शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईमध्ये १२ वर्षांतील विक्रमी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 23:43 IST

महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये या वर्षी ४१३७ मिलीमीटर एवढी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.

योगेश पिंगळेनवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये या वर्षी ४१३७ मिलीमीटर एवढी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी पेक्षा जवळपास दुप्पट पाऊस पडला असून, सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रोडवर पडलेल्या खड्ड्यांमुळे व सततच्या वाहतूककोंडीमुळे वाहतूकदार व प्रवासी त्रस्त झाले आहेत. एपीएमसी व इतर ठिकाणी कष्टाची कामे करणारेही त्रस्त झाले आहेत.नवी मुंबईमध्ये जून अखेरपासून नियमित पाऊस सुरू झाला असून सप्टेंबरचा दुसरा आठवडा सुरू झाला तरी अद्याप पाऊस थांबलेला नाही. मंगळवारी पडलेल्या पावसामुळेही ठाणे-बेलापूर रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे या रोडवर वाहतूककोंडी निर्माण झाली होती. शहरात इतर रोडवरही खड्ड्यांमुुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होऊ लागले होते. सानपाडा भुयारमार्गाजवळची परिस्थितीही गंभीर झाली होती. येथे रोडवर मोठे खड्डे पडले असून पावसामुळे ते बुजविणेही शक्य होत नाही. या वर्षी शहरात ३० पेक्षा जास्त ठिकाणी पाणी साचले होते. २००५ नंतर प्रथमच एमआयडीसीमधील वसाहतींमध्ये पाणी जाण्याच्या घटना घडल्या आहेत. गतवर्षी पूर्ण वर्षभरात २६३६ मिलीमीटर एवढी पावसाची नोंद झाली होती. या वर्षी तब्बल ४१३७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. १२ वर्षांमध्ये पहिल्यांदाच एवढा पाऊस पडला आहे. आतापर्यंत १०० पेक्षा जास्त वृक्ष कोसळले असून, शॉर्टसर्किट व इतर घटनाही वाढल्या आहेत.पाऊस थांबत नसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बाजार समितीमध्ये मालाची चढ-उतार करणाऱ्या कामगारांनाही काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. फेरीवाले, मार्केटिंग व इतर काम करणारे कर्मचारीही त्रस्त झाले आहेत. प्रवास करतानाही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तीन महिन्यांपासून रेल्वेसेवाही अनेक वेळा विस्कळीत झाली आहे. यामुळे कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचता येत नाही. बस व इतर वाहनांनी प्रवास करणाऱ्यांना खड्डे व वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. वाहने नादुरुस्त होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. रिक्षा, दुचाकी व इतर वाहनांमध्ये वारंवार बिघाड निर्माण होत आहे. गॅरेजसमोर वाहने उभी करण्यासही जागा उपलब्ध नाही.>अपघाताचे प्रमाणही वाढलेपाऊस सुरू झाल्यापासून अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. पनवेलमध्ये नदीमध्ये वाहून गेल्यामुळे तीन ते चार जणांना जीव गमवावा लागला आहे. पांडवकडा धबधब्यामध्ये चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. महामार्गावर व इतर ठिकाणी झालेल्या अपघातामध्येही अनेकांना जीव गमवावा लागला आहे. सायन-पनवेल महामार्ग, ठाणे-बेलापूर रोड व इतर ठिकाणी रोज अपघात होत आहेत. पाऊस थांबत नसल्यामुळे खड्डेही बुजविण्याच्या कामातही अडथळे निर्माण होऊ लागले आहेत.

 

>वर्षनिहाय पडलेल्या पावसाची आकडेवारी २००७ २४४८.००२००८ २३१७.२८२००९ १६७०.१७१०१० २३६३.४३२०११ २६१०.६३२०१२ २२५२.५९२०१३ ३३३७.२८२०१४ २५८३.५२२०१५ १६०१.१४२०१६ २७०६.४२२०१७ ३०८८.२४२०१८ २६३६.७८२०१९ ४१३७.०३(११ सप्टेंबर २०१९ पर्यंत)>मोरबे धरण परिसर पाऊसवर्ष पाऊस धरण पातळी२००४ ३१७४.३४ ७२.००२००५ ४४६६.११ ७९.६०२००६ ४२९७.८० ८४.१८२००७ ३३४३.८० ८७.२५२००८ ३५७४.०० ८८.००२००९ २४२६.२० ८४.७५२०१० ३५५८.०० ८७.३५२०११ ३८३६.०० ८८.००२०१२ २९१६.४० ८४.६३२०१३ ३९८४.३० ८८.००२०१४ ३१३८.२० ८७.४५२०१५ २२००.२० ७९.५१२०१६ ३३२८.२० ८५.६०२०१७ ४१३९.०० ८८.००२०१८ ३२३८.२० ८८.००२०१९ ४८२१.०० ८७.७५(१७ सप्टेंबर २०१९ पर्यंत)पाऊस (मि.मी.) पातळी (मीटर)>सततच्या पावसामुळे रिक्षाचालकही त्रस्त झाले आहेत. पावसात भिजल्यामुळे अनेक चालक आजारी पडत आहेत. वाहने नादुरुस्तीचे प्रमाणही वाढले आहे.- पद्माकर मेहेर, अध्यक्ष,नेरुळ विभाग रिक्षाचालक-मालक कल्याणकारी संस्था

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई