शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

"कानाखाली जाळ काढून विचारलं पाहिजे की..."; अमोल कोल्हेंचा अजित पवार गटावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 09:12 IST

पक्ष फोडून  चाणक्य होता येत  नाही तर स्वतःच्या हिंमतीवर पक्ष उभा करणारेच खरे चाणक्य आहेत, असंही अमोल कोल्हे म्हणाले.

नवी मुंबई :नवी मुंबईतील कळंबोली येथे काल शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची ‘स्वाभिमान सभा’ आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीतून बंड केलेल्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "शरद पवार यांनी काय केलं, असा प्रश्न काही जणांकडून विचारला जातो. मात्र असा प्रश्न विचारणाऱ्याच्या कानाखाली जाळ काढून विचारलं पाहिजे, पवारसाहेबांनी काय नाही केलं? ईडी , सीबीआयचे ग्रहण लागले की पहिला निष्ठेला धक्का लागतो," अशा शब्दांत अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाचा समाचार घेतला.

अजित पवार गटावर निशाणा साधताना अमोल कोल्हे पुढे म्हणाले की, "आपल्यातून गेलेले नेते दिल्लीश्वरांसमोर लोटांगण घालणारे आहेत. वतनदारी वाचवण्यासाठी त्या वेळेस अनेक जण दिल्ली दरबारी मुजरा घालत होते. महाराजांनी मात्र स्वराज्याचा स्वाभिमान निवडला. दिल्लीश्वरांना प्रश्न विचारायचा स्वाभिमान यांच्यात राहिला नाही. व्यवस्थेला प्रश्न विचारायचं बंद होतं, तेव्हा अंधभक्त तयार होतात. पक्ष फोडून  चाणक्य होता येत  नाही तर स्वतःच्या हिंमतीवर पक्ष उभा करणारेच खरे चाणक्य आहेत," असा टोलाही कोल्हे यांनी अजित पवारांना लगावला.

वळसे पाटलांवरही टीकास्त्र

शरद पवार यांचे निष्ठावंत सहकारी म्हणून ओळखले जाणारे नेते दिलीप वळसे पाटील हेदेखील अजित पवार गटात दाखल झाले आहेत. नवी मुंबईतील सभेत बोलताना अमोल कोल्हे यांनी वळसे पाटलांनाही टोला लगावला आहे. "जुन्नर आंबेगावचे लोक फक्त पुजाऱ्यालाच नमस्कार करायचे. आता याच पुजाऱ्याच्या डोक्यावर पाय ठेवायला जनता तयार झाली आहे," असं ते म्हणाले. 

जयंत पाटीलही बरसले!

भाजपवर पलटवार करताना जयंत पाटील म्हणाले की, "पवार साहेबांनी कायम माणसं जमा केली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेले २५ वर्ष सर्वत्र कसा पोहोचेल याकडे लक्ष दिले. आज आमच्यातून काही लोक आम्हाला सोडून गेलेले आहेत, परंतु आज पवार साहेबांच्या मागे सर्वसामान्य कार्यकर्ता छातीचा कोट करून साहेबांच्या मागे खंबीरपणे उभा आहे. पवार साहेबांची पुण्याई हे आपल्या सर्वांच्या कामाचे भांडवल आहे. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा एकमेव कार्यक्रम आहे तो म्हणजे, पवार साहेबांवर टीका करणे; आजही महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षाची बांधणी जोडणीबाबत सूत्र सांगण्याऐवजी पवार साहेबांवर निम्मा वेळ खर्च करून पवार साहेबांवर टीका करण्यात धन्यता मानली. का ? तर, त्यांना पवार साहेबांची भीती वाटते. पवार साहेबच भारतात फिरणारा अश्वमेध महाराष्ट्रात अडवू शकतात हे सर्वांना माहीत आहे, म्हणून त्यांनी साहेबांवर टीका केली. सध्या महाराष्ट्राचे राजकारण वेगळ्या स्थितीने चालू आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आरक्षणाविषयी योग्य निर्णय घेऊ शकत नाही," अशी टीका जयंत पाटील यांनी केली. 

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारpanvelपनवेलNavi Mumbaiनवी मुंबईNCPराष्ट्रवादी काँग्रेस