शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

प्रेमविवाहाचा निर्णय चुकला अन् १९ वर्षीय तरूणीनं संपवलं जीवन; ३ महिन्यात मोडला संसार

By सूर्यकांत वाघमारे | Updated: July 17, 2023 17:51 IST

उलवे येथील नवविवाहितेच्या आत्महत्ये प्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबई : उलवे येथील नवविवाहितेच्या आत्महत्ये प्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन महिन्यांपूर्वीच त्यांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र लग्नानंतर पती व सासूकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर तिच्या आई वडिलांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

उलवे परिसरातील मोरावे गावात रविवारी दुपारच्या सुमारास हि घटना घडली आहे. त्याठिकाणी राहणाऱ्या सलोनी वैभव म्हात्रे (१९) या नवविवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मी महिन्यात तिचा वैभव म्हात्रे (२०) सोबत प्रेमविवाह झाला होता. दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती घरच्यांना मिळाल्यानंतर दोन्ही कुटुंबाच्या संमतीने त्यांचा विवाह लावून देण्यात आला होता. दरम्यान वैभव हा नोकरी, व्यवसाय करत नसल्याने तो पत्नी सलोनी हिला माहेरहून पैसे मागण्यास सांगत होता. शिवाय सासू व दीर देखील वेगवेगळ्या कारणांनी तिचा छळ करत होते. त्यामुळे सलोनीचे आई वडील तिच्या सुखासाठी तिला पैसे देखील पुरवत होते. शनिवारी तिची आई तिच्यासाठी गोड जेवण देखील घेऊन गेली होती. तर रविवारी दुपारी तिचा भाऊ पैसे देण्यासाठी बहिणीच्या सासरी गेला होता. यावेळी घरात कोणीही आढळून आले नव्हते.

 काही वेळाने सलोनीला रुग्णालयात दाखल केले असल्याचे त्यांना समजले. यामुळे त्यांनी रुग्णालयात धाव घेतली असता सलोनीचा मृत्यू झाला असून तिने सासरच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजले. प्रेमविवाह करून देखील पतीकडून झालेली निराशा व सासरी होणारा छळ याला कंटाळून तिने आत्महत्या  आरोप तिचे वडील देविदास मुंढेकर यांनी केला आहे. त्यानुसार रविवारी रात्री एनआरआय पोलिस ठाण्यात पती वैभव, सासू संगीता व दीर अमोल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट