शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

एनएमएमटीच्या दोन बसचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:58 IST

प्रवासी किरकोळ जखमी; ओव्हरटेकच्या प्रयत्नात बसली धडक

नवी मुंबई : एनएमएमटीच्या दोन बसच्या अपघाताची घटना कोपरखैरणेत सोमवारी सकाळी घडली. यामध्ये बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ही दुर्घटना घडली आहे. सततच्या अशा घटनांवरून एनएमएमटीच्या प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील बसच्या दर्जावरून यापूर्वी अनेकदा प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. बस अर्ध्या प्रवासात बंद पडणे, ब्रेक फेल होणे, आग लागणे अशा अनेक घटना सातत्याने घडत आल्या आहेत. याचा फटका प्रवासी संख्येवरही बसत असल्याने परिणामी परिवहन उपक्रम तोट्यात चालवावा लागत आहे. अशातच एनएमएमटीच्या काही चालकांच्या बेजबाबदार कृत्यांमुळे देखील परिवहन उपक्रमावर तोटा सहन करण्याची वेळ ओढावू लागली आहे. कंत्राटी पध्दतीवर झालेल्या भरतीमधील बहुतांश चालक राजकारण्यांच्या वशिल्यातील असल्याने ते प्रशासनाला जुमानत नसल्याचेही वेळोवेळी दिसून आले आहे. तर या चालकांना शिस्तीच्या धड्यांसह वाहन चालवताना घ्यायच्या काळजीबाबत देखील प्रशिक्षण देऊनही त्यांच्यात सुधाराची चिन्हे दिसत नसल्याचाही आरोप होत आहे. परिणामी अपघाताच्या घटना घडत असून, त्यामध्ये प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. निश्चित ठिकाणी गाडी वेळेवर पोहचवून आपली ड्युटी संपवण्याच्या घाईत चालकांकडून अतिवेगात बस पळवली जात असल्याचे शहरातील रस्त्यांवर दिसून येत आहे. मुळात शहरातील रस्ते अरुंद असल्याने त्यांच्याकडून बस पळवण्याच्या प्रयत्नात अपघात होत आहेत. अशाच प्रकारातून कोपरखैरणे - वाशी मार्गावर सोमवारी सकाळी कोपरखैरणे येथे एनएमएमटीच्या एका बसने दुसऱ्या बसला पाठीमागून धडक दिली. यामध्ये दोन्ही बसचे नुकसान झाले असून काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. समोरील बस जात असताना तिला ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न मागच्या बस चालकाने केल्याने हा अपघात घडल्याचे समजते. मात्र त्याच्या या जीवघेण्या प्रयत्नात प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. काही महिन्यांपूर्वी महिलांसाठी राखीव असलेल्या तेजस्विनी बसचा देखील अपघात घडला होता. तर उरणलगत एनएमएमटी व रिक्षाच्या धडकेत एकाचा प्राण देखील गेला आहे. त्यामुळे एनएमएमटीमधून प्रवास करण्यापूर्वी प्रवाशांना विचार करणे भाग पडत आहे.एनएमएमटीच्या चालकांना अनेकदा प्रशिक्षण देऊनही वाहतुकीच्या नियमांबाबत त्यांच्यात जागरूकता झालेली नाही. तर प्रशासन देखील अशा बेशिस्त चालकांवर अंकुश लावण्यात ढिले पडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सतत घडणाºया अपघातांच्या घटनांमुळे प्रवासी एनएमएमटीकडे पाठ फिरवत असल्याने उत्पन्नवाढीवर परिणाम होत आहे.- समीर बागवान,परिवहन सदस्य

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिकाAccidentअपघात