शहरं
Join us  
Trending Stories
1
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्यूत्तर; किनी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
2
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
3
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
4
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
5
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
6
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
7
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
8
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
9
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
10
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
11
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
12
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
13
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
14
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
15
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
16
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
17
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
18
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
19
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
20
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?

मल्टिमॉडेल कनेक्टिव्हिटीचे नवी मुंबई हे पहिले विमानतळ; ज्योतिरादित्य शिंदे यांची माहिती  

By कमलाकर कांबळे | Published: January 13, 2024 6:44 PM

गतीशक्ती योजनेंतर्गत देशातील प्रत्येक विमानतळाला मल्टिमॉडेल कनेक्टिव्हिटी निर्माण करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे.

नवी मुंबई: गतीशक्ती योजनेंतर्गत देशातील प्रत्येक विमानतळाला मल्टिमॉडेल कनेक्टिव्हिटी निर्माण करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे. त्यानुसार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मल्टिमॉडेल कनेक्टिव्हिटी असणारे देशातील पहिले विमानतळ असेल, अशी माहिती नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शनिवारी पत्रकारांना दिली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे. नागरी उड्डाण मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाकडून प्रत्येक महिन्याला या कामाचा अहवाल मागविला जातो. शिंदे यांनी शनिवारी प्रत्यक्ष प्रकल्प स्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर सिडकोसह संबधित यंत्रणासोबत बैठक घेऊन आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

मेट्रोचे तीन मार्ग विमानतळाला जोडणारनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला रस्ते, रेल्वे आणि मेट्रोची कनेक्टिव्हिटी लाभणार आहे. तर, भविष्यात जलमार्गाचा पर्यायसुद्धा उपलब्ध केला जाणार आहे. सध्या राष्ट्रीय महामार्ग ४ बी ३४८, सायन पनवेल-महामार्ग आणि शुक्रवारी उद्घाटन झालेला शिवडी-न्हावाशेवा सेतू हे तीन मार्ग विमानतळाला जोडले गेले आहेत. तर, खारकोपर-उरण मार्गावरील तरघर रेल्वेस्थानक विमानतळाच्या जवळ आहे. तसेच, मेट्रोचे तीन मार्ग विमानतळाला जोडले जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी खासदार संजीव नाईक तसेच सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर आणि अदानी समूहाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.विमानतळाचे पहिले टेकऑफ लांबणीवर

नवी मुंबई विमानतळ हा देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. पहिला टप्पा डिसेंबर २०२४ मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु, त्याचा व्यावसायिक वापर ३१ मार्च २०२५ पासून सुरू केला जाईल. कारण विमानतळ प्रकल्पासाठी वेगवेगळ्या संस्था काम करीत आहेत. त्यानुसार प्रत्येक संस्थेला जबाबदारी आणि डेडलाइन आखून दिल्याचे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

नामकरणाचा निर्णय कॅबिनेट घेईलनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. असे असले तरी या नामकरणाचा निर्णय कॅबिनेट आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

विमानतळाची वैशिष्ट्ये

नवी मुंबई विमानतळ पाच टप्प्यांत उभारले जाणार आहे. टप्पा क्रमांक १ आणि २ एकत्रित पूर्ण केले जाणार आहे. यात एक टर्मिनल आणि एक रन वे असणार आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत हा टप्पा व्यावसायिक वापरासाठी खुला होईल. याअंतर्गत दोन कोटी प्रवासी प्रवास करू शकतील, असा अंदाज आहे. तर, टप्पा क्रमांक ३, ४ आणि ५ मध्ये तीन टर्मिनल आणि एक रन वे असणार आहे. या टप्प्यानंतर वार्षिक ९ कोटी प्रवासी वाहतूक होईल, असा अंदाज शिंदे यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदे