शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

नवी मुंबई : आता शिवसेना शाखा ताब्यात घेण्यासाठी जोरदार फिल्डिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 11:40 IST

बंडखोरांना रोखण्याची रणनीती : शिवसैनिक झाले सतर्क

नवी मुंबई : नवी मुंबईतील शिवसेनेच्या शाखा ताब्यात ठेवण्याकरिता आता चढाओढ सुरू झाली आहे.  कोणत्याही परिस्थितीत या शाखा बंडखोरांच्या ताब्यात जाऊ नयेत, यासाठी शिवसैनिकांनी फिल्डिंग लावली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात ३० ते ३२ माजी नगरसेवक सामील झाल्यानंतर आता शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेण्याची मोहीम बंडखोरांकडून सुरू होण्याची शक्यता आहे. आम्ही शिवसैनिकच असल्याने या शाखा आमच्याच असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. मात्र, नवी मुंबईत यापूर्वी गणेश नाईकांनी वाशीतील मध्यवर्ती कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता, तो शिवसैनिकांनी हाणून पाडला होता. या कार्यालयाची जागा नाईक यांच्यासह दिवंगत बुधाजी भोईर यांच्या संयुक्त नावावर आहे. नाईक यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी हे  कार्यालय ताब्यात घेतले होते. मात्र, त्यानंतर  शिवसैनिकांनी तेथील साहित्य  फेकून पुन्हा ताबा घेतला होता. नंतर विनाकारण वाद नको म्हणून नाईक यांनी मोठ्या मनाने समर्थकांना  शांत राहण्यास सांगून हे कार्यालय शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयासाठीच राहू दिले आहे. 

आता शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. काही दिवसांपासून शिंदे गट हा उद्धव ठाकरे गटावर वरचढ ठरला आहे. एकामागून एक धक्के शिंदे गटाकडून ठाकरे गटाला दिले जात आहेत. दोनच दिवसांपूर्वी नवी मुंबईतील शिवसेनेच्या ३२ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला.  त्यामुळे या कार्यालयासह ऐरोली, जुगाव आणि बेलापूर येथील शाखांवर बंडखोर कब्जा करू शकतात. यावर बोलताना उपनगर प्रमुख अतुल कुलकर्णी यांनी सांगितले की, बेलापूर मतदारसंघात तसा परिणाम नाही.  ऐरोलीत थोडाफार परिणाम होऊ शकतो. 

मात्र, आम्ही खबरदारी घेऊ. तर शहरात इतर ठिकाणी ज्या शाखा भरतात, त्या पक्षाच्या नावावर नसून त्या-त्या ठिकाणच्या माजी नगरसेवक आणि जुन्या पदाधिकाऱ्यांच्या नावावर आहेत. परंतु, असे असले तरी कोणत्याही परिस्थितीत शिवसैनिक शाखांवरील ताबा सोडणार नाहीत, असा दावा बेलापूर मतदारसंघ जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी केला.

शिवसेनेत मोठं खिंडारनवी मुंबई शिवसेनेतही खिंडार पडल्याचे दिसत असताना आता नवी मुंबईतील शिवसेनेच्या शाखा ताब्यात ठेवण्यासाठी सर्वांचीच चढाओढ दिसून येत आहे. नवी मुंबईतील शिवसेना बंडखोरांकडे वळू नये यासाठी कंबर कसली जात आहे. शिवसेनेत फूट पडली असली तरी शाखा राखून ठेवण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNavi Mumbaiनवी मुंबईMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ