शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

‘त्या’ १४ गावांचे लोढणे कशासाठी? 

By नारायण जाधव | Updated: March 17, 2025 11:01 IST

...यावरून ठाणे जिल्ह्यात शिंदेसेना विरूद्ध भाजप विशेषत: शिंदे आणि नाईक यांच्यात जुंपली, असे चित्र रंगविण्यात येत आहे. परंतु, वस्तुस्थिती शिंदेसेना - भाजप वा शिंदे - नाईक अशी नसून, सर्व खेळ अर्थकारणासह बिल्डरांच्या चांगभल्याचा दिसत आहे.

नारायण जाधव, उपवृत्तसंपादक

ठाणे - कल्याणच्या वेशीवरील १४ गावांचा नगरविकास विभागाने गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीआधी नवी मुंबईत समावेश केला. मात्र, त्यांच्या समावेशाने नवी मुंबई शहराचे नियोजन पुरते कोलमडून पडेल, असे सांगून राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या गावांच्या नवी मुंबईतील समावेशास विरोध केला आहे. यावरून ठाणे जिल्ह्यात शिंदेसेना विरूद्ध भाजप विशेषत: शिंदे आणि नाईक यांच्यात जुंपली, असे चित्र रंगविण्यात येत आहे. परंतु, वस्तुस्थिती शिंदेसेना - भाजप वा शिंदे - नाईक अशी नसून, सर्व खेळ अर्थकारणासह बिल्डरांच्या चांगभल्याचा दिसत आहे.

निघू, मोकाशीपाडा, नावाळी, भंडार्ली, पिंपरी गाव, गोटेघर, बंबार्ली, उत्तरशिव, नागाव, नारीवली, वाकळण, बाळे आणि दहीसर मोरी, ही ती गावे आहेत. खरं तर २००१मध्ये महापालिकेतून बाहेर पडल्यानंतर गेल्या २३ वर्षांत या गावांमध्ये ठाणे जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व एमएमआरडीएने सुविधा पुरविलेल्या नाहीत. वास्तविक, १९९२मध्ये १४ गावांचा समावेश केल्यानंतर नवी मुंबई महापालिकेनेही तेव्हा नळ योजना, रस्ते अशा सुविधा निर्माण करून नावाळीत माता - बाल रुग्णालय बांधले. येथून १९९५ व २००० या दोन पालिका निवडणुकीत दोन नगरसेवक निवडूनही आले. मात्र, सुविधा हव्यात परंतु, कर भरायला नको, या मानसिकतेच्या येथील ग्रामस्थांनी स्वत:हून नवी मुंबई महापालिकेतून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. परंतु, जिल्हा प्रशासन आणि जि. प.कडून सुविधा मिळत नसल्याने ‘आई जेऊ घालिना अन् बाप भीक मागू देईना’, अशी त्यांची अवस्था झाली आहे. 

यामुळेच पुन्हा एकदा आमचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करावा, अशी मागणी केली अन् तत्कालीन सरकारने २०२२मध्ये कोणताही सारासार विचार न करता ती मान्य केली. आता गावांमध्ये नवी मुंबईच्या धर्तीवर अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रारूप विकास आराखड्यानुसार ६,६०० कोटी रुपयांची गरज भासणार असल्याचे महापालिकेने नगरविकास विभागास कळविले आहे. यात एकत्रित क्षेत्रासाठी ६,१०० कोटी, तर निव्वळ गावठाणांतील सुविधांसाठी ५९१ काेटी लागणार आहेत. हा निधी कोण देणार, हाच कळीचा मुद्दा आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईthaneठाणेkalyanकल्याण