शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Navi Mumbai: आंबा निर्यातीसाठी मार्केट २४ तास खुले, बाजार समितीचेही प्रोत्साहन, व्यापारासाठी अत्यावश्यक सुविधांचीही पूर्तता

By नारायण जाधव | Updated: March 13, 2024 18:45 IST

Mango Export News: आंबानिर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी बाजार समिती प्रशासनानेही प्रयत्न सुरू केले आहेत. मार्केटमध्ये ४१ निर्यातदार आहेत. निर्यातीसाठी २४ तास मार्केट खुले केले आहे. व्यापारासाठी अत्यावश्यक सुविधाही पुरविण्यात येत आहेत.

- नामदेव मोरेनवी मुंबई - आंबानिर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी बाजार समिती प्रशासनानेही प्रयत्न सुरू केले आहेत. मार्केटमध्ये ४१ निर्यातदार आहेत. निर्यातीसाठी २४ तास मार्केट खुले केले आहे. व्यापारासाठी अत्यावश्यक सुविधाही पुरविण्यात येत आहेत.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आंबाविक्रीची देशातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. कोकणच्या हापूससह गुजरात, उत्तरप्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश व केरळवरून आंबा येथे विक्रीसाठी येत असतो. प्रत्येक वर्षी ३०० ते ५०० कोटी रुपयांची उलाढाल आंबा हंगामामध्ये होत असते. येथून मोठ्या प्रमाणात आंब्याची निर्यात होते.

बाजार समितीच्या फळमार्केटमध्ये ४१ निर्यातदारांची कार्यालये आहेत. बाजार समितीने स्वतंत्र निर्यातभवन इमारतही बांधली आहे.आंबा हंगामामध्ये निर्यातीसाठी २४ तास मार्केट खुले केले आहे. मार्केटमध्ये येणाऱ्या आंब्यामधील निर्यातक्षम आंब्याची निवड, पॅकिंग व इतर प्रक्रिया पुर्ण करताना कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी घेतली जात आहे. प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक त्या सर्व सुविधाही दिल्या जात आहेत.

आंबा घेवून येणारी वाहने विनाअडथळा मार्केटमध्ये येण्यासाठी विशेष नियोजन केले आहे. गेट क्रमांक ३ मधून फक्त आंबा घेवून येणाऱ्या वाहनांना प्रवेश दिला जात आहे. मार्केटमध्ये स्वच्छतेपासून इतर सुविधांवरही लक्ष दिले जात आहे. मार्केटमधून सद्यस्थितीमध्ये ८ ते १० हजार पेट्यांची नियमित निर्यात सुरू आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंबा हंगाम सुरू झाला आहे. व्यवसायामध्ये अडथळे निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. निर्यातीसाठी २४ तास मार्केटमध्ये खुले ठेवले आहे.- संगीता अढांगळे, उपसचिव, फळमार्केट

आंबा आवक वाढलीमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढली आहे. बुधवारी ३४ हजार ५५७ पेट्यांची आवक झाली असून यामध्ये २६,२२० पेट्या कोकण व ८,३३७ पेट्यांची आवक इतर राज्यांमधून झाली आहे. पुढील आठवड्यात आवक अजून वाढण्याचा अंदाज आहे.

टॅग्स :MangoआंबाAlphonso Mangoहापूस आंबाNavi Mumbaiनवी मुंबई