शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

एनएमएमटी बसला आग, दुर्घटना टळली, ६० प्रवाशांचे वाचले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 07:05 IST

नेरुळ येथे एनएमएमटी बसला आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. घटने वेळी बसमध्ये ६० प्रवासी होते. वेळीच त्यांना बसमधून खाली उतरवल्याने मोठी दुर्घटना टळली. या आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

नवी मुंबई : नेरुळ येथे एनएमएमटी बसला आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. घटने वेळी बसमध्ये ६० प्रवासी होते. वेळीच त्यांना बसमधून खाली उतरवल्याने मोठी दुर्घटना टळली. या आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.नेरुळ स्थानकाच्या पश्चिमेकडील मार्गावर रात्री ७ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. एनएमएमटीची २० क्रमांकाची बस (एमएच ४३ एच ५४४८) कोपरखैरणेकडून करावेच्या दिशेने चालली होती. या वेळी बसमध्ये सुमारे ६० प्रवासी होते. बस नेरुळ स्थानकालगत आली असता, टायर फुटल्याचा आवाज झाला. यामुळे चालकाने बस जागीच थांबवली असता, बसच्या खाली आग लागल्याचे निदर्शनास आले. यामुळे बसच्या चालक-वाहकाने प्रसंगसावधानता राखत बसमधील प्रवाशांना तत्काळ खाली उतरवले. त्यानंतर काही वेळातच संपूर्ण बसने पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच, नेरुळ अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सुमारे १५ मिनिटे प्रयत्न केल्यानंतर बसची आग विझली; परंतु तोपर्यंत बस जळून पूर्णपणे खाक झाली होती. या घटनेची माहिती मिळताच, परिवहन समिती सभापती प्रदीप गवस, नगरसेवक अशोक गावडे, सामाजिक कार्यकर्ते अमर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. रहदारीच्या मार्गावरच घडलेल्या या प्रकारामुळे तिथली वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर सुमारे एका तासाने आग आटोक्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. आगीचे ठोस कारण मात्र कळलेले नसून, बस एक वर्षापूर्वीच एनएमएमटीच्या ताफ्यात आल्याचे परिवहन व्यवस्थापक शिरिष आरदवाड यांनी सांगितले. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईfireआग