शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

विविध भागांत पावसाळा सुरू झाल्याने वीजपुरवठा समस्या; नवी मुंबई काँग्रेस आक्रमक

By नारायण जाधव | Updated: June 11, 2024 18:18 IST

ऐरोलीत विभागीय कार्यालय, घणसोलीत तीन शाखांची केली मागणी

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: नवी मुंबई शहराच्या विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या सततच्या वीज लपंडावाविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. शहराच्या अनेक भागांमध्ये दोन-दोन दिवस वीज नसते. आता पावसाळा सुरू झाल्याने येत्या काळात विजेच्या तक्रारी आणखी वाढणार आहेत, हे लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे आणि नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वाशी विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून विविध मागण्यांचे निवेदन दिले. पक्षाने केलेल्या मागण्यांवर निर्णय झाला नाही, तर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.

या मागण्यांमध्ये रबाळे सब-स्टेशनमधून निघणारे आउट गोईंग फिडरचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, ऐरोली उपविभागास ‘विभागीय कार्यालय’ करून घणसोली शाखेस उपविभाग करावा; कारण, सध्या ऐरोली उपविभाग कार्यालयांतर्गत जवळपास दीड लाखाहून अधिक ग्राहक झाल्याने अतिरिक्त ताण पडत आहे. यामुळे ऐरोली उपविभाग कार्यालयास विभागीय कार्यालय केले आणि तेथे एक कार्यकारी अभियंता, मेंटेनन्ससाठी एक अतिरिक्त अभियंता असेल, स्टोर असेल तर ग्राहकांना किंवा अधिकाऱ्यांना ज्या गोष्टीसाठी वाशीला जावे लागते, ते काम ऐरोलीमध्येच सोयीनुसार होऊ शकेल.

तसेच घणसोली शाखेची विभागणी करून त्यात तीन शाखा कराव्यात, जेणेकरून ग्राहकांस उत्तम सुविधा मिळतील. ३ विभागांस ३ स्वतंत्र अतिरिक्त अभियंता मिळून प्रत्येक शाखेमध्ये कमीतकमी २० कर्मचारी उपलब्ध होतील, घणसोलीत नवे रोहित्र बसवावे, जुन्या फिडर पिलरच्या जागी नवीन फिडर पिलर बसवावेत आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, माजी नगरसेवक अंकुश सोनवणे, नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव प्रणीत शेलार, जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष भीमराव भोसले व सुनील किंद्रे, दिघा ब्लॉक अध्यक्ष बालाजी सावले, सुरेश मानवतकर, सूर्यकांत निवडुंगे, किरण म्हात्रे व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईelectricityवीजcongressकाँग्रेस