शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नवीन शिक्षक भरतीला स्थगिती

By admin | Updated: January 31, 2017 03:44 IST

पाच वर्षे अल्प वेतनावर काम करणाऱ्या शिक्षकांना कमी करून नवीन भरती करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या निर्णयाने

नवी मुंबई : पाच वर्षे अल्प वेतनावर काम करणाऱ्या शिक्षकांना कमी करून नवीन भरती करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या निर्णयाने विद्यमान कंत्राटी शिक्षकांना दिलासा मिळाला असून पालिकेची दुटप्पी भूमिका उघड झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. पुरेसे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये यासाठी नोव्हेंबर २०११ पासून ठोक मानधनावर शिक्षकांची नियुक्ती केली आहे. पाच वर्षे तुटपुंज्या वेतनावर शिक्षक काम करत आहेत. अनेक वेळा दोन ते तीन महिने शिक्षकांना विनावेतन काम करावे लागले होते. ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी शिक्षकांचे परिश्रम लक्षात घेवून त्यांना १२ हजार रूपये मानधन करण्याच्या सूचना प्रशासनाला देवून त्याची अंमलबजावणी सुरू केली होती. पण विद्यमान आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात ठोक मानधनावरील ७२ शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात महापालिकेने आमच्याकडे अतिरिक्त शिक्षक असून या शिक्षकांची आवश्यकता नसल्याचे मत नोंदविले होते. पण प्रत्यक्षात २१ डिसेंबरला वृत्तपत्रामध्ये ठोक मानधनावर शिक्षक भरती करण्याची जाहिरात देण्यात आली होती. विद्यमान शिक्षकांना कामावरून कमी करून दुसरीकडे पुन्हा तशाचपद्धतीने शिक्षक भरती केली जात असल्याचे शिक्षकांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यामुळे न्यायालयाने महापालिकेच्या शिक्षक भरतीच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे ठोक मानधनावरील शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. दोन महिन्यापासून हे सर्व शिक्षक विनावेतन काम करत आहेत. त्यांना पुन्हा वेतन सुरू करावे अशी मागणी होवू लागली आहे. मुंबई व ठाणे परिसरात महापालिकेच्या शाळेतील पटसंख्या घसरत असताना नवी मुंबईमध्ये मात्र पालिका शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. पुरेसे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने पाच वर्षापूर्वी ठोक मानधनावर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. अनेक अडचणीनंतरही शिक्षक काम करत असताना त्यांना न्याय देण्यापेक्षा वारंवार कामावरून कमी करण्याची चर्चा होत आहे. यामुळे त्यांच्या कार्यशैलीवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)पालिकेचा अभ्यास कच्चाआयुक्त तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यापासून विविध विभागात धडक कार्यवाही सुरू आहे. एपीएमसी, इनॉर्बिटसह अनेक बांधकामांवर कारवाई करण्यात आली. पण अनेक ठिकाणच्या कारवाईला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यामुळे कारवाई करताना घाई होत असल्याने हे अपयश पदरात पडत असल्याचे मत शहरवासी व्यक्त करू लागले आहेत.