शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

नवी मुंबईमध्ये १२ वर्षांतील विक्रमी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 23:43 IST

महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये या वर्षी ४१३७ मिलीमीटर एवढी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.

योगेश पिंगळेनवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये या वर्षी ४१३७ मिलीमीटर एवढी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी पेक्षा जवळपास दुप्पट पाऊस पडला असून, सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रोडवर पडलेल्या खड्ड्यांमुळे व सततच्या वाहतूककोंडीमुळे वाहतूकदार व प्रवासी त्रस्त झाले आहेत. एपीएमसी व इतर ठिकाणी कष्टाची कामे करणारेही त्रस्त झाले आहेत.नवी मुंबईमध्ये जून अखेरपासून नियमित पाऊस सुरू झाला असून सप्टेंबरचा दुसरा आठवडा सुरू झाला तरी अद्याप पाऊस थांबलेला नाही. मंगळवारी पडलेल्या पावसामुळेही ठाणे-बेलापूर रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे या रोडवर वाहतूककोंडी निर्माण झाली होती. शहरात इतर रोडवरही खड्ड्यांमुुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होऊ लागले होते. सानपाडा भुयारमार्गाजवळची परिस्थितीही गंभीर झाली होती. येथे रोडवर मोठे खड्डे पडले असून पावसामुळे ते बुजविणेही शक्य होत नाही. या वर्षी शहरात ३० पेक्षा जास्त ठिकाणी पाणी साचले होते. २००५ नंतर प्रथमच एमआयडीसीमधील वसाहतींमध्ये पाणी जाण्याच्या घटना घडल्या आहेत. गतवर्षी पूर्ण वर्षभरात २६३६ मिलीमीटर एवढी पावसाची नोंद झाली होती. या वर्षी तब्बल ४१३७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. १२ वर्षांमध्ये पहिल्यांदाच एवढा पाऊस पडला आहे. आतापर्यंत १०० पेक्षा जास्त वृक्ष कोसळले असून, शॉर्टसर्किट व इतर घटनाही वाढल्या आहेत.पाऊस थांबत नसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बाजार समितीमध्ये मालाची चढ-उतार करणाऱ्या कामगारांनाही काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. फेरीवाले, मार्केटिंग व इतर काम करणारे कर्मचारीही त्रस्त झाले आहेत. प्रवास करतानाही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तीन महिन्यांपासून रेल्वेसेवाही अनेक वेळा विस्कळीत झाली आहे. यामुळे कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचता येत नाही. बस व इतर वाहनांनी प्रवास करणाऱ्यांना खड्डे व वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. वाहने नादुरुस्त होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. रिक्षा, दुचाकी व इतर वाहनांमध्ये वारंवार बिघाड निर्माण होत आहे. गॅरेजसमोर वाहने उभी करण्यासही जागा उपलब्ध नाही.>अपघाताचे प्रमाणही वाढलेपाऊस सुरू झाल्यापासून अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. पनवेलमध्ये नदीमध्ये वाहून गेल्यामुळे तीन ते चार जणांना जीव गमवावा लागला आहे. पांडवकडा धबधब्यामध्ये चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. महामार्गावर व इतर ठिकाणी झालेल्या अपघातामध्येही अनेकांना जीव गमवावा लागला आहे. सायन-पनवेल महामार्ग, ठाणे-बेलापूर रोड व इतर ठिकाणी रोज अपघात होत आहेत. पाऊस थांबत नसल्यामुळे खड्डेही बुजविण्याच्या कामातही अडथळे निर्माण होऊ लागले आहेत.

 

>वर्षनिहाय पडलेल्या पावसाची आकडेवारी २००७ २४४८.००२००८ २३१७.२८२००९ १६७०.१७१०१० २३६३.४३२०११ २६१०.६३२०१२ २२५२.५९२०१३ ३३३७.२८२०१४ २५८३.५२२०१५ १६०१.१४२०१६ २७०६.४२२०१७ ३०८८.२४२०१८ २६३६.७८२०१९ ४१३७.०३(११ सप्टेंबर २०१९ पर्यंत)>मोरबे धरण परिसर पाऊसवर्ष पाऊस धरण पातळी२००४ ३१७४.३४ ७२.००२००५ ४४६६.११ ७९.६०२००६ ४२९७.८० ८४.१८२००७ ३३४३.८० ८७.२५२००८ ३५७४.०० ८८.००२००९ २४२६.२० ८४.७५२०१० ३५५८.०० ८७.३५२०११ ३८३६.०० ८८.००२०१२ २९१६.४० ८४.६३२०१३ ३९८४.३० ८८.००२०१४ ३१३८.२० ८७.४५२०१५ २२००.२० ७९.५१२०१६ ३३२८.२० ८५.६०२०१७ ४१३९.०० ८८.००२०१८ ३२३८.२० ८८.००२०१९ ४८२१.०० ८७.७५(१७ सप्टेंबर २०१९ पर्यंत)पाऊस (मि.मी.) पातळी (मीटर)>सततच्या पावसामुळे रिक्षाचालकही त्रस्त झाले आहेत. पावसात भिजल्यामुळे अनेक चालक आजारी पडत आहेत. वाहने नादुरुस्तीचे प्रमाणही वाढले आहे.- पद्माकर मेहेर, अध्यक्ष,नेरुळ विभाग रिक्षाचालक-मालक कल्याणकारी संस्था

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई