शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

नवी मुंबईकरांचा बुधवारचा दिवसही पाण्याविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 04:49 IST

ऐन पावसाळ्यात शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मोरबे धरणाच्या भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा यंत्रणेत बिघाड झाल्याने सोमवारपासून शहराला अनियमित पाणीपुरवठा होत आहे.

नवी मुंबई : ऐन पावसाळ्यात शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मोरबे धरणाच्या भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा यंत्रणेत बिघाड झाल्याने सोमवारपासून शहराला अनियमित पाणीपुरवठा होत आहे. बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी नागरिकांचे हाल झाले. विशेष म्हणजे गुरुवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेच्या संबंधित विभागाने जाहीर केले आहे.महापालिका स्वमालकीच्या मोरबे धरणातून शहराला पाणीपुरवठा करते. मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने धरण काठोकाठ भरले आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. असे असले तरी केवळ तांत्रिक अडचणीमुळे शहरवासीयांना मागील तीन दिवसांपासून पाणीटंचाईची झळ सहन करावी लागत आहे. भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा करणाºया रोहित्रात सोमवारी बिघाड झाला. त्याच्या दुरुस्तीनंतरही पुन्हा अडचणी निर्माण झाल्याने मंगळवारी कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात आला. मंगळवारी रात्रीपर्यंत दुरुस्तीचे हे काम सुरू होते. मात्र, तांत्रिक अडचणी वाढल्याने बुधवारीसुद्धा शहरवासीयांचा नियमित पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. गुरुवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.दरम्यान, सलग तीन दिवस अनियमित पाणीपुरवठा झाल्याने रहिवाशांचे हाल झाले. विशेषत: चाकरमानी आणि विद्यार्थ्यांची कसरत झाली. पिण्यासाठी अनेकांना बिस्लरी बाटल्यांचा वापर करावा लागला, तर त्या त्या विभागातील जलकुंभाच्या बाहेर पाण्यासाठी रहिवाशांची रीघ लागल्याचे दिसून आले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई