शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
3
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
4
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
5
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
6
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
7
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
8
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
9
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
10
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
11
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
12
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
13
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
14
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
15
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
16
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
17
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
18
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
19
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
20
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम

एनएमएमटीच्या दोन बसचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:58 IST

प्रवासी किरकोळ जखमी; ओव्हरटेकच्या प्रयत्नात बसली धडक

नवी मुंबई : एनएमएमटीच्या दोन बसच्या अपघाताची घटना कोपरखैरणेत सोमवारी सकाळी घडली. यामध्ये बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ही दुर्घटना घडली आहे. सततच्या अशा घटनांवरून एनएमएमटीच्या प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील बसच्या दर्जावरून यापूर्वी अनेकदा प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. बस अर्ध्या प्रवासात बंद पडणे, ब्रेक फेल होणे, आग लागणे अशा अनेक घटना सातत्याने घडत आल्या आहेत. याचा फटका प्रवासी संख्येवरही बसत असल्याने परिणामी परिवहन उपक्रम तोट्यात चालवावा लागत आहे. अशातच एनएमएमटीच्या काही चालकांच्या बेजबाबदार कृत्यांमुळे देखील परिवहन उपक्रमावर तोटा सहन करण्याची वेळ ओढावू लागली आहे. कंत्राटी पध्दतीवर झालेल्या भरतीमधील बहुतांश चालक राजकारण्यांच्या वशिल्यातील असल्याने ते प्रशासनाला जुमानत नसल्याचेही वेळोवेळी दिसून आले आहे. तर या चालकांना शिस्तीच्या धड्यांसह वाहन चालवताना घ्यायच्या काळजीबाबत देखील प्रशिक्षण देऊनही त्यांच्यात सुधाराची चिन्हे दिसत नसल्याचाही आरोप होत आहे. परिणामी अपघाताच्या घटना घडत असून, त्यामध्ये प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. निश्चित ठिकाणी गाडी वेळेवर पोहचवून आपली ड्युटी संपवण्याच्या घाईत चालकांकडून अतिवेगात बस पळवली जात असल्याचे शहरातील रस्त्यांवर दिसून येत आहे. मुळात शहरातील रस्ते अरुंद असल्याने त्यांच्याकडून बस पळवण्याच्या प्रयत्नात अपघात होत आहेत. अशाच प्रकारातून कोपरखैरणे - वाशी मार्गावर सोमवारी सकाळी कोपरखैरणे येथे एनएमएमटीच्या एका बसने दुसऱ्या बसला पाठीमागून धडक दिली. यामध्ये दोन्ही बसचे नुकसान झाले असून काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. समोरील बस जात असताना तिला ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न मागच्या बस चालकाने केल्याने हा अपघात घडल्याचे समजते. मात्र त्याच्या या जीवघेण्या प्रयत्नात प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. काही महिन्यांपूर्वी महिलांसाठी राखीव असलेल्या तेजस्विनी बसचा देखील अपघात घडला होता. तर उरणलगत एनएमएमटी व रिक्षाच्या धडकेत एकाचा प्राण देखील गेला आहे. त्यामुळे एनएमएमटीमधून प्रवास करण्यापूर्वी प्रवाशांना विचार करणे भाग पडत आहे.एनएमएमटीच्या चालकांना अनेकदा प्रशिक्षण देऊनही वाहतुकीच्या नियमांबाबत त्यांच्यात जागरूकता झालेली नाही. तर प्रशासन देखील अशा बेशिस्त चालकांवर अंकुश लावण्यात ढिले पडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सतत घडणाºया अपघातांच्या घटनांमुळे प्रवासी एनएमएमटीकडे पाठ फिरवत असल्याने उत्पन्नवाढीवर परिणाम होत आहे.- समीर बागवान,परिवहन सदस्य

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिकाAccidentअपघात