शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पनवेल-अंबरनाथच्या वेशीवर २१५ एकरांवर नवी एमआयडीसी, खासगीकरणातून उभी राहणार वसाहत

By नारायण जाधव | Updated: February 1, 2023 22:06 IST

खासगीकरणातून ही एकात्मिक औद्योगिक वसाहत उभी करण्यात येत आहे...

नवी मुंबई - रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्याच्या वेशीवर २१५ एकरांवर नवी एकात्मिक औद्योगिक वसाहत उभी राहत आहे. राज्य प्रदूषण मंडळाच्या संमती समितीने येथे पायाभूत सुविधा उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामुळे लवकरच या भागात पायाभूत सुविधांची कामे पूर्ण होऊन नवी औद्योगिक वसाहत कार्यन्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नव्या औद्योगिक वसाहतीत १६७० कोटी ४६ लाख रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.

खासगीकरणातून ही एकात्मिक औद्योगिक वसाहत उभी करण्यात येत आहे. मायक्रोटेक डेव्हल्पर्स लिमिटेड ती उभी करीत आहे. अंबरनाथ उसाटणे आणि पनवेल तालुक्यातील नीतळस गावांच्या हद्दीत ती उभी राहणार आहे. एकाच छताखाली या एमआयडीसीत विविध उद्याेग उभे राहणार आहेत.याबाबतचा प्रस्ताव प्रथम ऑगस्ट २०२२ मध्ये मायक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडने राज्य प्रदूषण मंंडळाच्या संमती समितीसमोर सादर केला होता. त्यावेळी संमती समितीने काही शंका उपस्थित करून विकासकास कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे ठरविले होते. यात पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक, पर्यावरणीय गुंतवणुकीत तफावत असणे, पर्यावरण मंजुरी नसणे, अशा शंका उपस्थित केल्या होत्या. त्यावर १२ डिसेंबर २०२२ रोजी आपले म्हणणे सादर केले. यात ही एकात्मिक औद्योगिक वसाहत असून, तिथे ते पायाभूत सुविधा पुरविणार आहेत. त्यासाठी ९३ कोटी ५१ लाख रुपये ते पहिल्या टप्प्यात खर्च करणार आहेत. येथे एकूण गुंतवणूक १६७० कोटी ४६ लाख रुपयांची असली तरी एकात्मिक औद्योगिक वसाहत असल्याने येणारे उद्योजक आपापली पर्यावरण परवानगी स्वतंत्र घेणार आहेत. कारण ते उद्योग विविध प्रकारचे राहणार आहेत. त्यामुळे विकासकास परत स्वतंत्र पर्यावरण परवानगी घेण्याची गरज नाही. या स्पष्टीकरणास प्रदूषण नियंत्रण मंडळाचे समाधान झाल्याने त्यांनी १८ जानेवारी २०२३ रोजीच्या आपल्या संमती समितीच्या बैठकीत मंजुरी दिली आहे. या बैठकीचे इतिवृत्त २ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रसिद्ध केले आहेत.

९३.५१ कोटींच्या पायाभूत सुविधाप्रस्तावित वसाहत ८,६२,९०१ चौरस मीटर क्षेत्रावर उभी राहणार असून, तिथे ९,८५,३३६ चौरस मीटर बांधकाम केले जाणार आहे, तर विकासक पहिल्या टप्प्यात ९३ कोटी ५१ लाख खर्चाच्या पायाभूत सुविधा पुरविणार आहे. 

टॅग्स :MIDCएमआयडीसीpanvelपनवेलambernathअंबरनाथ