शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
2
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
3
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
4
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
5
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
6
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
7
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
8
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
9
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
10
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
11
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
12
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
13
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
14
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
15
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
16
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
17
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
18
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
19
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
Daily Top 2Weekly Top 5

एनएमएमटी बसला आग, दुर्घटना टळली, ६० प्रवाशांचे वाचले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 07:05 IST

नेरुळ येथे एनएमएमटी बसला आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. घटने वेळी बसमध्ये ६० प्रवासी होते. वेळीच त्यांना बसमधून खाली उतरवल्याने मोठी दुर्घटना टळली. या आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

नवी मुंबई : नेरुळ येथे एनएमएमटी बसला आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. घटने वेळी बसमध्ये ६० प्रवासी होते. वेळीच त्यांना बसमधून खाली उतरवल्याने मोठी दुर्घटना टळली. या आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.नेरुळ स्थानकाच्या पश्चिमेकडील मार्गावर रात्री ७ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. एनएमएमटीची २० क्रमांकाची बस (एमएच ४३ एच ५४४८) कोपरखैरणेकडून करावेच्या दिशेने चालली होती. या वेळी बसमध्ये सुमारे ६० प्रवासी होते. बस नेरुळ स्थानकालगत आली असता, टायर फुटल्याचा आवाज झाला. यामुळे चालकाने बस जागीच थांबवली असता, बसच्या खाली आग लागल्याचे निदर्शनास आले. यामुळे बसच्या चालक-वाहकाने प्रसंगसावधानता राखत बसमधील प्रवाशांना तत्काळ खाली उतरवले. त्यानंतर काही वेळातच संपूर्ण बसने पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच, नेरुळ अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सुमारे १५ मिनिटे प्रयत्न केल्यानंतर बसची आग विझली; परंतु तोपर्यंत बस जळून पूर्णपणे खाक झाली होती. या घटनेची माहिती मिळताच, परिवहन समिती सभापती प्रदीप गवस, नगरसेवक अशोक गावडे, सामाजिक कार्यकर्ते अमर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. रहदारीच्या मार्गावरच घडलेल्या या प्रकारामुळे तिथली वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर सुमारे एका तासाने आग आटोक्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. आगीचे ठोस कारण मात्र कळलेले नसून, बस एक वर्षापूर्वीच एनएमएमटीच्या ताफ्यात आल्याचे परिवहन व्यवस्थापक शिरिष आरदवाड यांनी सांगितले. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईfireआग