शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

नवी मुंबईतील दहिसरमध्ये ३० गोदामांना भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 17:50 IST

या घटनेची माहिती मिळताच ठाणे, कोपरखैरणे, सीबीडी बेलापूर, कळंबोली, नेरुळ आणि वाशी येथील अग्निशमन दलाच्या गाड्या आणि कर्मचारी आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले.

नवी मुंबईतील दहिसर परिसरात शनिवारी पहाटे काही गोदामांना भीषण आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल ९ तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. ही आग कशामुळे लागली, अद्याप याबाबत समजू शकलेले नाही. सुदैवाने, या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासीन तडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकूरपाडा येथील इराणी मशिदीजवळील २५ ते ३० गोदामांना शनिवारी पहाटे १.०० वाजताच्या सुमारास आग लागली. गोदामांमध्ये डांबर, प्लास्टिक ड्रम, कॉम्प्रेसर यांसारख्या ज्वलनशील वस्तू होत्या. त्यामुळे आग झपाट्याने वाढली.

या घटनेची माहिती मिळताच ठाणे, कोपरखैरणे, सीबीडी बेलापूर, कळंबोली, नेरुळ आणि वाशी येथील अग्निशमन दलाच्या गाड्या आणि कर्मचारी आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आग पुन्हा भडकू नये यासाठी शीतकरण ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. सुदैवाने, या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. या आगीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईfireआग