शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

एनएमएमटीच्या दोन बसचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:58 IST

प्रवासी किरकोळ जखमी; ओव्हरटेकच्या प्रयत्नात बसली धडक

नवी मुंबई : एनएमएमटीच्या दोन बसच्या अपघाताची घटना कोपरखैरणेत सोमवारी सकाळी घडली. यामध्ये बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ही दुर्घटना घडली आहे. सततच्या अशा घटनांवरून एनएमएमटीच्या प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील बसच्या दर्जावरून यापूर्वी अनेकदा प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. बस अर्ध्या प्रवासात बंद पडणे, ब्रेक फेल होणे, आग लागणे अशा अनेक घटना सातत्याने घडत आल्या आहेत. याचा फटका प्रवासी संख्येवरही बसत असल्याने परिणामी परिवहन उपक्रम तोट्यात चालवावा लागत आहे. अशातच एनएमएमटीच्या काही चालकांच्या बेजबाबदार कृत्यांमुळे देखील परिवहन उपक्रमावर तोटा सहन करण्याची वेळ ओढावू लागली आहे. कंत्राटी पध्दतीवर झालेल्या भरतीमधील बहुतांश चालक राजकारण्यांच्या वशिल्यातील असल्याने ते प्रशासनाला जुमानत नसल्याचेही वेळोवेळी दिसून आले आहे. तर या चालकांना शिस्तीच्या धड्यांसह वाहन चालवताना घ्यायच्या काळजीबाबत देखील प्रशिक्षण देऊनही त्यांच्यात सुधाराची चिन्हे दिसत नसल्याचाही आरोप होत आहे. परिणामी अपघाताच्या घटना घडत असून, त्यामध्ये प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. निश्चित ठिकाणी गाडी वेळेवर पोहचवून आपली ड्युटी संपवण्याच्या घाईत चालकांकडून अतिवेगात बस पळवली जात असल्याचे शहरातील रस्त्यांवर दिसून येत आहे. मुळात शहरातील रस्ते अरुंद असल्याने त्यांच्याकडून बस पळवण्याच्या प्रयत्नात अपघात होत आहेत. अशाच प्रकारातून कोपरखैरणे - वाशी मार्गावर सोमवारी सकाळी कोपरखैरणे येथे एनएमएमटीच्या एका बसने दुसऱ्या बसला पाठीमागून धडक दिली. यामध्ये दोन्ही बसचे नुकसान झाले असून काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. समोरील बस जात असताना तिला ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न मागच्या बस चालकाने केल्याने हा अपघात घडल्याचे समजते. मात्र त्याच्या या जीवघेण्या प्रयत्नात प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. काही महिन्यांपूर्वी महिलांसाठी राखीव असलेल्या तेजस्विनी बसचा देखील अपघात घडला होता. तर उरणलगत एनएमएमटी व रिक्षाच्या धडकेत एकाचा प्राण देखील गेला आहे. त्यामुळे एनएमएमटीमधून प्रवास करण्यापूर्वी प्रवाशांना विचार करणे भाग पडत आहे.एनएमएमटीच्या चालकांना अनेकदा प्रशिक्षण देऊनही वाहतुकीच्या नियमांबाबत त्यांच्यात जागरूकता झालेली नाही. तर प्रशासन देखील अशा बेशिस्त चालकांवर अंकुश लावण्यात ढिले पडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सतत घडणाºया अपघातांच्या घटनांमुळे प्रवासी एनएमएमटीकडे पाठ फिरवत असल्याने उत्पन्नवाढीवर परिणाम होत आहे.- समीर बागवान,परिवहन सदस्य

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिकाAccidentअपघात