शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

नेरूळमध्ये जलवाहिनीमधून गळती, दुरुस्तीकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 23:57 IST

नेरूळ सेक्टर २२ मधील जलकुंभाच्या बाहेरील जलवाहिनीला अनेक महिन्यांपासून गळती लागली आहे.

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २२ मधील जलकुंभाच्या बाहेरील जलवाहिनीला अनेक महिन्यांपासून गळती लागली आहे. प्रतिदिन हजारो लीटर पाणी वाया जात असून गळती थांबविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. देशातील मुबलक जलसाठा उपलब्ध असलेल्या महानगरांमध्ये नवी मुंबईचा समावेश होतो. स्वत:च्या मालकीचे मोरबे धरण असल्यामुळे शहरवासीयांना वर्षभर पुरेसे पाणी उपलब्ध करून देता येते. यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याकडे प्रशासन व ठेकेदारही दुर्लक्ष करत आहेत. नेरूळ सेक्टर २२ मध्ये तेरणा हॉस्पिटलच्या समोरही महापालिकेचा जलकुंभ आहे. जलकुंभाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरच पाणीगळती सुरू आहे. हजारो लीटर पाणी वाया जात आहे. पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या गटारामध्ये हे पाणी सोडले जात आहे. दक्ष नागरिकांनी ही गोष्ट ठेकेदाराच्या व कर्मचाऱ्यांच्या वारंवार निदर्शनास आणून दिली आहे. परंतु त्याची दुरुस्ती होत नाही.या जलकुंभाची जबाबदारी असणारे अधिकारी व कर्मचारीही याकडे दुर्लक्ष करू लागले आहेत. जलकुंभाच्या बाहेर काहीही समस्या असल्यास या अधिकारी व कर्मचाºयांशी संपर्क साधावा, असा फलक लावला आहे. परंतु यामधील एका कर्मचाºयाचा फोन बंद होता व दुसºया कर्मचाºयांनी फोनच उचलला नाही. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी याकडे लक्ष देऊन गळती थांबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.>वाशीमधील पाणीचोरी सुरूचसानपाडा व वाशी रेल्वे स्टेशनच्या मध्ये कॉल सेंटरमधील कर्मचाºयांची ने-आण करणाºया बसेस उभ्या केल्या जातात. या बसेसमधील चालक व वाहकांनी येथील जलवाहिनीमधील व्हॉल्वमधून पाणीचोरी सुरू केली आहे. वारंवार तक्रारी करूनही येथील चोरी थांबविली जात नसल्यामुळेही नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.