शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
2
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
3
शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना दिलासा नाही! ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणी अडचणी वाढल्या; न्यायालयाने दिले हे आदेश
4
शेतकऱ्याने तहसील कार्यालयात घेतले विष, खासदार प्रतिभा धानोरकरांवर गंभीर आरोप; मृतदेह स्वीकारण्यास नकार
5
“ठाकरेंची बाजू अतिशय भक्कम, ज्यांची कमकुवत ते प्रकरण पुढे ढकलायचा प्रयत्न करतात”: असीम सरोदे
6
आजपासून पिनसोबतच चेहरा अन् बोटांचे ठसे वापरूनही करा यूपीआयवरून व्यवहार; फसवणुकीला आळा बसणार
7
नात्याला काळीमा! सासूच्या प्रेमात वेडा झाला जावई; पत्नीची केली हत्या, प्रायव्हेट फोटो व्हायरल
8
'डिजिटल अरेस्ट' पासून कसे वाचायचे? समन्स खरे की खोटे असे ओळखा; ईडीने सगळीच माहिती सांगितली
9
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
12
भारतासोबतच्या संघर्षादरम्यान मोठी घडामोड; अमेरिका पाकिस्तानला देणार अत्याधुनिक क्षेपणास्त्रे!
13
इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल; गाझाशी आहे कनेक्शन
14
IND vs WI 2nd Test: बुमराहला संघाबाहेर ठेवणार? Playing XI मध्ये 'हे' २ बदल होण्याची शक्यता
15
अरे हा माणूस आहे का 'क्रेडिट कार्ड'? तब्बल १६३८ कार्ड वापरुन कमावतो पैसे; एक रुपयाही कर्ज नाही
16
देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?
17
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
18
कंपनीला एक चूक महागात पडली; सॅलरीपेक्षा ३०० पट रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठवली, मग जे घडलं...
19
Rajvir Jawanda: लोकप्रिय गायक राजवीर जवंदा यांच्या मृत्युमागचं कारण आलं समोर!
20
पतीवर उकळतं तेल फेकलं; तडफडताना पाहून मिरची पावडर जखमांवर ओतली! पत्नी इतकी क्रूर का झाली?

परांजपेंसाठी नवी मुंबई ठरू शकते फायद्याची, विचारेंना ठाणे, कोपरी प्लस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 23:30 IST

कसे असणार मतांचे गणित : नवी मुंबई, मीरा-भाईंदर राष्ट्रवादीला निर्णायक

- अजित मांडके ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे मतदारसंघात इतर उमेदवार असले, तरी खरी लढत ही शिवसेना विरुद्ध राष्टÑवादी अशीच होणार आहे.मागील लोकसभेपाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादीच्या हातातील तीन विधानसभा मतदारसंघ निसटले, तर शिवसेना आणि भाजपाच्या वाट्याला आता पाच मतदारसंघ आले आहेत; परंतु आता मोदीलाट ओसरली असल्याने राष्टÑवादीने ओवळा-माजिवडा, ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघांवर आपली मदार ठेवली आहे. तर, मीरा-भार्इंदरमध्ये फिफ्टी-फिफ्टी मतांचा जोगवा मिळण्याची शक्यता आहे. ठाणे, कोपरी, पाचपाखाडी हा मतदारसंघ निवडणुकीचा निकाल लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

२५ ठाणे लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीसह इतर काही छोटे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले, तरी खरी लढत ही राष्टÑवादी आणि शिवसेनेतच होणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे यांना ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, मीरा-भार्इंदर, ओवळा-माजिवडा, ऐरोली, बेलापूर या सर्वच विधानसभा मतदारसंघांतून राष्टÑवादीची पीछेहाट झाली होती. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीतही दिसून आला. राष्टÑवादीचा तीन विधानसभा मतदारसंघांत पराभव झाला. केवळ, ऐरोली मतदारसंघच त्यांना आपल्या ताब्यात ठेवण्यात यश आले. शिवाय, महापालिका निवडणुकांमध्येसुद्धा नवी मुंबई वगळता, ठाणे आणि मीरा-भार्इंदरमध्ये शिवसेना, भाजपचे नगरसेवक वाढलेले आहेत. परंतु, आता नवी मुंबई महापालिकेत राष्टÑवादीची सत्ता असल्याने या ठिकाणी शिवसेनेच्या मतांचा टक्का घटेल, असे बोलले जात आहे. तर, याच दोन मतदारसंघांतील मते राष्टÑवादीसाठी निर्णायक आणि निकालाला कलाटणी देणारी ठरू शकणार आहेत. शिवाय, मीरा-भार्इंदरमध्ये काँग्रेसने राष्टÑवादीला मदत केली, तर काहीअंशी मते वाढण्याची शक्यता आहे. तर, शिवसेनेसाठी कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, ओवळा-माजिवडा हे तीन मतदारसंघ निर्णायक ठरणार असून तेच टर्निंग पॉइंट ठरूशकणार आहेत.दोन उमेदवारांचे होल्ड असलेले हे आहेत प्रमुख विभागऐरोली आणि बेलापूरमध्ये सध्या नाईक फॅमिलीचे वर्चस्व आहे; परंतु मागील महापालिका निवडणुकीत या ठिकाणी शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये वाढ झालेली आहे, असे असले तरी हा पट्टा राष्टÑवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्यासाठी निर्णायक ठरूशकणार आहे.ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी विधानसभा क्षेत्रांतील मतपेट्या या शिवसेनेसाठी नेहमीच निर्णायक ठरल्या आहेत. या दोनही मतदारसंघांत शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांचा ९९ टक्के भरणा आहे. त्यामुळे नवी मुंबईत राष्टÑवादीने लीड घेतले, तरी तो हा पट्टा मोडू शकतो.मागील निवडणुकीत शिवसेनेला ऐरोली २५ हजार, बेलापूर २० हजार, ठाणे ६० हजार, कोपरी-पाचपाखाडी ६८ हजार, ओवळा-माजिवडा ५८ हजार आणि मीरा-भार्इंदरमध्ये ४२ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे ते तोडण्याचे आव्हान राष्टÑवादीसमोर असणार आहे.2009ऐरोली, बेलापूर, ओवळा -माजिवडा येथे नाईक यांना जास्तीची मते मिळाल्यामुळे निकालाची दिशा बदलली होती.2014या ठिकाणाहून विचारे यांना ठाणे, कोपरी-पाचपाखाडी येथून एकगठ्ठा मते मिळाली होती.

टॅग्स :thane-pcठाणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक