शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

नवी मुंबईची ३० वर्षांची पाणीचिंता मिटणार, नवीन जलस्रोतांसाठी भरीव तरतूद

By कमलाकर कांबळे | Updated: February 20, 2024 20:04 IST

तीन नव्या जलस्रोतांची केली चाचपणी

नवी मुंबई : शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पाण्याची गरजही भासू लागली आहे. या पार्श्वभूमीवर २०५५ पर्यंतच्या संभाव्य लोकसंख्येचा विचार करून महापालिकेने पाण्यासाठी पुढील तीस वर्षांचे नियोजन केले आहे. त्यानुसार २०२४-२५ च्या मूळ अर्थसंकल्पात नवीन जलस्रोतांचा शोध, महापालिका कार्यक्षेत्रातील पाणीपुरवठ्यातील वितरण व्यवस्थेत सुधारणांसाठी या अर्थसंकल्पात २०१ कोटी १७ लाखांची भरीव तरतूद आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केली आहे.

महापालिका स्वत:च्या मालकीच्या मोरबे धरणातून शहरवासीयांना चोवीस तास पाणीपुरवठा केला जात आहे; परंतु दिवसेंदिवस शहराची वाढणारी लोकसंख्या, पाणीपुरवठ्यातील गळती आदींमुळे सध्याच्या पाणीपुरवठा यंत्रणेवर ताण पडत आहे. मोरबे धरणातील उपलब्ध पाणीसाठा अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे शहराच्या अनेक भागांत पाणी समस्या भेडसावू लागली आहे. सध्या मोरबे धरणातून शहराला दैनंदिन ४५० द.ल.लि. पाणीपुरवठा केला जातो. पुढील तीस वर्षांत म्हणजे सन २०५५ पर्यंत शहराची संभाव्य लोकसंख्या पाहता दैनंदिन ९५० द.ल.लि. पाण्याची गरज भासणार आहे. एकूणच अतिरिक्त ५०० द.ल.लि. पाण्याचे आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे. त्यानुसार महापालिकेने नियोजन सुरू केले आहे.

*तीन नव्या जलस्रोतांची केली चाचपणीनवीन जलस्रोतांचा शोध घेण्यासाठी महापालिकेने तज्ज्ञांची समिती नियुक्त केली आहे. याअंतर्गत भीरा जलविद्युत प्रकल्पातून विसर्ग होणारे पाणी नवी मुंबईकडे वळविण्याची योजना आहे. त्याचबरोबर पावसाळ्यात पाताळगंगा नदीतील पाणी उचलणे, भीरा धरणातून कुंडलिका नदीचे पाणी वळविणे या नवीन जलस्रोतांचीसुद्धा महापालिकेकडून चाचपणी केली जात आहे. त्यासाठी चालू अर्थसंकल्पात २०१ कोटी १७ लाख रुपयांची भरीव तरतूद केली आहे.

*पाणी वितरणात सुधारणा करण्यासाठी विशेष भर

पाणीपुरवठ्यातील वितरण व्यवस्था बळकट करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विशेष प्रयास केले जात आहेत. १५ व्या वित्त आयोगामार्फत त्यासाठी आतापर्यंत २७६.८३ कोटी रुपये खर्चाचे प्रकल्प हाती घेतले आहेत. यात भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राची सुधारणा, भोकरपाडा ते पारसिक हिलपर्यंतच्या मुख्य जलवाहिनीचे बळकटीकरण करणे तसेच बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली आणि दिघा विभागात नवीन जलकुंभ बांधणे, जलवितरण व्यवस्थेत सुधारणा करणे पम्पिंग मशीन बदलणे या कामांचा समावेश आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातNavi Mumbaiनवी मुंबई