शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

विविध भागांत पावसाळा सुरू झाल्याने वीजपुरवठा समस्या; नवी मुंबई काँग्रेस आक्रमक

By नारायण जाधव | Updated: June 11, 2024 18:18 IST

ऐरोलीत विभागीय कार्यालय, घणसोलीत तीन शाखांची केली मागणी

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: नवी मुंबई शहराच्या विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या सततच्या वीज लपंडावाविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. शहराच्या अनेक भागांमध्ये दोन-दोन दिवस वीज नसते. आता पावसाळा सुरू झाल्याने येत्या काळात विजेच्या तक्रारी आणखी वाढणार आहेत, हे लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे आणि नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वाशी विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून विविध मागण्यांचे निवेदन दिले. पक्षाने केलेल्या मागण्यांवर निर्णय झाला नाही, तर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.

या मागण्यांमध्ये रबाळे सब-स्टेशनमधून निघणारे आउट गोईंग फिडरचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, ऐरोली उपविभागास ‘विभागीय कार्यालय’ करून घणसोली शाखेस उपविभाग करावा; कारण, सध्या ऐरोली उपविभाग कार्यालयांतर्गत जवळपास दीड लाखाहून अधिक ग्राहक झाल्याने अतिरिक्त ताण पडत आहे. यामुळे ऐरोली उपविभाग कार्यालयास विभागीय कार्यालय केले आणि तेथे एक कार्यकारी अभियंता, मेंटेनन्ससाठी एक अतिरिक्त अभियंता असेल, स्टोर असेल तर ग्राहकांना किंवा अधिकाऱ्यांना ज्या गोष्टीसाठी वाशीला जावे लागते, ते काम ऐरोलीमध्येच सोयीनुसार होऊ शकेल.

तसेच घणसोली शाखेची विभागणी करून त्यात तीन शाखा कराव्यात, जेणेकरून ग्राहकांस उत्तम सुविधा मिळतील. ३ विभागांस ३ स्वतंत्र अतिरिक्त अभियंता मिळून प्रत्येक शाखेमध्ये कमीतकमी २० कर्मचारी उपलब्ध होतील, घणसोलीत नवे रोहित्र बसवावे, जुन्या फिडर पिलरच्या जागी नवीन फिडर पिलर बसवावेत आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, माजी नगरसेवक अंकुश सोनवणे, नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव प्रणीत शेलार, जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष भीमराव भोसले व सुनील किंद्रे, दिघा ब्लॉक अध्यक्ष बालाजी सावले, सुरेश मानवतकर, सूर्यकांत निवडुंगे, किरण म्हात्रे व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईelectricityवीजcongressकाँग्रेस