शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नवी मुंबई :खासगी वाहनांतून अवैध प्रवासी वाहतूक, एनएमएमटीला १३ कोटींचा फटका; एसटीचेही नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 02:55 IST

पनवेल, नवी मुंबई, उरण परिसरांतील अवैध प्रवासी वाहतुकीचा फटका एनएमएमटी, एसटी महामंडळालाही बसू लागला आहे. एनएमएमटीचे तब्बल १३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

नामदेव मोरेनवी मुंबई : पनवेल, नवी मुंबई, उरण परिसरांतील अवैध प्रवासी वाहतुकीचा फटका एनएमएमटी, एसटी महामंडळालाही बसू लागला आहे. एनएमएमटीचे तब्बल १३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अर्थसंकल्पातील उद्दिष्ट पूर्ण करण्यात उपक्रमाला अपयश आले आहे. अवैध वाहतूक करणाºयांनी समांतर यंत्रणा उभी केली असून, वाहतूक पोलीस व आरटीओ प्रशासन त्यांच्यावर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत.नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने २०१८- १९चा अर्थसंकल्प सादर केला आहे. गतवर्षी ३१९ कोटी दोन लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता; परंतु नवीन ६० बसेस वेळेत ताफ्यात आल्या नाहीत व अवैध प्रवासी वाहतुकीमुळे प्रवासी संख्येत वाढ होऊ शकली नाही. तब्बल ७१ कोटी ४६ लाख रुपयांचे उद्दिष्ट साध्य करता आलेले नाही. यामुळे २४७ कोटी ६९ लाख रुपयांचा सुधारित अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे उत्पन्नावर गंभीर परिणाम झाला असल्याचे प्रशासनाने मान्य केले ंआहे.परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी त्यांच्या निवेदनामध्ये त्याविषयी स्पष्ट उल्लेखही केला आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणाºयांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जुईनगर, सानपाडा व नेरुळ रेल्वेस्थानकावरून कल्याण, डोंबिवली, उरणपर्यंत ट्रक्स व इतर वाहनांतून प्रवासीवाहतूक केली जात आहे. याशिवाय खारघर, तळोजा, महापे, ठाणे सिडको बसस्टॉप परिसरामध्ये तब्बल दीड हजार खासगी वाहनांमधून अवैधपणे प्रवासीवाहतूक केली जाते. याशिवाय ठाणे-बेलापूर रोड, सायन-पनवेल महामार्ग, उरण रोडवर अनेक खासगी बसेस व इतर वाहनांमधून प्रवासीवाहतूक सुरू आहे.एनएमएमटीने गतवर्षी प्रवासी वाहतुकीमधून १०२ कोटी ७४ लाख रुपयांचा महसूल मिळविण्याचे उद्दिश्ट निश्चित केले होते; पण प्रत्यक्षात नोव्हेंबरअखेर ५५ कोटी ९७ लाख रुपये वसूल झाले होते. मार्चअखेरपर्यंत उत्पन्नाचा आकडा ८९ कोटी ४४ लाख रुपये होण्याची शक्यता आहे. तब्बल १३ कोटी रुपयांचा फटका बसला आहे.अवैध प्रवासी वाहतुकीकडे दुर्लक्ष करणे परिवहनला परवडणारे नाही. अशीच स्थिती राहिली, तर तोटा दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. एनएमएमटी बरोबर बेस्ट, केडीएमटी व एसटी, बसेसच्या उत्पन्नावरही प्रचंड परिणाम होत आहे. महामार्गावर एसटीच्या थांब्यावरून खासगी ट्रॅव्हल्स, कार, जीप व इतर वाहनांमधून प्रवासी वाहतूक सुरू आहे.तीन हजारांपेक्षा जास्त खासगी वाहने धावत आहेत. एसटी महामंडळाचा कोट्यवधी रुपयांचा तोटा होत असून, तो भरून काढण्यासाठी आरटीओ, पोलीस व परिवहन उपक्रमांनाही कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.संयुक्त कारवाईची गरजअवैध प्रवासी वाहतूक थांबविण्यासाठी एनएमएमटी, एसटी महामंडळ, पोलीस, आरटीओ यांनी संयुक्त मोहीम राबविण्याची गरज आहे. कारवाईसाठी व पाठपुरावा करण्यासाठी समन्वय समिती तयार करावी. सर्वांनी एकत्र येऊन विशेष मोहिमा राबविल्या, तरच अवैध प्रवासीवाहतूक थांबेल, असे मत एनएमएमटी कर्मचाºयांनी व्यक्त केले आहे.बसेसचे प्रमाण वाढवावेअवैध प्रवासीवाहतुकीमुळे नुकसान होते हे खरे आहे; परंतु एनएमएमटी व इतर उपक्रम चांगली व वेळेत सेवा देण्यात अपयशी ठरत असल्यामुळे अवैध प्रवासी वाहतुकीला चालना मिळत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम झाली तर अवैध वाहतूक आपोआप बंद होईल, असे मत काही प्रवाशांनी व्यक्त केले आहे. गाड्याची दुरवस्था, वारंवार होणारा बिघाडामुळे खासगी वाहतुकीला प्रवाशांकडून पसंती मिळत आहे.१०४ कोटींचे उद्दिष्टएनएमएमटी उपक्रमाने पुढील वर्षासाठी १०४ कोटी रुपये उद्दिष्ट निश्चित केले आहे. गतवर्षीचे उत्पन्न ८९ कोटी आहे. अवैध वाहतूक थांबविली नाही, तर पुढील वर्षाचे उद्दिष्ट साध्य करणेही अशक्य होणार आहे. एनएमएमटीचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर अवैध वाहतूक थांबविण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई