शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

परांजपेंसाठी नवी मुंबई ठरू शकते फायद्याची, विचारेंना ठाणे, कोपरी प्लस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 23:30 IST

कसे असणार मतांचे गणित : नवी मुंबई, मीरा-भाईंदर राष्ट्रवादीला निर्णायक

- अजित मांडके ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे मतदारसंघात इतर उमेदवार असले, तरी खरी लढत ही शिवसेना विरुद्ध राष्टÑवादी अशीच होणार आहे.मागील लोकसभेपाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादीच्या हातातील तीन विधानसभा मतदारसंघ निसटले, तर शिवसेना आणि भाजपाच्या वाट्याला आता पाच मतदारसंघ आले आहेत; परंतु आता मोदीलाट ओसरली असल्याने राष्टÑवादीने ओवळा-माजिवडा, ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघांवर आपली मदार ठेवली आहे. तर, मीरा-भार्इंदरमध्ये फिफ्टी-फिफ्टी मतांचा जोगवा मिळण्याची शक्यता आहे. ठाणे, कोपरी, पाचपाखाडी हा मतदारसंघ निवडणुकीचा निकाल लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

२५ ठाणे लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीसह इतर काही छोटे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले, तरी खरी लढत ही राष्टÑवादी आणि शिवसेनेतच होणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे यांना ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, मीरा-भार्इंदर, ओवळा-माजिवडा, ऐरोली, बेलापूर या सर्वच विधानसभा मतदारसंघांतून राष्टÑवादीची पीछेहाट झाली होती. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीतही दिसून आला. राष्टÑवादीचा तीन विधानसभा मतदारसंघांत पराभव झाला. केवळ, ऐरोली मतदारसंघच त्यांना आपल्या ताब्यात ठेवण्यात यश आले. शिवाय, महापालिका निवडणुकांमध्येसुद्धा नवी मुंबई वगळता, ठाणे आणि मीरा-भार्इंदरमध्ये शिवसेना, भाजपचे नगरसेवक वाढलेले आहेत. परंतु, आता नवी मुंबई महापालिकेत राष्टÑवादीची सत्ता असल्याने या ठिकाणी शिवसेनेच्या मतांचा टक्का घटेल, असे बोलले जात आहे. तर, याच दोन मतदारसंघांतील मते राष्टÑवादीसाठी निर्णायक आणि निकालाला कलाटणी देणारी ठरू शकणार आहेत. शिवाय, मीरा-भार्इंदरमध्ये काँग्रेसने राष्टÑवादीला मदत केली, तर काहीअंशी मते वाढण्याची शक्यता आहे. तर, शिवसेनेसाठी कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, ओवळा-माजिवडा हे तीन मतदारसंघ निर्णायक ठरणार असून तेच टर्निंग पॉइंट ठरूशकणार आहेत.दोन उमेदवारांचे होल्ड असलेले हे आहेत प्रमुख विभागऐरोली आणि बेलापूरमध्ये सध्या नाईक फॅमिलीचे वर्चस्व आहे; परंतु मागील महापालिका निवडणुकीत या ठिकाणी शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये वाढ झालेली आहे, असे असले तरी हा पट्टा राष्टÑवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्यासाठी निर्णायक ठरूशकणार आहे.ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी विधानसभा क्षेत्रांतील मतपेट्या या शिवसेनेसाठी नेहमीच निर्णायक ठरल्या आहेत. या दोनही मतदारसंघांत शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांचा ९९ टक्के भरणा आहे. त्यामुळे नवी मुंबईत राष्टÑवादीने लीड घेतले, तरी तो हा पट्टा मोडू शकतो.मागील निवडणुकीत शिवसेनेला ऐरोली २५ हजार, बेलापूर २० हजार, ठाणे ६० हजार, कोपरी-पाचपाखाडी ६८ हजार, ओवळा-माजिवडा ५८ हजार आणि मीरा-भार्इंदरमध्ये ४२ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे ते तोडण्याचे आव्हान राष्टÑवादीसमोर असणार आहे.2009ऐरोली, बेलापूर, ओवळा -माजिवडा येथे नाईक यांना जास्तीची मते मिळाल्यामुळे निकालाची दिशा बदलली होती.2014या ठिकाणाहून विचारे यांना ठाणे, कोपरी-पाचपाखाडी येथून एकगठ्ठा मते मिळाली होती.

टॅग्स :thane-pcठाणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक