शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

नेरूळ, बेलापूर, कोपरखैरणे हाताबाहेर; कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 23:55 IST

नागरिकांचेही असहकार्य, दिघासह तुर्भे परिसरातील प्रादुर्भाव कमी करण्यात यश

- नामदेव मोरेनवी मुंबई : दिघा व तुर्भेसारख्या झोपडपट्टी परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात यश आले आहे. परंतु नेरूळ, बेलापूर व कोपरखैरणेमधील परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जाऊ लागली आहे. तीन विभागांमध्ये ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर नजीकच्या काळात रूग्ण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या उपाययोजनांची दिघा, तुर्भे परिसरात काटेकोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली असून, त्याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. जूनमध्ये तुर्भे, सानपाडा परिसरात सर्वाधिक रुग्ण होते. जुलैमध्ये या परिसराचा चौथा क्रमांक होता. आॅगस्टमध्ये तो सहाव्या तर सप्टेंबरमध्ये सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. पहिल्या क्रमांकावरून थेट सातव्या क्रमांकावर पोहोचण्यासाठी येथील नागरी आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी परिश्रम घेतले होते. दिघा परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले असून, रुग्णसंख्या एक हजारपर्यंतही पोहोचलेली नाही.

नवी मुंबईमध्ये सुरुवातीला सर्वांत कमी रुग्ण बेलापूर परिसरात होते. परंतु मागील काही दिवसांत बेलापूरची स्थितीही हाताबाहेर जाऊ लागली आहे. ६ आॅगस्टला या परिसरात १९७६ रुग्ण होते. एक महिन्यात तब्बल १५२७ रुग्ण वाढले असून, ६ सप्टेंबरला रुग्णसंख्या ३५०३ वर पोहोचली आहे. नागरिकांना विश्वासात घेऊन उपाययोजना राबविण्यात मनपाला अपयश येत आहे. नागरिकांकडूनही पालिकेला अपेक्षित सहकार्य मिळत नाही. शहरातील सर्वांत गंभीर स्थिती नेरूळमध्ये झाली आहे. येथे रुग्णसंख्या पाच हजारपेक्षा जास्त आहे. नागरिक नियम पाळत नसल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. कापखैरणेतील स्थितीही गंभीर आहे. साडेचार हजारपेक्षा जास्त रुग्ण झाले असून, शंभरपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

तुर्भे पॅटर्न राबविण्यात अपयश : जूनमध्ये तुर्भे परिसरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली होती. येथील नागरी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात यश मिळविले. तुर्भे पॅटर्नची चर्चा शहरभर झाली व तो इतर विभागांत राबविण्याच्या सूचना झाल्या. परंतु बेलापूर, नेरूळ व कोपरखैरणे परिसरात याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी झालेली नाही. रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांशी संपर्क व त्यांची तपासणी करण्यास अपेक्षित गती येत नसल्याने रुग्ण वाढत आहेत.

तपासणीस असहकार्य : बेलापूर व इतर काही परिसरामध्ये आरोग्य विभागाला नागरिकांचेही अपेक्षित सहकार्य मिळत नाही. एखादा रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य विभाग रुग्णाच्या संपर्कातील २०ते २५ नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. संपर्कातील व्यक्तीसही चाचणी करण्यास सांगितले जाते. परंतु बेलापूर परिसरात या मोहिमेला अपेक्षित यश येत नाही. संपर्कात येऊनही लक्षणे दिसेपर्यंत अनेक जण तपासणीच करीत नाहीत. पालिकेने अँटिजेन चाचण्यांची संख्या वाढविली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांसाठी लागणारा विलंब कमी करण्यासाठी स्वत:ची लॅब सुरू केली. प्रतिदिन एक हजार चाचण्यांची क्षमता असलेली लॅब सुरू झाल्यामुळे चाचण्यांसाठी होणारा विलंब थांबला.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरी आरोग्य केंद्रातील प्रमुख डॉक्टरांची भूमिकाही महत्त्वाची आहे. तुर्भे, दिघा परिसरात नागरी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी परिश्रम घेतल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात यश आले. बेलापूर विभागात करावे आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचा संपर्क व समन्वय उत्तम आहे. परंतु सीवूड सेक्टर ४८ मधील आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या कार्यशैलीविषयी अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. डॉक्टरांनीच योग्य समन्वय ठेवला नाही, तर नागरिकांचे त्यांना सहकार्य कसे लाभणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई