शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
3
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, निफ्टीत ५० अंकांची तेजी; FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी
4
Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू
5
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
6
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
7
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
8
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
9
९८ लाख कोटींच्या साम्राज्याचा सम्राट निवृत्त! वॉरेन बफे यांचा कंपनीतून ९५ व्या वर्षी राजीनामा
10
आजपासून काय-काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? कार महागणार, पीएफच्या नियमांतही मोठे बदल होणार अन् बरंच काही...!
11
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
12
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
13
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
14
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
15
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
16
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
17
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
18
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
19
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
20
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
Daily Top 2Weekly Top 5

एनएमएमटी बसला आग, दुर्घटना टळली, ६० प्रवाशांचे वाचले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 07:05 IST

नेरुळ येथे एनएमएमटी बसला आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. घटने वेळी बसमध्ये ६० प्रवासी होते. वेळीच त्यांना बसमधून खाली उतरवल्याने मोठी दुर्घटना टळली. या आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

नवी मुंबई : नेरुळ येथे एनएमएमटी बसला आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. घटने वेळी बसमध्ये ६० प्रवासी होते. वेळीच त्यांना बसमधून खाली उतरवल्याने मोठी दुर्घटना टळली. या आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.नेरुळ स्थानकाच्या पश्चिमेकडील मार्गावर रात्री ७ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. एनएमएमटीची २० क्रमांकाची बस (एमएच ४३ एच ५४४८) कोपरखैरणेकडून करावेच्या दिशेने चालली होती. या वेळी बसमध्ये सुमारे ६० प्रवासी होते. बस नेरुळ स्थानकालगत आली असता, टायर फुटल्याचा आवाज झाला. यामुळे चालकाने बस जागीच थांबवली असता, बसच्या खाली आग लागल्याचे निदर्शनास आले. यामुळे बसच्या चालक-वाहकाने प्रसंगसावधानता राखत बसमधील प्रवाशांना तत्काळ खाली उतरवले. त्यानंतर काही वेळातच संपूर्ण बसने पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच, नेरुळ अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सुमारे १५ मिनिटे प्रयत्न केल्यानंतर बसची आग विझली; परंतु तोपर्यंत बस जळून पूर्णपणे खाक झाली होती. या घटनेची माहिती मिळताच, परिवहन समिती सभापती प्रदीप गवस, नगरसेवक अशोक गावडे, सामाजिक कार्यकर्ते अमर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. रहदारीच्या मार्गावरच घडलेल्या या प्रकारामुळे तिथली वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर सुमारे एका तासाने आग आटोक्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. आगीचे ठोस कारण मात्र कळलेले नसून, बस एक वर्षापूर्वीच एनएमएमटीच्या ताफ्यात आल्याचे परिवहन व्यवस्थापक शिरिष आरदवाड यांनी सांगितले. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईfireआग