शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ १४ गावांचे लोढणे कशासाठी? 

By नारायण जाधव | Updated: March 17, 2025 11:01 IST

...यावरून ठाणे जिल्ह्यात शिंदेसेना विरूद्ध भाजप विशेषत: शिंदे आणि नाईक यांच्यात जुंपली, असे चित्र रंगविण्यात येत आहे. परंतु, वस्तुस्थिती शिंदेसेना - भाजप वा शिंदे - नाईक अशी नसून, सर्व खेळ अर्थकारणासह बिल्डरांच्या चांगभल्याचा दिसत आहे.

नारायण जाधव, उपवृत्तसंपादक

ठाणे - कल्याणच्या वेशीवरील १४ गावांचा नगरविकास विभागाने गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीआधी नवी मुंबईत समावेश केला. मात्र, त्यांच्या समावेशाने नवी मुंबई शहराचे नियोजन पुरते कोलमडून पडेल, असे सांगून राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या गावांच्या नवी मुंबईतील समावेशास विरोध केला आहे. यावरून ठाणे जिल्ह्यात शिंदेसेना विरूद्ध भाजप विशेषत: शिंदे आणि नाईक यांच्यात जुंपली, असे चित्र रंगविण्यात येत आहे. परंतु, वस्तुस्थिती शिंदेसेना - भाजप वा शिंदे - नाईक अशी नसून, सर्व खेळ अर्थकारणासह बिल्डरांच्या चांगभल्याचा दिसत आहे.

निघू, मोकाशीपाडा, नावाळी, भंडार्ली, पिंपरी गाव, गोटेघर, बंबार्ली, उत्तरशिव, नागाव, नारीवली, वाकळण, बाळे आणि दहीसर मोरी, ही ती गावे आहेत. खरं तर २००१मध्ये महापालिकेतून बाहेर पडल्यानंतर गेल्या २३ वर्षांत या गावांमध्ये ठाणे जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व एमएमआरडीएने सुविधा पुरविलेल्या नाहीत. वास्तविक, १९९२मध्ये १४ गावांचा समावेश केल्यानंतर नवी मुंबई महापालिकेनेही तेव्हा नळ योजना, रस्ते अशा सुविधा निर्माण करून नावाळीत माता - बाल रुग्णालय बांधले. येथून १९९५ व २००० या दोन पालिका निवडणुकीत दोन नगरसेवक निवडूनही आले. मात्र, सुविधा हव्यात परंतु, कर भरायला नको, या मानसिकतेच्या येथील ग्रामस्थांनी स्वत:हून नवी मुंबई महापालिकेतून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. परंतु, जिल्हा प्रशासन आणि जि. प.कडून सुविधा मिळत नसल्याने ‘आई जेऊ घालिना अन् बाप भीक मागू देईना’, अशी त्यांची अवस्था झाली आहे. 

यामुळेच पुन्हा एकदा आमचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करावा, अशी मागणी केली अन् तत्कालीन सरकारने २०२२मध्ये कोणताही सारासार विचार न करता ती मान्य केली. आता गावांमध्ये नवी मुंबईच्या धर्तीवर अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रारूप विकास आराखड्यानुसार ६,६०० कोटी रुपयांची गरज भासणार असल्याचे महापालिकेने नगरविकास विभागास कळविले आहे. यात एकत्रित क्षेत्रासाठी ६,१०० कोटी, तर निव्वळ गावठाणांतील सुविधांसाठी ५९१ काेटी लागणार आहेत. हा निधी कोण देणार, हाच कळीचा मुद्दा आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईthaneठाणेkalyanकल्याण