयूर बंधारा पूर्णपणे मातीने भरल्याने सर्व परिस्थितीत पूर्ववत करण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे ९ आॅगस्टपर्यंत या ठिकाणी पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी पी. पी. चव्हाण यांनी दिली. कर्नाळा अभयारण्यात उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीचा अहवाल चव्हाण यांनी उपवनसंरक्षक वन्यजीव ठाणे यांना दिल्यानंतर त्यांनी सर्व कामे सुरळीत करण्यासाठी ९ तारखेपर्यंत अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्याच्या घडीला किल्ल्यावर निर्माण झालेला अडथळा दूर करण्यासाठी साफसफाईची कामे हाती घेण्यात आली आहेत. विविध ठिकाणी उन्मळून पडलेली झाडे बाजूला करण्याचे कामही सुरू असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.