शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 11:48 IST

महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या दोन दिवसांच्या नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली.

पनवेल : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच रायगडमधील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे समोर आले आहेत. शासकीय आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेमुळेे म्हसळा येथे एका मुलाच्या मृत्यूची घटना ताजी असताना पनवेलमध्येही तशीच घटना घडली आहे.  

महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या दोन दिवसांच्या नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. मुलाची तब्येत खालावल्यानंतर रुग्णाला तपासण्यासाठी डॉक्टर आलेच नसल्याची तक्रार मुलाच्या पालकांनी केली आहे. गर्भवती महिला पनवेल तालुक्यातील आदई येथे वास्तव्यास होती.

... तर बाळाचा मृत्यू झाला नसता

रविवारी सकाळी प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर महिलेची घरातच डिलिव्हरी झाली. सकाळी साडेदहा वाजता प्रसूती झाल्यानंतर त्यांना लगेच उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तपासणीनंतर आई आणि बाळ दोघेही व्यवस्थित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ च्या सुमारास बाळाला ताप आल्याचे परिचारिकेला कळविले. परिचारिकेने बाळाला दूध पाजायला सांगून कोणाला तरी पाठवते, असे सांगितले. मात्र, परिचारिका, डॉक्टर फिरकलेच नाहीत. त्यानंतर बाळाला आई स्वत: घेऊन परिचारिकेकडे गेली. बाळ हालचाल करीत नसल्याचे सांगितले.

त्यानंतर आलेल्या डॉक्टरांनी तपास केल्यानंतर बाळाचा मृत्यू झाल्याचे कळविले. प्रसूतीनंतर २४ तास बाळ व्यवस्थित होते. डॉक्टर वेळीच हजर असते तर बाळाचा मृत्यू झाला नसता, असा आरोप बाळाच्या आईने केला आहे.

संबंधित घटना अत्यंत दुर्दैवी आहे. बाळाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट होईल. - डॉ. शिवाजी पाटील (अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, पनवेल)

टॅग्स :panvelपनवेलHealthआरोग्यNavi Mumbaiनवी मुंबईhospitalहॉस्पिटल