शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

निवडणुकांमुळे नवी मुंबईकरांवर यंदाही करवाढीचा बोजा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 02:06 IST

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे

नवी मुंबई : शहरवासीयांवर कोणत्याही करवाढीचा बोजा न लादणारा अर्थसंकल्प आयुक्तांनी मंगळवारी स्थायी समितीमध्ये सादर केला आहे. सलग १६ वर्षे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पुढील वर्षभरामध्ये घणसोलीसह सीबीडीमध्ये उड्डाणपूल बांधणे, नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागले होते. प्रत्येक वर्षी अनेक महत्त्वाकांक्षी व नागरिकांचे लक्ष वेधतील अशा घोषणांचा वर्षाव अर्थसंकल्पातून होत असतो. परंतु या वर्षी फारशा नवीन घोषणा केलेल्या नाहीत. जुन्याच प्रस्तावित योजना पुढील वर्षभरामध्ये कार्यान्वित करण्यात येणार आहेत. ३८५० रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. महापालिका या वर्षीही स्थानिक संस्था करावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असणार आहे. १२५० कोटी रुपये उत्पन्न मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महापालिकेस नोव्हेंबर अखेर २५१ रुपये मालमत्ता करातून वसूल झाले आहेत. मार्च २०२० अखेरपर्यंत ७०० कोटी रुपये वसूल होतील, अशी अपेक्षा आहे. २०२०-२१ मध्ये ६३० कोटी रुपये जमा होतील, असा अंदाज आहे. महापालिकेने भूखंड हस्तांतरणावर लक्ष केंद्रित केले आहे. आतापर्यंत ५५४ भूखंड हस्तांतर झाले असून अजून ५२० भूखंडांची मागणी करण्यात आली आहे. एमआयडीसीकडून आतापर्यंत ६१ भूखंड आलेले असून २३३ भूखंडांची मागणीही केली आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी पालिकेकडे ९९ एकर जमीन हस्तांतरित झालेली असून अजून २३३ भूखंडांची मागणी महापालिकेने केलेली आहे. शहरवासीयांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी प्रत्येक नोड व प्रभागांचा विकास होईल या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.गतवर्षी आयुक्तांनी ३४५५ कोटी ६४ लाख रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीमध्ये सादर केला होता. स्थायी समितीमध्ये त्यामध्ये १७३ कोटी रुपयांची वाढ करून ३६२९ कोटी ४४ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली होती. सर्वसाधारण सभेनेही त्यामध्ये १३९ कोटी रुपयांची वाढ करून ४०२० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी दिली होती. या वर्षी निवडणुका असल्यामुळे स्थायी समिती व महासभेकडून शहरवासीयांना आकर्षित करणाºया योजनांचा अर्थसंकल्पात समावेश केला जाण्याची शक्यता आहे. यामुळे स्थायी समिती आयुक्तांच्या अंदाजामध्ये नक्की किती वाढ करणार व त्यामध्ये सर्वसाधारण सभा किती वाढ करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सातव्या वेतन आयोगाचाही तिजोरीवर भारनवी मुंबई महानगरपालिकेने कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी लोकप्रतिनिधींनीही केली आहे. आयोग लागू करण्यासाठी प्रशासनाने शासनाकडे परवानगी मागितली आहे. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केल्यानंतर वर्षाला २०० कोटी रुपयांचा भार तिजोरीवर पडणार आहे.पामबीचवर मिसिंगलिंक प्रस्तावितपामबीच रोडला नवी मुंबईचा क्वीन्स नेकलेस असे संबोधले जात आहे. या रोडवर काही ठिकाणी सर्व्हिस रोड आहे तर काही ठिकाणी तो अस्तित्वात नाही. यामुळे मार्गावर मिसिंग लिंक प्रस्तावित करण्यात आली आहे. याशिवाय या रोडवर सुशोभीकरणाची कामेही केली जाणार आहेत.पाणीपुरवठा विभागाची कसरतमहापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने २०१८-१९ वर्षामध्ये १०५ कोटी २४ रुपये कर संकलित केला होता. पाणीपुरवठा योजनांवर ११९ कोटी ५८ लाख रुपये एवढा खर्च झाला होता. गतवर्षी १४.३४ कोटी रुपये तूट झाली होती. शासनाच्या निर्देशाप्रमाणे पाणीपुरवठा व्यवस्थेचा खर्च १०० टक्के पाणीपट्टी व इतर उत्पन्नातून करणे आवश्यक आहे. पुढील वर्षासाठी ११५ कोटी ५९ लाख रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पाणीदरात वाढ न करता हे उद्दिष्ट करताना प्रशासनाची कसरत होणार आहे.