शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

नवी मुंबई लवकरच जाणार २५ लाखांवर; डेटा सेंटर्सची भर, अवजड वाहतुकीचा ताण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 06:52 IST

एपीएमसी, टीटीसी, शैक्षणिक संस्थांचे जाळे, २०११ साली झालेल्या जनगणनेत नवी मुंबईची लोकसंख्या ११ लाख २० हजार ५४७ होती. दहा वर्षांत त्यात सहा लाखांची भर पडल्याचा अंदाज आहे

नारायण जाधव

नवी मुंबई - सुनियोजित शहर असलेल्या नवी मुंबईच्या लोकसंख्या वाढीचा वेग राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत काहीसा जास्त आहे. येथील टीटीसी औद्योगिक वसाहतीतील आयटी उद्योग, डेटा सेंटर, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह कोकण भवन, सीजीओ कॉम्प्लेक्स, विविध बँकांची विभागीय कार्यालयांसह बांधकाम उद्योग आणि शिक्षण संस्थांच्या जाळ्यामुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या सध्या साडेअठरा ते वीस लाखांच्या घरात असल्याचा अंदाज आहे. जुन्या इमारतींचा पुनर्विकास आणि एमआयडीसीत निवासी बांधकामांना परवानगी दिल्याने नजीकच्या भविष्यात नवी मुंबई शहर लवकरच २५ लाखांवर जाईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. महापालिकेचे अंदाजपत्रकही पाच हजार कोटींवर गेले आहे. या शिवाय नजीकच्या पनवेल आणि उरणच्या जेएनपीएचा पसाराही मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

एमआयडीसीमुळे वाहनांचा भार

एपीएमसी मार्केट, औद्योगिक क्षेत्रात दररोज नवी मुंबईत आठ ते दहा हजारांच्या आसपास अवजड वाहनांची ये-जा असते. याशिवाय कळंबोलीचे स्टील मार्केट, जेएनपीए, तळोजा औद्योगिक वसाहत याठिकाणी ये-जा करणारी असंख्य अवजड वाहने नवी मुंबईतून मुंबई, ठाणेसह महामुंबईतील इतर शहरांत ये-जा करतात.

उल्हासनगरात सर्वाधिक गर्दी

उल्हासनगरच्या लोकसंख्येची घनता मुंबई, नवी मुंबई व ठाणे शहरांपेक्षा जास्त असल्याचे धक्कादायक वास्तव एमएमआरडीएने आपल्या २०१६ ते २०३६ या अहवालात समोर आणले आहे. नवी मुंबईत ती १०,३१५ आहे.

नवी मुंबई होणार ४१ लाखांची

२०११ साली झालेल्या जनगणनेत नवी मुंबईची लोकसंख्या ११ लाख २० हजार ५४७ होती. दहा वर्षांत त्यात सहा लाखांची भर पडल्याचा अंदाज आहे. मात्र, राज्य सरकारने एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली मंजूर केल्याने विकासकांना विकत वाढीव चटई निर्देशांक घेण्याची मुभा मिळाली आहे. त्यामुळे नवी मुंबईत सध्या पाच ते सहा वाढीव एफएसआयने टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. यात पुढील १२-१५ वर्षांत मोठी भर पडणार आहे. यामुळेच येत्या दहा वर्षांत शहराची लोकसंख्या किमान २८ तर कमाल ४१ लाखांपर्यंत वाढू शकते, असे विकास आराखडा सांगतो.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई